शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कळमना बाजारपेठ बंद करण्याचे आदेश नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 23:55 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळमना येथील कृृषी उत्पन्न बाजार समितीतील सहाही बाजारपेठा बंद करण्याचे शासनाकडून कोणतेही आदेश नाहीत. या सर्व बाजारपेठा जीवनावश्यक वस्तू अंतर्गत येत असल्याने बंद करता येत नाहीत, अशी माहिती समितीचे प्रशासक सचिव राजेश भुसारी यांनी दिली.

ठळक मुद्दे प्रशासक ’सचिव राजेश भुसारी : बाजार बंद करण्याचा असोसिएशनचा निर्णय

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळमना येथील कृृषी उत्पन्न बाजार समितीतील सहाही बाजारपेठा बंद करण्याचे शासनाकडून कोणतेही आदेश नाहीत. या सर्व बाजारपेठा जीवनावश्यक वस्तू अंतर्गत येत असल्याने बंद करता येत नाहीत, अशी माहिती समितीचे प्रशासक सचिव राजेश भुसारी यांनी दिली.बाजारात ग्राहकांची गर्दी कमी करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्व कामगारांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आल्याचे भुसारी म्हणाले.या सर्व पार्श्वभूमीवर कळमना बाजाराचे व्यवहार काही दिवसासाठी बंद करण्याची मागणी विविध असोसिएशनकडून पुढे आली आहे, हे विशेष.भुसारी म्हणाले, दररोज बाजाराची साफसफाई करण्यात येत आहे. सर्व बाजाराच्या असोसिएशनच्या बैठका घेण्यात येत आहेत. या बैठकांमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना ग्राहकांची गर्दी कमी करण्याचे आणि स्वच्छता ठेवण्याची विनंती करण्यात येत आहे. पदाधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत आहे. त्यानंतरही धान्य, भाजीपाला आणि फळे बाजारात ग्राहकांची गर्दी होत आहे ही चिंतेची बाब आहे. कलम १४४ नंतरही बाजारात ग्राहकांची होणारी गर्दी पाहता फळ बाजार बुधवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी आणि अडतिया असोसिएशनने स्वत:हून घेतला आहे. शहरातील किरकोळ विक्रेते फळांच्या खरेदीसाठी बाजारात येत नसल्याने फळे विकणार कुणाला, असा त्यांचा सवाल आहे. आम्ही बाजार सुरू ठेवण्यास सांगितला होता. पण अडतिया असोसिएशने स्वत:हून बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशीच बाब भाजीपाला बाजाराशी संबंधित आहे. शहरातील सर्वच आठवडी बाजार बंद झाल्याने भाज्यांची विक्री कमी झाल्याची त्यांची ओरड आहे. त्याकरिता कृृषी उत्पन्न बाजार समितीचा नाईलाज आहे. सध्या भाजीपाला बाजार पहाटे ४ ते दुपारी १२ पर्यंत सुरू आहे. या असोसिएशनने शनिवारपासून बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.भुसारी म्हणाले, बाजाराची पाहणी करताना कलम १४४ चे गांभीर्य लोकांमध्ये दिसून येत नाही. लोकांना गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आता केंद्र सरकारच्या संचारबंदीनंतर राज्य आणि जिल्ह्याच्या सीमा सील झाल्या आहेत. आवक कमी झाली आहे. लोकांना जीवनावश्यक वस्तू मुबलक प्रमाणात मिळाव्यात म्हणून शासनाने बाजार बंद करण्याचे आदेश दिलेले नाहीत.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजारnagpurनागपूर