शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

जनता समजदार; कोल्हापूरप्रमाणे भाजपची राज्यभर पोलखोल होणार; नाना पटोलेंची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2022 18:41 IST

योग्य वेळी जनता मतपेटीतून भाजपची पोलखोल करेल, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

ठळक मुद्देकेंद्रातील खुर्ची वाचविण्यासाठी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

नागपूर : ‘सर्वच पक्ष निवडणुकांची तयारी करीत आहेत. भाजपने पोलखोल यात्रा सुरू केली आहे. मात्र, जनता समजदार आहे. कोल्हापूरच्या जनतेने भाजपची चांगलीच पोलखोल केली. आता राज्यभरातील जनता मतदानाच्या माध्यमातून भाजपची पोलखोल करेल,’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी केली.

पटोले म्हणाले, ‘केंद्रातील भाजप सरकार गेल्या आठ वर्षांत अपयशी ठरले आहे. आता केंद्रातील खुर्ची वाचवण्यासाठी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतच आहे. राज्यातील मुस्लीम समाजाने ७२ टक्के भोंग्याचे आवाज कमी केले आहेत. काहींनी भोंगे काढले आहेत. राज्यातील भाईचारा संपू नये, यासाठी मुस्लीम समाज पुढाकार घेत असेल तर हे गौरवास्पद आहे.’

‘भाजपने पाच महिने एसटीचे आंदोलन तेवत ठेवले. जनतेला त्रास दिला. सदावर्तेंकडे नोटा मोजण्याची मशीन सापडली. ते कुठल्या नोटा मोजत होते, याची चौकशी होण्याची गरज आहे. एसटी कामगारांच्या मागण्या योग्य आहेत. सरकाने त्यांना न्याय द्यावा,’ अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपा