१९३६ साली नासुप्रची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST2021-02-06T04:11:02+5:302021-02-06T04:11:02+5:30
बाॅक्स १९३६ साली नासुप्रची स्थापना नागपूर शहर व लगतच्या नवीन भागाचा विकास करण्यासाठी सन १९३६ साली नागपूर सुधार प्रन्यास ...

१९३६ साली नासुप्रची स्थापना
बाॅक्स
१९३६ साली नासुप्रची स्थापना
नागपूर शहर व लगतच्या नवीन भागाचा विकास करण्यासाठी सन १९३६ साली नागपूर सुधार प्रन्यास या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली होती. तथापि, २००२ साली नागपूर सुधार प्रन्यासकडून राबविण्यात येत असलेल्या सात योजना वगळून नागपूर महानगरपालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित करण्यात आले. तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनयम १९६६ च्या तरतुदीनुसार नागपूर महानगर विकास प्राधिकरण म्हणून स्थापना झालेली आहे.
एकाच प्रयोजनासाठी नागपूर शहरात दोन प्राधिकरणे अस्तित्वात असल्यामुळे संभ्रम निर्माण होत असल्याने एकच प्राधिकरण असावे, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र नासुप्र बरखास्तीच्या घोषणेनंतर शहरातील गुंठेवारीची प्रकरणे नियमित करण्यात आलेली शिथिलता व त्या अनुषंगाने विकास कामे रखडल्याने नासुप्र बरखास्त करू नये, यासाठी नागरिकांकडून लोकप्रतिनिधींकडे मागणी वाढली होती.
बाॅक्स..
भाजपचा विरोध, शासनाच्या निर्णयाचा निषेध
नासुप्र बरखास्ती रद्द करण्याबाबत राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाला भाजपने विरोध दर्शविला आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांनी शासनाच्या या निर्णयाचा निषेध नोंदविला आहे. विद्यमान महाराष्ट्र सरकारने शहरातील जनतेला अंधारात लोटण्याचा निर्णय घेतला आहे. नासुप्रच्या चुकीच्या कार्यप्रणालीमुळे शहरातील अनधिकृत ले-आऊटची संख्या वाढली होती. त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने नासुप्रचे महानगरपालिकेमध्ये विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू केली होती. ज्या राजकीय पक्षांनी नासुप्रच्या चुकीच्या कार्यप्रणाली विरोधात अनेक आंदोलन केली, त्याच राजकीय पक्षांच्या नेतृत्वात पुन्हा नासुप्रचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शहरातील जनतेला पुन्हा एकदा अंधारात लोटण्याचा हा प्रकार आहे, असे महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले.