शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

'नेहरू देशभक्त होते, मात्र मातृभूमीबाबत आपलेपणाची भावना नव्हती' भाजप नेते सुनील देवधर यांची नेहरूंवर टीका

By योगेश पांडे | Updated: February 5, 2026 20:40 IST

Nagpur : देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या धोरणांमुळे पाकव्याप्त काश्मीर व अक्साई चीनचा प्रदेश ताब्यात घेता आला नाही. जिथे काही पिकू शकत नाही ती भूमी काय कामाची असे त्यांचे विचार होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या धोरणांमुळे पाकव्याप्त काश्मीर व अक्साई चीनचा प्रदेश ताब्यात घेता आला नाही. जिथे काही पिकू शकत नाही ती भूमी काय कामाची असे त्यांचे विचार होते. नेहरू निश्चितच देशभक्त होते. मात्र पाश्चात्य संस्कृतीचा पगडा असल्यामुळे त्यांच्यात मातृभूमीबाबत आपलेपणाची अजिबात भावना नव्हती, असे प्रतिपादन भाजपचे नेते सुनील देवधर यांनी केले. नागपुरात राम नगर येथे श्री शक्तिपीठ फाउंडेशन द्वारा आयोजित श्री दास नवमी उत्सवात त्यांचे ‘ संघ आहे म्हणून ‘ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

संघाचे संस्थापक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांच्याकडे शाश्वत स्वातंत्र्य मिळविण्याचा मार्ग होता. संघाच्या पहिल्या शाखेपासून सर्व स्वयंसेवक देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपापल्या परिने प्रयत्न करत होते. मात्र तरीदेखील राजकीय स्वार्थातून काही लोक संघाने स्वातंत्र्यलढ्यात काय योगदान दिले असा सवाल करतात. आम्ही कधीही महात्मा गांधींच्या मार्गावर प्रश्न उपस्थित केले नाही. मग संघाच्या देशाबाबतच्या समर्पणावर प्रश्न उपस्थित करण्याचे कारण काय असा सवाल देवधर यांनी केला. जर देशात संघ नसता तर १९४७ नंतरदेखील अनेक फाळण्या झाल्या असत्या. संघाने ध्येयविहीन व आत्मविस्मृत हिंदू व भारतीय समाजाला दिशा देण्याचे कार्य केले. संघाने व्यक्तिनिर्माण करण्यावरच भर दिला, असे देवधर म्हणाले. संघाने देशातील अनेक समाजांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. विशेषत: ईशान्येकडील राज्यांमध्ये तर शून्यापासून सुरुवात करून तेथील लोकांमध्ये देशाबाबतची तळमळ व आत्मियता कायम ठेवली असेदेखील त्यांनी सांगितले.

नेहरूच म्हणाले होते, हिंदू कुटुंबात चुकीने जन्म

मोतीलाल नेहरू यांच्या नावासमोर एकदा हिंदू लिहीले होते, तेव्हा ते मला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका असे वक्तव्य केले होते. जवाहरलाल नेहरू हेदेखील हिंदू कुुटुंबात माझा चुकीने जन्म झाला असे म्हणायचे, असा दावा देवधर यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Nehru was patriotic, but lacked feeling for the motherland: BJP leader.

Web Summary : BJP leader Sunil Deodhar criticized Nehru's policies for the loss of Kashmir territory. He alleged Nehru lacked a sense of belonging due to Western influence. Deodhar praised RSS for nation-building, filling the Hindu society with purpose and integrating communities, especially in Northeast India, fostering patriotism.
टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूBJPभाजपाnagpurनागपूर