शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२०७० पर्यंत देश कार्बनमुक्त करणे हे नीरीचे ध्येय; तीन-चार वर्षांत दिसतील परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 07:00 IST

Nagpur News पर्यावरणीय संशाेधन संस्था म्हणून या ध्येयपूर्तीसाठी आतापासूनच त्यानुसार संशाेधनाचे प्रकल्प राबविण्यावर नीरीचा फाेकस राहील, अशी ग्वाही राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था(नीरी)चे नवनियुक्त संचालक डाॅ. अतुल वैद्य यांनी दिली.

ठळक मुद्देसंचालक अतुल वैद्य यांची ग्वाही

निशांत वानखेडे

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी २०७० पर्यंत भारत देश कार्बनमुक्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. पर्यावरणीय संशाेधन संस्था म्हणून या ध्येयपूर्तीसाठी आतापासूनच त्यानुसार संशाेधनाचे प्रकल्प राबविण्यावर नीरीचा फाेकस राहील, अशी ग्वाही राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था(नीरी)चे नवनियुक्त संचालक डाॅ. अतुल वैद्य यांनी दिली.

संचालक पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लाेकमतशी बाेलताना डाॅ. वैद्य यांनी त्यांच्या भविष्यातील याेजनांबाबत भूमिका मांडली. स्वच्छ पर्यावरण हे नीरीचे ब्रीदवाक्य आहे. पर्यावरण बदल, ग्लाेबल वार्मिंग या समस्या जगाला भेडसावत आहेत. त्यानुसार कार्बन आणि ग्रीन हाऊस गॅसेसचे उत्सर्जन कसे नियंत्रित करता येईल, याबाबत कार्य केले जाणार आहे. निघणारे कार्बन कॅप्चर करून त्याचा पुनर्वापर करण्यावर संशाेधन कार्य सुरू आहे. नीरी येत्या तीन-चार वर्षात बरेचशे तंत्रज्ञान आणि प्रक्रिया विकसित करेल व हे संशाेधन कार्य जनतेला दिसेल, असा विश्वास डाॅ. वैद्य यांनी व्यक्त केला.

काेराडी औष्णिक वीज प्रकल्पाजवळ बांबू प्लॅन्टेशनचा प्रकल्प यशस्वी केला आहे. त्यानुसार ओसाड जमिनीवर अधिकाधिक वृक्षाराेपण कसे करता येईल, यासाठीच्या प्रक्रियेबाबत काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय जलप्रदूषण, वायूप्रदूषण याबाबत सुरू असलेले नेहमीचे संशाेधन सुरूच राहणार, असे त्यांनी स्पष्ट केले.

संशाेधनकार्य लाेकाभिमुख व पारदर्शक करण्यावर भर

शासकीय संस्था म्हणून सरकारच्या धाेरणाशी नीरी बांधील आहे. त्या धाेरणाला धरून स्वच्छ पर्यावरणासाठी संस्थेमध्ये हाेणारे संशाेधन कार्य लाेकांना सहज उपलब्ध हाेईल, समाजाला त्याचा फायदा हाेईल, या भूमिकेतून कार्य केले जाणार आहे. नीरीने नेहमी लाेकांना केंद्रस्थानी ठेवून कार्य केले आहे. पण यापुढे ते अधिक लाेकाभिमुख करण्यावर भर राहील, अशी भावना डाॅ. वैद्य यांनी व्यक्त केली. नीरी संस्था कायम विद्यार्थी फ्रेन्डली राहिली आहे व पुढेही राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

घनकचरा व्यवस्थापनाला वैज्ञानिक जाेड देण्याचा प्रयत्न

देशात स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरचा क्रमांक घसरला, यावर विचारले असता त्यांनी सांगितले, शहरातील घनकचरा व्यवस्थापन व अंमलबजावणी हे स्थानिक प्रशासनाच्या कार्याचा भाग आहे. पर्यावरण संस्था म्हणून तंत्रज्ञान व व्यवस्थापनाची प्रक्रिया विकसित करणे हा आमच्या कार्याचा भाग आहे. शहरातील घनकचऱ्याचे विकेंद्रीकरण प्रक्रियेने व्यवस्थापन करता येईल काय, यावर कार्य सुरू आहे. याशिवाय पुन्हा नव्या पद्धती विकसित करून प्रशासकीय भागाला वैज्ञानिक पद्धतीची जाेड देण्याचा प्रयत्न करण्याची भूमिका डाॅ. वैद्य यांनी मांडली.

भविष्यातील महामारीसाठी सज्ज

काेराेनासारख्या आजाराच्या उपचारासाठी सीएसआयआरच्या इतर संस्था कार्यरत आहेतच. त्यांना सहायक म्हणून नीरीचे कार्य सुरू राहील. काेराेनाच्या डिटेक्शनच्या प्रक्रियेत नीरीने महत्त्वाचे याेगदान दिले आहे. काेराेना डिटेक्शन हब म्हणून नीरीने काम केले आहे. पर्यावरण बदल किंवा ग्लाेबल वार्मिंगमुळे भविष्यात अशा आजारांचा प्रकाेप हाेण्याची शक्यता आहे. अशावेळी संशाेधन संस्था म्हणून मॅंडेटमध्ये जे कार्य राहील, ते आम्ही करू. अशा समस्यांशी निपटण्यासाठी आम्ही सज्ज आहाेत, असा विश्वास त्यांनी दिला.

औद्याेगिक कचरानिर्मिती कमी करण्यावर भर

उद्याेगातून निघणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापनाची पद्धत आतापर्यंत वापरली जात आहे. मात्र ही प्रक्रिया फार खर्चिक असते. त्यापेक्षा उत्पादनावर परिणाम हाेऊ न देता औद्याेगिक कचऱ्याची निर्मितीच कशी कमी करता येईल, यानुसार संशाेधन कार्य करण्यावर भर राहणार असल्याचे डाॅ. वैद्य यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :pollutionप्रदूषण