शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

नोटाबंदीवर टीका नको, विश्लेषण गरजेचे : अनिल बोकील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 10:33 PM

नोटाबंदीमुळे १०० जणांचा मृत्यू झाला ही दुर्दैवी बाब आहे. परंतु नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार, नक्षलवादावर अंकुश लागून अनेकांचा जीव वाचला. त्यामुळे देशात नोटाबंदीवरील टीका बंद करून देशातील मोठमोठ्या संस्थांद्वारे नोटाबंदीचे विश्लेषण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अर्थक्रांतीचे प्रणेता, सुप्रसिद्ध वक्ता अनिल बोकील यांनी केले.

ठळक मुद्देमैत्री परिवार संस्थेतर्फे हेमंत व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नोटाबंदीमुळे १०० जणांचा मृत्यू झाला ही दुर्दैवी बाब आहे. परंतु नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार, नक्षलवादावर अंकुश लागून अनेकांचा जीव वाचला. त्यामुळे देशात नोटाबंदीवरील टीका बंद करून देशातील मोठमोठ्या संस्थांद्वारे नोटाबंदीचे विश्लेषण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अर्थक्रांतीचे प्रणेता, सुप्रसिद्ध वक्ता अनिल बोकील यांनी केले.मैत्री परिवार संस्था आणि नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या वतीने बी.आर.ए.मुंडले सभागृहात ‘वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे भारतीय नागरिकांचा आनंद वाढेल काय?’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेश राठी, मैत्री परिवारचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, सचिव प्रमोद पेंडके, उपाध्यक्ष विजय शहाकार उपस्थित होते. अनिल बोकील म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित केले जावे आणि त्यांना दरमहा १० हजार रुपये मानधन सरकारकडून दिले जावे. ज्येष्ठांसाठी ही योजना देशात राबविल्यास युवकांच्या स्थलांतरापासून ते ज्येष्ठांच्या सुरक्षेपर्यंत अनेक प्रश्न सुटतील. सध्याच्या आठ तासांच्या कामाऐवजी सहा तासांच्या दोन शिफ्ट करण्याची गरज आहे. यामुळे कर्मचाºयांचे वेतन वाढले तरी उत्पादन आणि नफ्यात वाढ होईल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. याशिवाय कामाचे तास कमी झाल्याने कुटुंब आणि वैयक्तिक जीवनाकरिता वेळ देता येईल आणि राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होईल. इतर देशात पैसा हे भांडवल असले तरी भारताची १३५ कोटी लोकसंख्या हे आपले मानवी भांडवल आहे. त्याच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देऊन त्यांची खरेदी क्षमता वाढविण्याची गरज आहे. नोटाबंदीमुळे दोन वर्षांपासून बँका, बिलभरण्यासाठीच्या रांगा कमी झाल्या असून, मोठा वेळ वाचल्याचे त्यांनी सांगून नोटाबंदी ही मोठ्या प्रक्रियेची सुरुवात असल्याचे त्यांनी सांगितले. सुरेश राठी यांनी अध्यक्षीय भाषणात नोटाबंदी आणि जीएसटीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रकाश टाकला. प्रा. संजय भेंडे यांनी प्रास्ताविकातून मैत्री परिवार संस्थेच्या कार्यावर प्रकाश टाकला. संचालन प्रा. माधुरी यावलकर यांनी केले. आभार प्रमोद पेंडके यांनी मानले.

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरणnagpurनागपूर