शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय शिक्षा नीती समाजातील दरी वाढविण्यासाठीच ! देवीदास घोडेस्वार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 20:59 IST

नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०१९ हे निव्वळ कामगार वर्ग तयार करण्याचे षड्यंत्र आहे. समाजात दोन वर्ग तयार करून श्रमिकवर्ग निर्माण करण्याचा आणि समाजातील दरी वाढविण्याचाच हा डाव आहे. त्यामुळे त्याचा सर्व स्तरातून विरोध व्हावा, असे मत प्रा. देवीदास घोडेस्वार यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०१९ हे निव्वळ कामगार वर्ग तयार करण्याचे षड्यंत्र आहे. समाजात दोन वर्ग तयार करून श्रमिकवर्ग निर्माण करण्याचा आणि समाजातील दरी वाढविण्याचाच हा डाव आहे. त्यामुळे त्याचा सर्व स्तरातून विरोध व्हावा, असे मत प्रा. देवीदास घोडेस्वार यांनी व्यक्त केले.स्थानिक संविधान चौकात मंगळवारी दुपारी राष्ट्रीय शिक्षा नीती-२०१९ चा निषेध आणि धरणा सभा झाली. त्या प्रसंगी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. याप्रसंगी असोसिएशन फॉर सोशल अ‍ॅन्ड इकॉनॉमी इक्वालिटीचे प्रा. गौतम कांबळे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे, आदिवासी विद्यार्थी संघाचे संस्थापक नरेंद्र कोडवते, नागपूर युनिट जमाते इस्लामी हिंदचे अध्यक्ष अनवर सिद्धीकी, हरीश जानोरकर, प्रहार संघटनेचे प्रदीप उबाले, कुणबी सेनाचे अध्यक्ष सुरेश वर्षे, बुद्धविहार समन्वय समितीचे अशोक सरस्वती, महिला क्रांती परिषदेच्या अध्यक्ष सरोज आगलावे, भंते नागदीपांकर, भय्या खैरकर, मातंग समाज महासंघाचे सरचिटणीस राजू सोरगिले यांच्यासह अनेक वक्ते आणि प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी नेक वक्त्यांनी हा प्रकार म्हणजे शिक्षणाचे ब्राह्मणीकरण आणि बाजारीकरण असल्याचा आरोप केला. हे धोरण समान शिक्षण देणारे नाही. खाजगी शाळांना हे धोरण लागू नसल्याने दुजाभाव स्पष्ट दिसतो. सार्वजनिक क्षेत्रातील शाळांना मातृभाषेचा आग्रह आणि खासगी शिक्षण संस्थांना इंग्रजी माध्यमांची अनुमती यात आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळात शिकविण्याची ऐपत निर्माण होणार नाही, अशीच व्यवस्था यात असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. परंपरागत जाती व्यवसायावर आधारित व्यवसायाचे शिक्षण घेण्याचा यात असलेला आग्रह म्हणजे जातीय वर्ग कायम ठेवण्याचे षड्यंत्र आहे. हे धोरण कार्पोरेट सेक्टरला अनुकूल असून भविष्यात याचा राजकारणावर प्रभाव वाढण्याची भीतीही यावेळी व्यक्त करण्यात आली. वंचितांची वंचितता वाढविणारे आणि अर्धकुशल श्रमिक निर्माण करून शासन प्रशासनात सर्वसामान्यांना डावलण्याचा हा प्रयत्न असल्याचे मत यावेळी वक्त्यांनी मांडले. यावेळी मिलिंद फुलझेले, सुजित बागडे, राजेश काकडे, प्रा. गौतम कांबळे, क्रिष्णा कांबळे, सुरेश वलसे, दिलीप अबाळे, राजू सोरगिले, हरीश जानोरकर, अशोक बोंदाडे, ममता बोदले आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. संचालन भय्या खैरकर यांनी केले. सायंकाळपर्यंत धरणे देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनEducationशिक्षण