शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

३१० पक्ष्यांची नोंद असूनही नवेगाव बांध उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 4:54 PM

गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध हे अभयारण्य वैविध्यपूर्ण असल्याचे मानले जाते. विविध वनराईसोबतच येथे असलेले निरनिराळे पक्षी हे येथील वेगळेपण आहे. पक्षी अभयारण्याचा दर्जा नसतानाही येथे ६०० पैकी ३१० पक्ष्यांची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देवैविध्यपूर्ण जंगल प्रतीक्षा पक्षी अभयारण्याचा दर्जा मिळण्याची

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध हे अभयारण्य वैविध्यपूर्ण असल्याचे मानले जाते. विविध वनराईसोबतच येथे असलेले निरनिराळे पक्षी हे येथील वेगळेपण आहे. पक्षी अभयारण्याचा दर्जा नसतानाही येथे ६०० पैकी ३१० पक्ष्यांची नोंद झाली आहे. मात्र एवढे असूनही नवेगाव बांध मात्र उपेक्षितच आहे. निसर्गाच्या या अनमोल क्षेत्राला पक्षी अभयारण्याचा दर्जा देण्याची मागणी आता पुढे येत आहे.नवेगावमध्ये पक्ष्यांच्या अभ्यासासाठी बराच वाव आहे. अनेक प्रकारचे पक्षी येथे वास्तव्यास असून पक्षी निरीक्षक सलीम अली, मारुती चितमपल्ली यांनी अनेक पक्ष्यांच्या नोंदी करून ठेवल्या आहेत. पक्षी निरीक्षणाला आणि पक्ष्यांच्या अभ्यासाला येथे बराच वाव आहे. पक्षी अधिवास, स्थलांतरित पक्षी, त्यांचा अभ्यास करण्यासाठी अनेक पक्षिमित्र उत्सुक असले तरी वनविभाग आणि शासनाकडून त्यासाठी वेगळा दर्जा मिळावा, अशी अनेकांची अपेक्षा आहे. येथील उत्तम वातावरणात फोटोग्राफी, डॉक्युमेंटेशनला वाव असल्याने हे क्षेत्र पक्षी अभ्यासकांना नेहमीच खुणावत असते.

या तलावात २५-३० वर्षापूर्वी ५ फुटी कासव (चाम), लाखो पाणकावळे व पाणमांजर (हुदाळ्या) आढळत. पण आता नामशेष झाले आहेत. पक्षी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी आणि वाढीसाठी उपाययोजनांची गरज आहे. जनप्रतिनिधींनीही अलिकडेच हे क्षेत्र पक्षी अभयारण्य करा, अशी मागणी केली आहे.नवेगाव बांधचा मागोवानवेगाव बांध तलाव हा सर्वात जुना व मोठा तलाव आहे. चिमण पाटील कोहळी यांनी या जलाशयाची निर्मिती केली, असा उल्लेख भंडारा जिल्हा गॅझेटिअरमध्ये असून हे जलाशय १६५० ते १७१५ इ.स. या काळात झाल्याची नोंद आहे. १२ गावे बाहेर काढून व जंगल तोडून हे जलाशय बांधण्यात आले होते, यावरून त्याची व्याप्ती लक्षात येते. तलावाच्या दक्षिणेकडे पर्यटन संकुल क्षेत्र आहे. मात्र अपुऱ्या माहितीमुळे पर्यटक या क्षेत्रालाच राष्ट्रीय उद्यान समजतात. परंतु १९७५ ला घोषित झालेले नवेगाव राष्ट्रीय उद्यान तलावाच्या उत्तरेकडे असून अत्यंत घनदाट व जैवविविधतेने परिपूर्ण आहे.पक्षी अभयारण्यामुळे येऊ शकते उपजीविकेवर गदावन अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत हजारो हेक्टर वनजमीन वाटप होत असताना शेकडो वर्षांपासून असलेले हक्क डावलून पक्षी अभयारण्य घोषित करण्याचा घाट कशासाठी, असा प्रश्न सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी अशोक खुणे यांनी उपस्थित केला आहे. लोकांच्या उपजीविकेवर गदा आणून पक्षी अभयारण्य उभारण्यापेक्षा पक्षी कमी होण्याची कारणे शोधा व त्यावर उपाययोजना करा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.नवेगावच्या विकासासाठी एवढे करानवेगाव क्षेत्राच्या विकासासाठी स्थानिकांकडून अनेक अपेक्षा आहेत. त्यातून रोजगार वाढीसोबतच पर्यटनाला चालना मिळणार असल्याने बेरोजगारीवरही मात करता येणार आहे. त्यासाठी काही अपेक्षा स्थानिकांच्या आहेत. मनोहर उद्यान व सरोवर दर्शन उद्यानाचा नव्याने विकास, पर्यटन विकासासाठी आवश्यक बांधकाम, बेशरम निर्मूलन, पक्षी थांबे, निवासी पक्ष्यांच्या अधिवासाचा अभ्यास करून आवश्यक असलेली वृक्ष लागवड, देवधान लागवड व गुरेचराई नियंत्रण आदीसह इंटरप्रिटेशन सेंटर, वॉच टावर व बॅटरीवर चालणारी मिनिसिटर बस या अपेक्षा आहेत. लोकसहभागही यात महत्त्वाचा ठरणार आहे.

 

टॅग्स :Navegaonbandh Sanctuaryनवेगावबांध अभयारण्य