शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

कळमना बाजारपेठ बंद करण्याचे आदेश नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 23:55 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळमना येथील कृृषी उत्पन्न बाजार समितीतील सहाही बाजारपेठा बंद करण्याचे शासनाकडून कोणतेही आदेश नाहीत. या सर्व बाजारपेठा जीवनावश्यक वस्तू अंतर्गत येत असल्याने बंद करता येत नाहीत, अशी माहिती समितीचे प्रशासक सचिव राजेश भुसारी यांनी दिली.

ठळक मुद्दे प्रशासक ’सचिव राजेश भुसारी : बाजार बंद करण्याचा असोसिएशनचा निर्णय

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळमना येथील कृृषी उत्पन्न बाजार समितीतील सहाही बाजारपेठा बंद करण्याचे शासनाकडून कोणतेही आदेश नाहीत. या सर्व बाजारपेठा जीवनावश्यक वस्तू अंतर्गत येत असल्याने बंद करता येत नाहीत, अशी माहिती समितीचे प्रशासक सचिव राजेश भुसारी यांनी दिली.बाजारात ग्राहकांची गर्दी कमी करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्व कामगारांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आल्याचे भुसारी म्हणाले.या सर्व पार्श्वभूमीवर कळमना बाजाराचे व्यवहार काही दिवसासाठी बंद करण्याची मागणी विविध असोसिएशनकडून पुढे आली आहे, हे विशेष.भुसारी म्हणाले, दररोज बाजाराची साफसफाई करण्यात येत आहे. सर्व बाजाराच्या असोसिएशनच्या बैठका घेण्यात येत आहेत. या बैठकांमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना ग्राहकांची गर्दी कमी करण्याचे आणि स्वच्छता ठेवण्याची विनंती करण्यात येत आहे. पदाधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत आहे. त्यानंतरही धान्य, भाजीपाला आणि फळे बाजारात ग्राहकांची गर्दी होत आहे ही चिंतेची बाब आहे. कलम १४४ नंतरही बाजारात ग्राहकांची होणारी गर्दी पाहता फळ बाजार बुधवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी आणि अडतिया असोसिएशनने स्वत:हून घेतला आहे. शहरातील किरकोळ विक्रेते फळांच्या खरेदीसाठी बाजारात येत नसल्याने फळे विकणार कुणाला, असा त्यांचा सवाल आहे. आम्ही बाजार सुरू ठेवण्यास सांगितला होता. पण अडतिया असोसिएशने स्वत:हून बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशीच बाब भाजीपाला बाजाराशी संबंधित आहे. शहरातील सर्वच आठवडी बाजार बंद झाल्याने भाज्यांची विक्री कमी झाल्याची त्यांची ओरड आहे. त्याकरिता कृृषी उत्पन्न बाजार समितीचा नाईलाज आहे. सध्या भाजीपाला बाजार पहाटे ४ ते दुपारी १२ पर्यंत सुरू आहे. या असोसिएशनने शनिवारपासून बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.भुसारी म्हणाले, बाजाराची पाहणी करताना कलम १४४ चे गांभीर्य लोकांमध्ये दिसून येत नाही. लोकांना गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आता केंद्र सरकारच्या संचारबंदीनंतर राज्य आणि जिल्ह्याच्या सीमा सील झाल्या आहेत. आवक कमी झाली आहे. लोकांना जीवनावश्यक वस्तू मुबलक प्रमाणात मिळाव्यात म्हणून शासनाने बाजार बंद करण्याचे आदेश दिलेले नाहीत.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजारnagpurनागपूर