शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

"सगळ्या गोष्टींवर फार बारकाईने लक्ष आहे"; विधिमंडळात पाऊल टाकताच नितेश राणेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 11:00 IST

अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे

Nitesh Rane : हिवाळी अधिवेशनाच्या आधीच नागपुरात महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडले आहे. तिन्ही पक्षांनी जुन्या नेत्यांना बाजूला ठेवत अनेक नव्या चेहऱ्यांना आणि तरुणांना संधी दिली आहे. कणकवलीचे भाजप आमदार नितेश राणे यांनाही मंत्रि‍पदाची संधी देण्यात आली आहे. नितेश राणे यांना मंत्रीपद मिळताच तळकोकणात जल्लोष करण्यात आला. त्यानंतर आता अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.  सगळ्या गोष्टींवर आमचं फार बारकाईने लक्ष असल्याचे नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

नितेश राणे हे सिंधुदुर्गातील कणकवली मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. नितेश राणे यांचे भाऊ निलेश राणेही यंदा महाराष्ट्राच्या विधिमंडळात आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे आता राणे बंधुंची जोडी सरकारमध्ये दिसणार आहे. सोमवारी मंत्री म्हणून नितेश राणे यांनी पहिल्यादाच विधिमंडळात पाऊल टाकलं. यावेळी माध्यमांशी बोलताना . माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी १०० टक्के कशी पार पाडणार असल्याचे नितेश राणे म्हणाले.

"मंत्री म्हणून पहिल्यांदा विधिमंडळात पाऊल टाकलं आहे.  माझ्या पक्षाच्या नेतृत्वाने आणि वरिष्ठ नेत्यांनी आमच्यासारख्या हिंदुत्ववादी तरुण कार्यकर्त्यांवर फार मोठी जबाबदारी टाकली आहे. महाराष्ट्र, कोकण आणि हिंदू समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी मी जास्तीत जास्त माझ्या पदाच्या माध्यमातून प्रयत्न करेन. माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी १०० टक्के कशी पार पाडता येईल या दृष्टीने पाऊले टाकणार आहे, असं नितेश राणे म्हणाले.

"विरोधकांनी ईव्हीएम विरोधात लोकसभेच्या नंतर आंदोलन केले असते लोकांना त्यांच्यावर विश्वासही बसला असता. आता लोकांनाही माहिती आहे की हे हिंदू द्वेषाचे राजकारण आहे. व्होट जिहाद झाला तेव्हा या लोकांना काहीच वाटलं नाही. आता हिंदू समाजाने एकत्र येऊन हिंदुत्ववादी विचाराचे सरकार निवडले तेव्हा या लोकांना मिरच्या लागत आहेत. विरोधक जे काही करत आहेत ते हिंदू समाज खुल्या डोळ्याने पाहत आहे. त्यामुळे ईव्हीएमच्या या आंदोलनाला काही अर्थ नाही," असंही नितेश राणेंनी म्हटलं.

यावेळी माध्यमांनी तु्म्हाला संजय राऊत यांच्याकडून शुभेच्छा आल्या आहेत का असा सवाल नितेश राणे यांना केला. यावर बोलताना त्यांचे मन एवढं मोठं नाही असं नितेश राणे म्हणाले. "महाराष्ट्रातून शुभेच्छा येत आहेत. पण ते एवढ्या मोठ्या मनाचे नाहीत. महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या लोकांना शुभेच्छा द्याव्यात एवढ्या मोठ्या मनाचे ते नाहीत. आम्ही त्यांना ३९ वर्षे ओळखतो. अशा लोकांकडून आम्हाला शुभेच्छा नकोच आहेत. त्यांनी फक्त महाराष्ट्रामध्ये यापुढे नीट वागावं. सगळ्या गोष्टींवर आमचं फार बारकाईने लक्ष आहे. सरकार आमचं आहे. सरकारमध्ये असताना कुणी महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर प्रहार करण्यासाठी आम्ही तयार आहोत," असा इशारा नितेश राणे यांनी दिला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nitesh Raneनीतेश राणे BJPभाजपा