शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

रस्ते अपघातात राज्यात आठ महिन्यात नऊ हजार बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 10:19 IST

जानेवारी ते सप्टेंबर २०१८ या आठ महिन्यात राज्यात २६,६०५ रस्ते अपघात झाले. यात ९,६८३ लोकांचे बळी गेले असून, २३,८०५ जखमी झाले.

ठळक मुद्देमुंबई, पुण्यानंतर नागपूर तिसऱ्या क्रमांकावर

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्ते अपघातांपैकी साधारण ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होतात. ते निश्चितच टाळता येतात. असे असतानाही रस्ता वापरणाऱ्या घटकांनी याची गंभीरपणे दखल घेतल्याचे दिसत नाही. जानेवारी ते सप्टेंबर २०१८ या आठ महिन्यात राज्यात २६,६०५ रस्ते अपघात झाले. यात ९,६८३ लोकांचे बळी गेले असून, २३,८०५ जखमी झाले. विशेष म्हणजे, अपघातात पहिल्या तीनमध्ये अनुक्रमानुसार मुंबई शहर, पुणे ग्रामीण व नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे.वाढत्या शहरीकरणामुळे मुख्य रस्तेच नाही तर वसाहतीमधील रस्त्यांवरील वाहतूक समस्या बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे जलद आणि सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. यातच पार्किंगच्या जागा मर्यादित असल्याने व रस्त्यावरील अतिक्र मण यामुळे ही परिस्थिती अधिकच अवघड होत चालली आहे, शिवाय प्रदूषणामुळे आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. आठ महिन्यात सर्वाधिक २,३०५ अपघात एकट्या मुंबई शहरामध्ये झाले. दुसºया क्रमांकावर पुणे (ग्रामीण) असून १७६८ अपघात, तिसºया क्रमांकावरील नागपूर जिल्ह्यात १५७१ अपघात तर चौथ्या क्रमांकावरील नाशिक ग्रामीणमध्ये ११९४ अपघात झाले आहेत. मात्र रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये पुणे ग्रामीण पहिल्या क्रमांकावर आहे. येथे ७८७ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. दुसऱ्या क्रमांकावरील नाशिक ग्रामीणमध्ये ६३२ मृत्यू, तिसऱ्या क्रमांकावरील अहमदनगरमध्ये ६१७ मृत्यूमुखी पडले. नागपूर जिल्ह्यात बळींची संख्या ४२७ वर पोहचली आहे.

आठ टक्क्यांनी वाढली बळींची संख्यापरिवहन विभागाने जानेवारी ते सप्टेंबर २०१७ व जानेवारी ते सप्टेंबर २०१८ तुलनात्मक अपघातांचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार गेल्या वर्षीच्या या महिन्यांमध्ये राज्यातील अपघातांच्या संख्येत किंचित घट झाली असली तरी, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. २०१७ मधील या आठ महिन्यांत २६,६४१ अपघात, ९,००१ मृत्यू तर २३,७३७ जखमी झाले आहेत तर २०१८ मधील आठ महिन्यात २६,६०५ अपघात, ९,६८३ मृत्यू तर २३,८०५ जखमींची नोंद झाली आहे. साधारण वजा ०.१ अपघात कमी झाले आहेत. मात्र मृत्यूमध्ये ८ टक्क्यांनी तर जखमींमध्ये ०.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

टॅग्स :Accidentअपघात