शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमीक्रॉन हा धोक्याची घंटा; नागपुरातील तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 20:12 IST

Nagpur News युरोपातील काही देशांमध्ये तिसऱ्या लाटेने जनजीवन अत्यवस्थ झाले असतानाच हा व्हेरियंट म्हणजे धोक्याची घंटा असल्याचे नागपुरातील तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देसंसर्ग थांबविण्यासाठी प्रत्येक प्रयत्न गरजेचा

नागपूर : कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असताना दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या नव्या व्हेरियंटने चिंता वाढली आहे. युरोपातील काही देशांमध्ये तिसऱ्या लाटेने जनजीवन अत्यवस्थ झाले असतानाच हा व्हेरियंट म्हणजे धोक्याची घंटा असल्याचे नागपुरातील तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

नवा व्हेरियंट जास्त आक्रमक ठरू शकतो- डॉ. जय देशमुख

ज्येष्ठ फिजीशियन डॉ. जय देशमुख म्हणाले, दक्षिण आफिक्रेतील कोरोनाचा नवा व्हेरियंटकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. या व्हेरिएंटची ओळख पटवण्यात आली असून दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना आणि हाँगकाँग या देशांमधील नागरिकांसाठी धोका वाढल्याचे चित्र आहे. हा व्हेरियंट अधिक आक्रमक व संसर्गजन्य ठरू शकतो. भारतातही येण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे आपल्यासाठी डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी हे तीन महिने महत्त्वाचे ठरणार आहे. ‘फर्स्ट लाईन वर्कर’ व ‘हायरिस्क’ रुग्णांच्या तिसऱ्या डोसबाबत गंभीरतेने विचार होणे व त्याची अमंलबजावणी होणे गरजेचे आहे. संसर्ग थांबविण्यासाठी प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा ठरणार आहे.

नवा व्हेरियंट हा ट्रिपल म्युटंट - डॉ. सुशांत मेश्राम

मेडिकलच्या श्वसनरोग विभागाचे तज्ज्ञ व कोवीड विशेषज्ज्ञ डॉ. सुशांत मेश्राम म्हणाले, साऊथ आफिक्रेत आढळून आलेला नवा व्हेरियंट हा ‘ट्रिपल म्युटंट’ म्हणजे तिसऱ्यांदा उत्परिवर्तीत झाला आहे. हा ‘डेल्टा व्हेरियंट’ पेक्षा वेगळा आहे. हा कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे निर्माण झालेल्या अण्टीबॉडीजलाही जुमानणारा नसावा, अशी शक्यता आहे. यावर एकच उपाय म्हणजे, या व्हेरियंटचा संसर्गाचा फैलाव रोखणे. यासाठी सरकारने आवश्यक पावले उचलणे गरजेचे आहे. हायरिस्क असलेल्या म्हणजे, उच्चरक्तदाब, मधुमेह, हृदयरोगाच्या रुग्णांची, ज्येष्ठ नागरिकांची व लहान मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

नवा व्हेरिंयटसाठी पुढील १५ दिवस महत्त्वाचे-डॉ. नितीन शिंदे

संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. नितीन शिंदे, म्हणाले, दक्षिण आफिक्रेत दिसून आलेल्या कोरोनाचा नवा व्हेरियंटची माहिती कमी आणि चर्चाच जास्त आहे. यामुळे पुढील १५ दिवस महत्त्वाचे ठरणार आहे. हा व्हेरीयंट किती वेगाने पसरतो याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या व्हेरियंटमुळे भारताला धोका आहे, असे म्हणणे घाईचे होईल. कारण, या व्हेरियंटचे साऊथ आफिक्रेत जवळपास ५९ रुग्ण आढळून आले. यातील ६१ टक्के रुग्णांचे लसीकरण झालेले नाही. उर्वरीत ५० टक्के रुग्णांनी एकच डोस घेतला आहे. यामुळे याचा आणखी अभ्यास होणे आवश्यक आहे. भारतात लसीकरणाची गती आणखी वाढवायला हवी. ज्यांचे दोन डोस झाले त्यांना तिसºया डोस देण्याबाबत लवकरन निर्णय घ्यायला हवे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस