शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

संविधानातील नैतिक मूल्यांचा नवीन पिढीने अंगिकार करावा  : दिलीप उके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:24 IST

नवीन पिढीने संविधानातील नैतिक मूल्यांचा अंगिकरा करण्याची आवश्यकता असल्याचे मत मुंबई येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप उके यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देडॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : देशाच्या संविधान निर्मितीच्या वेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी डोळ्या समोर एक ‘व्हिजन’ ठेवले होते. नवभारताची उभारणी करत असताना देशातील पुढील पिढ्यांना सर्वांगिण विकासाची समान संधी मिळावी हा त्यांचा मानस होता. त्यांनी संविधानात नैतिक मूल्यांचा अंतर्भाव केला होता. नवीन पिढीने संविधानातील नैतिक मूल्यांचा अंगिकरा करण्याची आवश्यकता असल्याचे मत मुंबई येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप उके यांनी व्यक्त केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान निर्मितीमधील योगदान व मूलभूत अधिकार’ या विषयावर ते बोलत होते.विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. आपले संविधान हे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या वैश्वीक मूल्यांवर आधारित आहे. भारत नावाच्या राष्ट्राची पुनर्रचना निर्माण व्हायला हवी. जातीविहीन समाज घडायला हवा, असा त्यामागचा दृष्टीकोन होता. देशातील तत्कालिन सामाजिक परिस्थिती आणि भविष्याचा वेध घेऊन तयार करण्यात आलेले भारतीय संविधान हे भारतीय समाजाची आधुनिकीकरणाची शक्तीशाली प्रेरणा ठरले. संविधानामुळेच देशात परिवर्तन घडून आले. जगभरातील विधीतज्ज्ञांनीदेखील देशाच्या संविधानाची प्रशंसा केली आहे, असे डॉ.उके म्हणाले. नवीन पिढीपर्यंतच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकापर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ.काणे यांनी केले. डॉ.प्रवीणा खोब्रागडे यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :dr. babasaheb ambedkar birthday celebrationडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीnagpurनागपूर