शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

जयंत पाटलांचा फडणवीसांवर निशाणा, अजित पवार मदतीला धावले; नेहमीच्या शैलीत फटकारलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 15:41 IST

जयंत पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी आणखी वाढवायला हवा होता, असा मुद्दा उपस्थित करत फडणवीसांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.

Ajit Pawar Vs Jayant Patil ( Marathi News ) : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. विरोधी पक्षाच्या वतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी आज सभागृहात अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उभे राहिले होते. मात्र यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अधिवेशन कालावधी आणखी वाढवायला हवा होता, असा मुद्दा उपस्थित करत फडणवीसांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे तडकाफडकी उठले आणि त्यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत जयंत पाटील यांना फटकारलं.  इथे वेगळं बोलायचं आणि बाहेर वेगळं बोलायचं हे धंदे बंद करा, असं अजित पवार हे जयंत पाटलांना उद्देशनू म्हणाले.

विदर्भात अधिवेशन होत असताना विरोधी पक्षाने विदर्भाचा विषय मांडला नसल्याचा आम्हाला खेद वाटतो, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीसांच्या या टीकेला उत्तर देताना जयंत पाटील यांनी अधिवेशन कालावधीचा मुद्दा उपस्थित करत म्हटलं की, "विदर्भाचा विषय सत्ताधारी पक्षाने मांडल्यामुळे आम्ही मांडला नाही. 'ऑर्डर ऑफ द डे'मध्ये आजही तो विषय आहे आणि त्यावर चर्चा होणार आहे म्हणून आम्ही सगळेजण बसून आहोत. मात्र दहा दिवस अधिवेशन घ्यायचं आणि तिकडून दोन प्रस्ताव व या बाजूने एक प्रस्ताव किंवा इथून दोन प्रस्ताव आणि तिकडून एक प्रस्ताव असं तुम्ही करत आहात. त्यापेक्षा अधिवेशन एक महिन्याचं घ्यावं, अशी आमची मागणी होती," असं पाटील म्हणाले.

अधिवेशन कालावधीवरून जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करताच उत्तर देण्यासाठी अजित पवार उठू लागले. त्यावर जयंत पाटील यांनी आधी कोणी बोलायचं हे बसून ठरवा, असं म्हटलं. त्यानंतर आक्रमक झालेले अजित पवार जयंत पाटलांना फटकारत म्हणाले की, " बसून ठरवण्याची गरज नाही. आमचं अण्डरस्टँडिंग खूप चांगलं आहे. कधी कोणी बोलायचं हे कळतं आम्हाला. अंतिम आठवडा प्रस्ताव काल आला. तेव्हा विरोधी पक्षाला कळालं होतं की अधिवेशन उद्या संपणार आहे. त्यावेळीच त्यांनी विधानसभा अध्यक्षांना सांगायला पाहिजे होतं की आम्हाला अंतिम आठवडा प्रस्ताव द्यायचा नाही. इथे वेगळं बोलायचं आणि बाहेर वेगळं बोलायचं हे धंदे बंद करा," अशा शब्दांत अजित पवारांनी पाटलांना खडसावलं.

दरम्यान, राष्ट्रवादीतील फुटीनंतर जाहीर सभांमधून दोन्ही गटाचे नेते अनेकदा एकमेकांवर निशाणा साधताना पाहायला मिळत होते. या नेत्यांमधील संघर्ष आता थेट सभागृहातही पोहोचल्याचं आज अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये झालेल्या खडाजंगीतून दिसून आलं. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस