शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

"काँग्रेसची सत्ता नाही म्हणून कुणी प्रदेशाध्यक्षपद घ्यायला तयार नाही"; राधाकृष्ण विखे पाटील यांनी डागली तोफ

By कमलेश वानखेडे | Updated: February 13, 2025 18:48 IST

पक्षश्रेष्ठींसमोर दिग्गजांचे पितळ उघडे होत आहे - राधाकृष्ण विखे पाटील

नागपूर : काँग्रेसची सत्ता होती म्हणून लोक टिकून होते. आता सत्ता नाही व येण्याची शक्यता नाही. एवढी निश्चांकी काँग्रेसने कधी गाठली नव्हती. त्यामुळे आता प्रत्येकजण दुसरीकडे बोट दाखवत आहे. प्रदेश अध्यक्ष पद कुणी घ्यायला तयार नाही. सत्ता नाही म्हणून प्रदेशाध्यपदाची संधी नाकारणाऱ्या दिग्गजांचे पक्षश्रेष्ठीसमोर पितळ उघडे पडत आहे, अशी टीका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

नागपुरात गुरुवारी पत्रकारांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, हर्षवर्धन सपकाळ हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांना संधी मिळाली तर चांगली गोष्ट आहे. मात्र दिग्गज नेत्यांना डावलून संधी दिली, हे म्हणणे योग्य नाही. कारण दिग्गजच मैदानातून पळून गेले आहेत, असा चिमटा त्यांनी केला. महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून त्यांची बिघाडी सुरु होती. ते राज्याच्या किंवा समाजाच्या हितासाठी नव्हे तर सत्तेसाठी एकत्र आले होता. शरद पवारांबद्दल त्यांना का राग आहे, पवारांना कशासाठी फारकत घ्यायची हे त्या दोघांनाच माहिती, असेही विखे पाटील म्हणाले.

लाडकी बहीण योजना बंद करण्याची गरज नाही

लाडकी बहीण योजनेबाबत न्यायालयाने दिलेल्या मतावर भाष्य करणे उचित नाही. राज्यात सुरू असलेल्या कल्याणकारी योजना या जनतेच्या हितासाठी सुरू केल्या आहेत. शेतीमध्ये मजूर मिळत नाही, अशी कारणे असली याकरिता योजना बंद करण्याची गरज नाही. वेगळा पर्याय असू शकतो. यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.

ठाकरे गटाकडे सन्यासाशिवाय मार्ग नाही

कोण कुठे जात आहे त्याबद्दल आपल्याला जास्त माहिती नाही. मात्र ठाकरे गटाच्या नेत्यांना संन्यास घेतल्याशिवाय मार्ग नाही. म्हणून ते पर्याय शोधत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. छगळ भुजबळ यांच्याबाबत पक्ष नेतृत्व निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलcongressकाँग्रेस