शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कुणाचा मोबाईल, कुणाचे घड्याळ परत घ्यायला कुणी येईना; काही २०, तर काही ४० वर्षांपूर्वीचे

By नरेश डोंगरे | Updated: November 3, 2023 21:10 IST

मिळेल त्या किंमतीत विल्हेवाट लावण्याचा निर्णय

नागपूर : पोलिसांच्या मालखान्यात ४० वर्षांपासून कुणाची पर्स आणि कुणाची बॅग आहे. कुणाचे हातघड्याळ तर कुणाचा मोबाईल आहे. ज्यांचा कुणाचा असेल त्यांनी तो घेऊन जावा, असे पोलिसांनी वारंवार आवाहन केले. मात्र, त्याला कसलाच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता पोलिसांनी या सर्व बेवारस वस्तूंची मिळेल त्या किंमतीत विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे.

कुठे कोणती बेवारस चिजवस्तू, साहित्य सापडले किंवा कुणी पोलीस ठाण्यात आणून दिले तर पोलीस अशा चिजवस्तूंचा जप्ती पंचनामा करून त्या वस्तू मालखान्यात जमा करतात. चोरीच्या गुन्ह्यातील कुणी आरोपी पकडले गेले आणि त्यांच्याकडून संबंधित गुन्ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काही माल अथवा चिजवस्तू जप्त करण्यात आल्या तर त्यासुद्धा मालखान्यात ठेवल्या जातात. तशा वस्तू बेवारस अवस्थेत वर्षानुवर्षे पोलीस ठाण्याच्या मालखान्यात पडून असतात.

त्या कुणाच्या आहेत, कुणाच्या नाही ते माहित नसल्याने पोलीस वारंवार नोटीस काढून संबंधितांना ओखळ पटवून त्या चिजवस्तू घेऊन जाण्याचे आवाहन करतात. मात्र, संबंधितांना त्याची माहितीच मिळत नाही आणि त्यामुळे या वस्तू वर्षानुवर्षे पोलीस ठाण्याच्या मालखान्यात धूळ खात पडून राहतात. येथील रेल्वे पोलीस ठाण्यातील माखान्यातही १९८२ पासून जप्त करण्यात आलेल्या अनेक चिजवस्तू, साहित्य धूळखात पडून आहे. त्यात पर्स, सुटकेस, बॅग, कपडे, छोट्या-छोट्या अनेक वस्तू, ८ ते १० हातघड्याळांचा समावेश आहे. दुसरे म्हणजे, गेल्या २० वर्षांतील विविध कंपन्यांचे ३३ मोबाईलही आहेत. ज्याचे असेल त्याने ते घेऊन जावे, असे रेल्वे पोलिसांनी त्या संबंधाने यापूर्वी वारंवार आवाहन केले. मात्र, हे आवाहन संबंधित व्यक्तींपर्यंत पोहचले नसल्याने त्याला प्रतिसादच मिळाला नाही. पोलीस ठाण्यात येऊन कुणी त्या चिजवस्तू नेण्याची तसदी घेतली नाही.आता होणार लिलावविनाकारण मालखान्याची जागा व्यापून असलेल्या या चिजवस्तू कुणी नेणार नाही, याची खात्री पटल्यामुळे रेल्वे पोलिसांनी कायदेशिर बाबींची प्रक्रिया पूर्ण करून मिळेल त्या किंमतीत ते सर्व विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, रेल्वेस्थानकावर असलेल्या रेल्वे पोलीस ठाण्यात या सर्व चिजवस्तूंचा ७ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता लिलाव केला जाणार आहे. विशेष म्हणजे, या वस्तू फारच जुन्या आहेत. त्यामुळे त्यांच्या लिलावाला कसा प्रतिसाद मिळणार, असा प्रश्न आहे.

टॅग्स :Policeपोलिसnagpurनागपूर