शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

काँग्रेसच्या सभा मैदानाला ‘भारत जोडो’ नाव; काँग्रेस विचारधारेचा संदेश देण्यासाठी नागपूरची निवड- नाना पटोले

By कमलेश वानखेडे | Updated: December 25, 2023 18:52 IST

भाजप प्रणित सरकारने जी परिस्थिती निर्माण झाली त्याला लढा देण्यासाठी आम्ही तयार आहोत, असा विश्वास या रॅलीतून आम्ही जनतेला देणार आहोत, असे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

नागपूर : काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त २८ डिसेंबर रोजी नागपुरात ‘है तय्यार हम’ ही महारॅली होत आहे. रॅली होत असलेल्या बहादूरा येथील सभा स्थळाला ‘भारत जोडो मैदान’ असे नाव देण्यात आले आहे. बेरोजगारी, महागाई दूर करण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही तयार आहोत. भाजप प्रणित सरकारने जी परिस्थिती निर्माण झाली त्याला लढा देण्यासाठी आम्ही तयार आहोत, असा विश्वास या रॅलीतून आम्ही जनतेला देणार आहोत, असे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

पटोले म्हणाले, स्वातंत्र्य चळवळीत डिसेंबर १९२० मध्ये नागपूरच्या भूमितूनच महात्मा गांधी यांनी जुलमी, अत्याचारी ब्रिटिश सत्तेविरोधात असहकार आंदोलनाचा नारा दिला होता. शेवटी १९४७ मध्ये ब्रिटिशांना भारत देश सोडून पळून जावे लागले हा इतिहास आहे. नागपूरमधूनच १९५९ मध्ये इंदिरा गांधी यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याची घोषणा केली गेली होती. नागपूर हे देशातील मध्यवर्ती ठिकाण आहे. अशा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या नागपूर शहरातून एक काँग्रेस विचारधारेचा संदेश देण्यासाठी काँग्रेसचा १३८ वा स्थापना दिवस नागपुरात साजरा होत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकाअर्जुन खरगे यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेस कार्यसमितीचे प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत. काँग्रेसने रायपूरच्या अधिवेशनात जातीनिहाय जनगणनेचा प्रस्ताव पारीत केला होता. पण संघ परिवाराचा याला विरोध आहे. जातीनिहाय जनगणना झाली तर दूध का दूध होईल. आम्ही देशासाठी विचार करतो, ते स्वत:पुरता विचार करतात, अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी

माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सतिश चतुर्वेदी, आ. अभिजीत वंजारी, आ. वजाहत मिर्झा, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, अतुल कोटेचा, उमाकांत अग्नीहोत्री आदी उपस्थित होते.

इंडिया आघाडी जिंकणार- नुकताच एक सर्वे आला असून त्यानुसार काँग्रेससह इंडिया आघाडी जिंकणार असल्याचे स्प्ट झाले आहे. इंडिया आघाडीत आलेले पक्ष हे भाजप विरोधात लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेससोबत आले आहेत. हे पक्ष सीबीआय, ईडी च्या धाकाने

एकत्र आलेले नाहीत. काँग्रेस लोकशाही मानणारा पक्ष आहे. देशाच्या एकतेसाठी काँग्रेसने हे एकत्र केले आहे. सोनिया गांधी यांना दोनदा पंतप्रधान बनण्याची संधी होती. पण त्यांनी देशासाठी त्याग केला. त्यामुळे इंडिया आघाडीतील नेतृत्त्वाचा निर्णयही आघाडी एकत्रित घेईल, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

बॅलेटवर निवडणुका व्हाव्यात- ईव्हीएम बाबत नागरिकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. आपण दिलेले मत त्याच उमेदवाराला गेले की नाही याची मतदाराला खात्री राहिलेली नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने भूमिका घ्यायला हवी. जण भावना पाहून निवडणुका बॅलेट वर घेतल्या पाहिजे, अशी मागणी पचोले यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना ईव्हीएमचा विरोध करीत होते, असा टोलाही त्यांनी लगावला.

राज्य सरकार कर्जात बुडालेले-ज्महायुती सरकारहने मागील वर्षी ९६ हजार कोटींची मागण्या मंजूर केल्या. यावेळी ५५ हजर कोटीच्या मागण्या मान्य केल्या. राज्याचा बजेटच्या बरोबरीत पुरवणी मागण्या ठेवत आहेत. यावरून राज्य कर्जबाजारी झाले आहे हे स्पष्ट आहे. पाशवी बहुमताच्या भरवशावर लूट सुरू आहे, अशी टीकाही पटोले यांनी केली. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसnagpurनागपूर