शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

रस्ते अपघातात राज्यात आठ महिन्यात नऊ हजार बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 10:19 IST

जानेवारी ते सप्टेंबर २०१८ या आठ महिन्यात राज्यात २६,६०५ रस्ते अपघात झाले. यात ९,६८३ लोकांचे बळी गेले असून, २३,८०५ जखमी झाले.

ठळक मुद्देमुंबई, पुण्यानंतर नागपूर तिसऱ्या क्रमांकावर

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्ते अपघातांपैकी साधारण ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होतात. ते निश्चितच टाळता येतात. असे असतानाही रस्ता वापरणाऱ्या घटकांनी याची गंभीरपणे दखल घेतल्याचे दिसत नाही. जानेवारी ते सप्टेंबर २०१८ या आठ महिन्यात राज्यात २६,६०५ रस्ते अपघात झाले. यात ९,६८३ लोकांचे बळी गेले असून, २३,८०५ जखमी झाले. विशेष म्हणजे, अपघातात पहिल्या तीनमध्ये अनुक्रमानुसार मुंबई शहर, पुणे ग्रामीण व नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे.वाढत्या शहरीकरणामुळे मुख्य रस्तेच नाही तर वसाहतीमधील रस्त्यांवरील वाहतूक समस्या बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे जलद आणि सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. यातच पार्किंगच्या जागा मर्यादित असल्याने व रस्त्यावरील अतिक्र मण यामुळे ही परिस्थिती अधिकच अवघड होत चालली आहे, शिवाय प्रदूषणामुळे आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. आठ महिन्यात सर्वाधिक २,३०५ अपघात एकट्या मुंबई शहरामध्ये झाले. दुसºया क्रमांकावर पुणे (ग्रामीण) असून १७६८ अपघात, तिसºया क्रमांकावरील नागपूर जिल्ह्यात १५७१ अपघात तर चौथ्या क्रमांकावरील नाशिक ग्रामीणमध्ये ११९४ अपघात झाले आहेत. मात्र रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये पुणे ग्रामीण पहिल्या क्रमांकावर आहे. येथे ७८७ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. दुसऱ्या क्रमांकावरील नाशिक ग्रामीणमध्ये ६३२ मृत्यू, तिसऱ्या क्रमांकावरील अहमदनगरमध्ये ६१७ मृत्यूमुखी पडले. नागपूर जिल्ह्यात बळींची संख्या ४२७ वर पोहचली आहे.

आठ टक्क्यांनी वाढली बळींची संख्यापरिवहन विभागाने जानेवारी ते सप्टेंबर २०१७ व जानेवारी ते सप्टेंबर २०१८ तुलनात्मक अपघातांचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार गेल्या वर्षीच्या या महिन्यांमध्ये राज्यातील अपघातांच्या संख्येत किंचित घट झाली असली तरी, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. २०१७ मधील या आठ महिन्यांत २६,६४१ अपघात, ९,००१ मृत्यू तर २३,७३७ जखमी झाले आहेत तर २०१८ मधील आठ महिन्यात २६,६०५ अपघात, ९,६८३ मृत्यू तर २३,८०५ जखमींची नोंद झाली आहे. साधारण वजा ०.१ अपघात कमी झाले आहेत. मात्र मृत्यूमध्ये ८ टक्क्यांनी तर जखमींमध्ये ०.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

टॅग्स :Accidentअपघात