शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

२०७० पर्यंत देश कार्बनमुक्त करणे हे नीरीचे ध्येय; तीन-चार वर्षांत दिसतील परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 07:00 IST

Nagpur News पर्यावरणीय संशाेधन संस्था म्हणून या ध्येयपूर्तीसाठी आतापासूनच त्यानुसार संशाेधनाचे प्रकल्प राबविण्यावर नीरीचा फाेकस राहील, अशी ग्वाही राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था(नीरी)चे नवनियुक्त संचालक डाॅ. अतुल वैद्य यांनी दिली.

ठळक मुद्देसंचालक अतुल वैद्य यांची ग्वाही

निशांत वानखेडे

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी २०७० पर्यंत भारत देश कार्बनमुक्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. पर्यावरणीय संशाेधन संस्था म्हणून या ध्येयपूर्तीसाठी आतापासूनच त्यानुसार संशाेधनाचे प्रकल्प राबविण्यावर नीरीचा फाेकस राहील, अशी ग्वाही राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था(नीरी)चे नवनियुक्त संचालक डाॅ. अतुल वैद्य यांनी दिली.

संचालक पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लाेकमतशी बाेलताना डाॅ. वैद्य यांनी त्यांच्या भविष्यातील याेजनांबाबत भूमिका मांडली. स्वच्छ पर्यावरण हे नीरीचे ब्रीदवाक्य आहे. पर्यावरण बदल, ग्लाेबल वार्मिंग या समस्या जगाला भेडसावत आहेत. त्यानुसार कार्बन आणि ग्रीन हाऊस गॅसेसचे उत्सर्जन कसे नियंत्रित करता येईल, याबाबत कार्य केले जाणार आहे. निघणारे कार्बन कॅप्चर करून त्याचा पुनर्वापर करण्यावर संशाेधन कार्य सुरू आहे. नीरी येत्या तीन-चार वर्षात बरेचशे तंत्रज्ञान आणि प्रक्रिया विकसित करेल व हे संशाेधन कार्य जनतेला दिसेल, असा विश्वास डाॅ. वैद्य यांनी व्यक्त केला.

काेराडी औष्णिक वीज प्रकल्पाजवळ बांबू प्लॅन्टेशनचा प्रकल्प यशस्वी केला आहे. त्यानुसार ओसाड जमिनीवर अधिकाधिक वृक्षाराेपण कसे करता येईल, यासाठीच्या प्रक्रियेबाबत काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय जलप्रदूषण, वायूप्रदूषण याबाबत सुरू असलेले नेहमीचे संशाेधन सुरूच राहणार, असे त्यांनी स्पष्ट केले.

संशाेधनकार्य लाेकाभिमुख व पारदर्शक करण्यावर भर

शासकीय संस्था म्हणून सरकारच्या धाेरणाशी नीरी बांधील आहे. त्या धाेरणाला धरून स्वच्छ पर्यावरणासाठी संस्थेमध्ये हाेणारे संशाेधन कार्य लाेकांना सहज उपलब्ध हाेईल, समाजाला त्याचा फायदा हाेईल, या भूमिकेतून कार्य केले जाणार आहे. नीरीने नेहमी लाेकांना केंद्रस्थानी ठेवून कार्य केले आहे. पण यापुढे ते अधिक लाेकाभिमुख करण्यावर भर राहील, अशी भावना डाॅ. वैद्य यांनी व्यक्त केली. नीरी संस्था कायम विद्यार्थी फ्रेन्डली राहिली आहे व पुढेही राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

घनकचरा व्यवस्थापनाला वैज्ञानिक जाेड देण्याचा प्रयत्न

देशात स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरचा क्रमांक घसरला, यावर विचारले असता त्यांनी सांगितले, शहरातील घनकचरा व्यवस्थापन व अंमलबजावणी हे स्थानिक प्रशासनाच्या कार्याचा भाग आहे. पर्यावरण संस्था म्हणून तंत्रज्ञान व व्यवस्थापनाची प्रक्रिया विकसित करणे हा आमच्या कार्याचा भाग आहे. शहरातील घनकचऱ्याचे विकेंद्रीकरण प्रक्रियेने व्यवस्थापन करता येईल काय, यावर कार्य सुरू आहे. याशिवाय पुन्हा नव्या पद्धती विकसित करून प्रशासकीय भागाला वैज्ञानिक पद्धतीची जाेड देण्याचा प्रयत्न करण्याची भूमिका डाॅ. वैद्य यांनी मांडली.

भविष्यातील महामारीसाठी सज्ज

काेराेनासारख्या आजाराच्या उपचारासाठी सीएसआयआरच्या इतर संस्था कार्यरत आहेतच. त्यांना सहायक म्हणून नीरीचे कार्य सुरू राहील. काेराेनाच्या डिटेक्शनच्या प्रक्रियेत नीरीने महत्त्वाचे याेगदान दिले आहे. काेराेना डिटेक्शन हब म्हणून नीरीने काम केले आहे. पर्यावरण बदल किंवा ग्लाेबल वार्मिंगमुळे भविष्यात अशा आजारांचा प्रकाेप हाेण्याची शक्यता आहे. अशावेळी संशाेधन संस्था म्हणून मॅंडेटमध्ये जे कार्य राहील, ते आम्ही करू. अशा समस्यांशी निपटण्यासाठी आम्ही सज्ज आहाेत, असा विश्वास त्यांनी दिला.

औद्याेगिक कचरानिर्मिती कमी करण्यावर भर

उद्याेगातून निघणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापनाची पद्धत आतापर्यंत वापरली जात आहे. मात्र ही प्रक्रिया फार खर्चिक असते. त्यापेक्षा उत्पादनावर परिणाम हाेऊ न देता औद्याेगिक कचऱ्याची निर्मितीच कशी कमी करता येईल, यानुसार संशाेधन कार्य करण्यावर भर राहणार असल्याचे डाॅ. वैद्य यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :pollutionप्रदूषण