शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

"सगळ्या गोष्टींवर फार बारकाईने लक्ष आहे"; विधिमंडळात पाऊल टाकताच नितेश राणेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 11:00 IST

अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे

Nitesh Rane : हिवाळी अधिवेशनाच्या आधीच नागपुरात महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडले आहे. तिन्ही पक्षांनी जुन्या नेत्यांना बाजूला ठेवत अनेक नव्या चेहऱ्यांना आणि तरुणांना संधी दिली आहे. कणकवलीचे भाजप आमदार नितेश राणे यांनाही मंत्रि‍पदाची संधी देण्यात आली आहे. नितेश राणे यांना मंत्रीपद मिळताच तळकोकणात जल्लोष करण्यात आला. त्यानंतर आता अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.  सगळ्या गोष्टींवर आमचं फार बारकाईने लक्ष असल्याचे नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

नितेश राणे हे सिंधुदुर्गातील कणकवली मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. नितेश राणे यांचे भाऊ निलेश राणेही यंदा महाराष्ट्राच्या विधिमंडळात आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे आता राणे बंधुंची जोडी सरकारमध्ये दिसणार आहे. सोमवारी मंत्री म्हणून नितेश राणे यांनी पहिल्यादाच विधिमंडळात पाऊल टाकलं. यावेळी माध्यमांशी बोलताना . माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी १०० टक्के कशी पार पाडणार असल्याचे नितेश राणे म्हणाले.

"मंत्री म्हणून पहिल्यांदा विधिमंडळात पाऊल टाकलं आहे.  माझ्या पक्षाच्या नेतृत्वाने आणि वरिष्ठ नेत्यांनी आमच्यासारख्या हिंदुत्ववादी तरुण कार्यकर्त्यांवर फार मोठी जबाबदारी टाकली आहे. महाराष्ट्र, कोकण आणि हिंदू समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी मी जास्तीत जास्त माझ्या पदाच्या माध्यमातून प्रयत्न करेन. माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी १०० टक्के कशी पार पाडता येईल या दृष्टीने पाऊले टाकणार आहे, असं नितेश राणे म्हणाले.

"विरोधकांनी ईव्हीएम विरोधात लोकसभेच्या नंतर आंदोलन केले असते लोकांना त्यांच्यावर विश्वासही बसला असता. आता लोकांनाही माहिती आहे की हे हिंदू द्वेषाचे राजकारण आहे. व्होट जिहाद झाला तेव्हा या लोकांना काहीच वाटलं नाही. आता हिंदू समाजाने एकत्र येऊन हिंदुत्ववादी विचाराचे सरकार निवडले तेव्हा या लोकांना मिरच्या लागत आहेत. विरोधक जे काही करत आहेत ते हिंदू समाज खुल्या डोळ्याने पाहत आहे. त्यामुळे ईव्हीएमच्या या आंदोलनाला काही अर्थ नाही," असंही नितेश राणेंनी म्हटलं.

यावेळी माध्यमांनी तु्म्हाला संजय राऊत यांच्याकडून शुभेच्छा आल्या आहेत का असा सवाल नितेश राणे यांना केला. यावर बोलताना त्यांचे मन एवढं मोठं नाही असं नितेश राणे म्हणाले. "महाराष्ट्रातून शुभेच्छा येत आहेत. पण ते एवढ्या मोठ्या मनाचे नाहीत. महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या लोकांना शुभेच्छा द्याव्यात एवढ्या मोठ्या मनाचे ते नाहीत. आम्ही त्यांना ३९ वर्षे ओळखतो. अशा लोकांकडून आम्हाला शुभेच्छा नकोच आहेत. त्यांनी फक्त महाराष्ट्रामध्ये यापुढे नीट वागावं. सगळ्या गोष्टींवर आमचं फार बारकाईने लक्ष आहे. सरकार आमचं आहे. सरकारमध्ये असताना कुणी महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर प्रहार करण्यासाठी आम्ही तयार आहोत," असा इशारा नितेश राणे यांनी दिला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nitesh Raneनीतेश राणे BJPभाजपा