शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

Nanar Refinery Project : विनाशकारी नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहिजे- सुनील प्रभू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 12:05 PM

12 गावांतील जमीनधारकांची बनावट कागदपत्रे सादर करून भूमी संपादित करणा-या अधिका-यांची चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी

नागपूर - नाणार प्रकल्पाबाबत विधानसभेत शिवसेना आक्रमक भूमिका स्वीकारली आहे.  स्थगन प्रस्तावाद्वारे 12 गावांतील जमीनधारकांची बनावट कागदपत्रे सादर करून भूमी संपादित करणा-या अधिका-यांची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभू, प्रताप सरनाईक, वैभव नाईक, बालाजी किणीकर यांनी केली आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारा गावांतील मूळ मालकांचे खोटे प्रमाणपत्र तयार करून अधिका-यांच्या माध्यमातून जमिनी बळकावण्याचे काम सरकार करीत आहे. याचा शिवसेनेने निषेध केला आहे. या प्रश्नावर विधानसभेत चर्चा व्हावी ही आमची मागणी आहे. या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला आहे. हा विषयावर पटलावर यावा व त्याची नोंद केली जावी यासाठी चर्चा करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.  जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असाही इशारा प्रभू यांनी दिला.

('शिवसेना कोकणवासियांची दिशाभूल करतेय', नाणार प्रकल्पावरुन शिवसेना-काँग्रेसमध्ये वाद)

दरम्यान,  केवळ शिवसेनाच नाहीतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनंही नाणार प्रकल्प मुद्यावरुन रिंगणात उडी घेतली आहे. नाणार मुद्यावर चर्चा करण्याची आमदारांकडून मागणी केली जात आहे. यावेळी सभागृहात विरोधकांसह शिवसेनेच्या आमदारांनीही वेलमध्ये उतरुन सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात सुरुवात केली. तर दुसरीकडे नाणार प्रकल्पावरुन शिवसेना आणि काँग्रेसमधील आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळामुळे अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित केले.

'नाणार'वरुन शिवसेना-काँग्रेसमध्ये वादंग

शिवसेना नाणारवासियांची दिशाभूल करत असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हणताच, शिवसेनेच्या आमदारांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली. यामुळे सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले.

'विखे-पाटील यांनी शिवसेनेला शिकवू नये'

नाणार प्रकल्पावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर काँग्रेस आणि काही लोकांना हे बोचले, अशी टीका शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. यातूनच शिवसेनेविरुद्ध जहरी भाषा बोलण्याचे त्यांनी काम केले. शेतक-यांचा संप मोडण्यात पुढाकार घेणाऱ्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी शिवसेनेला शिकवू नये, असेही नीलम गो-हे यांनी यावेळी म्हटले. शिवाय, शिवसेना नाणारवासियांच्या बाजूने असताना फूट पाडण्याचे प्रयत्न करू नये, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पShiv Senaशिवसेना