शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

जनता समजदार; कोल्हापूरप्रमाणे भाजपची राज्यभर पोलखोल होणार; नाना पटोलेंची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2022 18:41 IST

योग्य वेळी जनता मतपेटीतून भाजपची पोलखोल करेल, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

ठळक मुद्देकेंद्रातील खुर्ची वाचविण्यासाठी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

नागपूर : ‘सर्वच पक्ष निवडणुकांची तयारी करीत आहेत. भाजपने पोलखोल यात्रा सुरू केली आहे. मात्र, जनता समजदार आहे. कोल्हापूरच्या जनतेने भाजपची चांगलीच पोलखोल केली. आता राज्यभरातील जनता मतदानाच्या माध्यमातून भाजपची पोलखोल करेल,’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी केली.

पटोले म्हणाले, ‘केंद्रातील भाजप सरकार गेल्या आठ वर्षांत अपयशी ठरले आहे. आता केंद्रातील खुर्ची वाचवण्यासाठी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतच आहे. राज्यातील मुस्लीम समाजाने ७२ टक्के भोंग्याचे आवाज कमी केले आहेत. काहींनी भोंगे काढले आहेत. राज्यातील भाईचारा संपू नये, यासाठी मुस्लीम समाज पुढाकार घेत असेल तर हे गौरवास्पद आहे.’

‘भाजपने पाच महिने एसटीचे आंदोलन तेवत ठेवले. जनतेला त्रास दिला. सदावर्तेंकडे नोटा मोजण्याची मशीन सापडली. ते कुठल्या नोटा मोजत होते, याची चौकशी होण्याची गरज आहे. एसटी कामगारांच्या मागण्या योग्य आहेत. सरकाने त्यांना न्याय द्यावा,’ अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपा