शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

‘उत्पादनाचा स्तर वाढविण्यासाठी कृषी क्षेत्र मजबूत करण्याची गरज’ - गजेंद्रसिंह शेखावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:41 AM

उत्पादनाचा स्तर वाढविण्यासाठी कृषी क्षेत्राचे मजबुतीकरण महत्त्वाचे असून देशात सहकारी शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी व्यक्त केले.

नागपूर : उत्पादनाचा स्तर वाढविण्यासाठी कृषी क्षेत्राचे मजबुतीकरण महत्त्वाचे असून देशात सहकारी शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी व्यक्त केले.शेखावत यांनी शनिवारी ‘लोकमत भवना’ला सदिच्छा भेट दिली आणि संपादकीय चमूसोबत चर्चा केली. लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले.कृषी क्षेत्राचे तीन कारणांमुळे नुकसान झाले आहे. ६२ टक्के कृषीक्षेत्र भूजलावर अवलंबून असून पाणीपुरवठा अपुरा आहे. रासायनिक खतांच्या अतोनात वापरामुळे जमिनीचा पोत खराब झाला आहे आणि तिसरे कारण म्हणजे कौटुंबिक विभाजनामुळे जमिनीचे तुकडे झाले आहेत. देशात भूधारकाकडे सरासरी ०.८ एकर जमीन असल्यामुळे शेती अप्रभावी झाली आहे, असे शेखावत यांनी सांगितले.शेखावत यांनी उद्योजक म्हणून इथियोपिया आणि आॅस्ट्रेलिया या देशांमध्ये १२ हजार एकर जमीन घेतली आहे. आॅस्ट्रेलियातील लोकशाही सरकारतर्फे विदेशी गुंतवणूकदारांना पाच वर्षांपर्यंत कर माफ करून कृषी जमीन लीजवर दिली जाते. पाच वर्षांनंतर जमिनीतून होणाºया उत्पन्नावर ३० टक्के आयकर द्यावा लागतो. इथियोपिया येथील बहुतांश जमीन पडीक असून या जमिनीचा एक मीटरपर्यंतचा थर उपजाऊ आहे. त्यामुळे जास्त उत्पादन मिळते. भारतात हा थर केवळ १० इंच आहे. आदीस अबाबाजवळील जमीन गुलाबाच्या फुलांसाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे इथियोपिया जगात सर्वाधिक फूल उत्पादक देश बनला आहे. इथियोपिया भारतीय गुंतवणूकदारांना तेलबियांच्या कंत्राटी शेतीसाठी प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी विजय दर्डा यांनी ‘पब्लिक इश्यू बिफोर पार्लमेंट अ‍ॅण्ड स्ट्रेट थॉट्स’ हे पुस्तक आणि ‘लोकमत समाचार’चा ‘अत्त दीप भवो’ हा दिवाळी अंक शेखावत यांना भेट दिला.

टॅग्स :Farmerशेतकरी