शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

२०७० पर्यंत देश कार्बनमुक्त करणे हे नीरीचे ध्येय; तीन-चार वर्षांत दिसतील परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 07:00 IST

Nagpur News पर्यावरणीय संशाेधन संस्था म्हणून या ध्येयपूर्तीसाठी आतापासूनच त्यानुसार संशाेधनाचे प्रकल्प राबविण्यावर नीरीचा फाेकस राहील, अशी ग्वाही राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था(नीरी)चे नवनियुक्त संचालक डाॅ. अतुल वैद्य यांनी दिली.

ठळक मुद्देसंचालक अतुल वैद्य यांची ग्वाही

निशांत वानखेडे

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी २०७० पर्यंत भारत देश कार्बनमुक्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. पर्यावरणीय संशाेधन संस्था म्हणून या ध्येयपूर्तीसाठी आतापासूनच त्यानुसार संशाेधनाचे प्रकल्प राबविण्यावर नीरीचा फाेकस राहील, अशी ग्वाही राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था(नीरी)चे नवनियुक्त संचालक डाॅ. अतुल वैद्य यांनी दिली.

संचालक पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लाेकमतशी बाेलताना डाॅ. वैद्य यांनी त्यांच्या भविष्यातील याेजनांबाबत भूमिका मांडली. स्वच्छ पर्यावरण हे नीरीचे ब्रीदवाक्य आहे. पर्यावरण बदल, ग्लाेबल वार्मिंग या समस्या जगाला भेडसावत आहेत. त्यानुसार कार्बन आणि ग्रीन हाऊस गॅसेसचे उत्सर्जन कसे नियंत्रित करता येईल, याबाबत कार्य केले जाणार आहे. निघणारे कार्बन कॅप्चर करून त्याचा पुनर्वापर करण्यावर संशाेधन कार्य सुरू आहे. नीरी येत्या तीन-चार वर्षात बरेचशे तंत्रज्ञान आणि प्रक्रिया विकसित करेल व हे संशाेधन कार्य जनतेला दिसेल, असा विश्वास डाॅ. वैद्य यांनी व्यक्त केला.

काेराडी औष्णिक वीज प्रकल्पाजवळ बांबू प्लॅन्टेशनचा प्रकल्प यशस्वी केला आहे. त्यानुसार ओसाड जमिनीवर अधिकाधिक वृक्षाराेपण कसे करता येईल, यासाठीच्या प्रक्रियेबाबत काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय जलप्रदूषण, वायूप्रदूषण याबाबत सुरू असलेले नेहमीचे संशाेधन सुरूच राहणार, असे त्यांनी स्पष्ट केले.

संशाेधनकार्य लाेकाभिमुख व पारदर्शक करण्यावर भर

शासकीय संस्था म्हणून सरकारच्या धाेरणाशी नीरी बांधील आहे. त्या धाेरणाला धरून स्वच्छ पर्यावरणासाठी संस्थेमध्ये हाेणारे संशाेधन कार्य लाेकांना सहज उपलब्ध हाेईल, समाजाला त्याचा फायदा हाेईल, या भूमिकेतून कार्य केले जाणार आहे. नीरीने नेहमी लाेकांना केंद्रस्थानी ठेवून कार्य केले आहे. पण यापुढे ते अधिक लाेकाभिमुख करण्यावर भर राहील, अशी भावना डाॅ. वैद्य यांनी व्यक्त केली. नीरी संस्था कायम विद्यार्थी फ्रेन्डली राहिली आहे व पुढेही राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

घनकचरा व्यवस्थापनाला वैज्ञानिक जाेड देण्याचा प्रयत्न

देशात स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरचा क्रमांक घसरला, यावर विचारले असता त्यांनी सांगितले, शहरातील घनकचरा व्यवस्थापन व अंमलबजावणी हे स्थानिक प्रशासनाच्या कार्याचा भाग आहे. पर्यावरण संस्था म्हणून तंत्रज्ञान व व्यवस्थापनाची प्रक्रिया विकसित करणे हा आमच्या कार्याचा भाग आहे. शहरातील घनकचऱ्याचे विकेंद्रीकरण प्रक्रियेने व्यवस्थापन करता येईल काय, यावर कार्य सुरू आहे. याशिवाय पुन्हा नव्या पद्धती विकसित करून प्रशासकीय भागाला वैज्ञानिक पद्धतीची जाेड देण्याचा प्रयत्न करण्याची भूमिका डाॅ. वैद्य यांनी मांडली.

भविष्यातील महामारीसाठी सज्ज

काेराेनासारख्या आजाराच्या उपचारासाठी सीएसआयआरच्या इतर संस्था कार्यरत आहेतच. त्यांना सहायक म्हणून नीरीचे कार्य सुरू राहील. काेराेनाच्या डिटेक्शनच्या प्रक्रियेत नीरीने महत्त्वाचे याेगदान दिले आहे. काेराेना डिटेक्शन हब म्हणून नीरीने काम केले आहे. पर्यावरण बदल किंवा ग्लाेबल वार्मिंगमुळे भविष्यात अशा आजारांचा प्रकाेप हाेण्याची शक्यता आहे. अशावेळी संशाेधन संस्था म्हणून मॅंडेटमध्ये जे कार्य राहील, ते आम्ही करू. अशा समस्यांशी निपटण्यासाठी आम्ही सज्ज आहाेत, असा विश्वास त्यांनी दिला.

औद्याेगिक कचरानिर्मिती कमी करण्यावर भर

उद्याेगातून निघणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापनाची पद्धत आतापर्यंत वापरली जात आहे. मात्र ही प्रक्रिया फार खर्चिक असते. त्यापेक्षा उत्पादनावर परिणाम हाेऊ न देता औद्याेगिक कचऱ्याची निर्मितीच कशी कमी करता येईल, यानुसार संशाेधन कार्य करण्यावर भर राहणार असल्याचे डाॅ. वैद्य यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :pollutionप्रदूषण