शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

संविधानातील नैतिक मूल्यांचा नवीन पिढीने अंगिकार करावा  : दिलीप उके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:24 IST

नवीन पिढीने संविधानातील नैतिक मूल्यांचा अंगिकरा करण्याची आवश्यकता असल्याचे मत मुंबई येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप उके यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देडॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : देशाच्या संविधान निर्मितीच्या वेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी डोळ्या समोर एक ‘व्हिजन’ ठेवले होते. नवभारताची उभारणी करत असताना देशातील पुढील पिढ्यांना सर्वांगिण विकासाची समान संधी मिळावी हा त्यांचा मानस होता. त्यांनी संविधानात नैतिक मूल्यांचा अंतर्भाव केला होता. नवीन पिढीने संविधानातील नैतिक मूल्यांचा अंगिकरा करण्याची आवश्यकता असल्याचे मत मुंबई येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप उके यांनी व्यक्त केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान निर्मितीमधील योगदान व मूलभूत अधिकार’ या विषयावर ते बोलत होते.विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. आपले संविधान हे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या वैश्वीक मूल्यांवर आधारित आहे. भारत नावाच्या राष्ट्राची पुनर्रचना निर्माण व्हायला हवी. जातीविहीन समाज घडायला हवा, असा त्यामागचा दृष्टीकोन होता. देशातील तत्कालिन सामाजिक परिस्थिती आणि भविष्याचा वेध घेऊन तयार करण्यात आलेले भारतीय संविधान हे भारतीय समाजाची आधुनिकीकरणाची शक्तीशाली प्रेरणा ठरले. संविधानामुळेच देशात परिवर्तन घडून आले. जगभरातील विधीतज्ज्ञांनीदेखील देशाच्या संविधानाची प्रशंसा केली आहे, असे डॉ.उके म्हणाले. नवीन पिढीपर्यंतच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकापर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ.काणे यांनी केले. डॉ.प्रवीणा खोब्रागडे यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :dr. babasaheb ambedkar birthday celebrationडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीnagpurनागपूर