शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

"सगळ्या गोष्टींवर फार बारकाईने लक्ष आहे"; विधिमंडळात पाऊल टाकताच नितेश राणेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 11:00 IST

अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे

Nitesh Rane : हिवाळी अधिवेशनाच्या आधीच नागपुरात महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडले आहे. तिन्ही पक्षांनी जुन्या नेत्यांना बाजूला ठेवत अनेक नव्या चेहऱ्यांना आणि तरुणांना संधी दिली आहे. कणकवलीचे भाजप आमदार नितेश राणे यांनाही मंत्रि‍पदाची संधी देण्यात आली आहे. नितेश राणे यांना मंत्रीपद मिळताच तळकोकणात जल्लोष करण्यात आला. त्यानंतर आता अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.  सगळ्या गोष्टींवर आमचं फार बारकाईने लक्ष असल्याचे नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

नितेश राणे हे सिंधुदुर्गातील कणकवली मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. नितेश राणे यांचे भाऊ निलेश राणेही यंदा महाराष्ट्राच्या विधिमंडळात आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे आता राणे बंधुंची जोडी सरकारमध्ये दिसणार आहे. सोमवारी मंत्री म्हणून नितेश राणे यांनी पहिल्यादाच विधिमंडळात पाऊल टाकलं. यावेळी माध्यमांशी बोलताना . माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी १०० टक्के कशी पार पाडणार असल्याचे नितेश राणे म्हणाले.

"मंत्री म्हणून पहिल्यांदा विधिमंडळात पाऊल टाकलं आहे.  माझ्या पक्षाच्या नेतृत्वाने आणि वरिष्ठ नेत्यांनी आमच्यासारख्या हिंदुत्ववादी तरुण कार्यकर्त्यांवर फार मोठी जबाबदारी टाकली आहे. महाराष्ट्र, कोकण आणि हिंदू समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी मी जास्तीत जास्त माझ्या पदाच्या माध्यमातून प्रयत्न करेन. माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी १०० टक्के कशी पार पाडता येईल या दृष्टीने पाऊले टाकणार आहे, असं नितेश राणे म्हणाले.

"विरोधकांनी ईव्हीएम विरोधात लोकसभेच्या नंतर आंदोलन केले असते लोकांना त्यांच्यावर विश्वासही बसला असता. आता लोकांनाही माहिती आहे की हे हिंदू द्वेषाचे राजकारण आहे. व्होट जिहाद झाला तेव्हा या लोकांना काहीच वाटलं नाही. आता हिंदू समाजाने एकत्र येऊन हिंदुत्ववादी विचाराचे सरकार निवडले तेव्हा या लोकांना मिरच्या लागत आहेत. विरोधक जे काही करत आहेत ते हिंदू समाज खुल्या डोळ्याने पाहत आहे. त्यामुळे ईव्हीएमच्या या आंदोलनाला काही अर्थ नाही," असंही नितेश राणेंनी म्हटलं.

यावेळी माध्यमांनी तु्म्हाला संजय राऊत यांच्याकडून शुभेच्छा आल्या आहेत का असा सवाल नितेश राणे यांना केला. यावर बोलताना त्यांचे मन एवढं मोठं नाही असं नितेश राणे म्हणाले. "महाराष्ट्रातून शुभेच्छा येत आहेत. पण ते एवढ्या मोठ्या मनाचे नाहीत. महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या लोकांना शुभेच्छा द्याव्यात एवढ्या मोठ्या मनाचे ते नाहीत. आम्ही त्यांना ३९ वर्षे ओळखतो. अशा लोकांकडून आम्हाला शुभेच्छा नकोच आहेत. त्यांनी फक्त महाराष्ट्रामध्ये यापुढे नीट वागावं. सगळ्या गोष्टींवर आमचं फार बारकाईने लक्ष आहे. सरकार आमचं आहे. सरकारमध्ये असताना कुणी महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर प्रहार करण्यासाठी आम्ही तयार आहोत," असा इशारा नितेश राणे यांनी दिला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nitesh Raneनीतेश राणे BJPभाजपा