शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

अंबाझरी तलावाला 'जलपर्णी'चा विळखा, वाढला प्रदूषणाचा धाेका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 14:45 IST

तलाव धोक्यात : पाण्यातील ऑक्सिजन घटतोय; मासे, सजीवांवर संकट

नागपूर : उपराजधानीचे वैभव असलेल्या अंबाझरी तलावाचे अस्तित्व संकटात सापडले आहे. नाईक तलाव आणि सक्करदरासारख्या तलावांना अक्षरश: नष्ट करणाऱ्या जलपर्णी म्हणजे इकाॅर्निया या वनस्पतीचा विखळा सध्या अंबाझरी तलावाला पडला आहे. पाण्यातील ऑक्सिजन संपवून मासे व तलावातील इतर जैवविविधतेला नष्ट करणारी जलपर्णी आता अंबाझरी तलावाला गिळंकृत करण्याच्या तयारीत आहे.

शेतात जसे तण असते तसे नद्या किंवा तलावात जलपर्णी असते. सुंदर अशी फुले आणि पाण्यावर तरंगणारी पसरट पाने आकर्षक वाटत असली तरी ही वनस्पती एखाद्या राक्षसापेक्षा कमी नाही. पर्यावरण अभ्यासक प्रा. शुभांगी जंगले यांच्या मते सर्वात वेगाने वाढणाऱ्या वनस्पतींमध्ये इकाॅर्नियाचा समावेश हाेताे. एका वर्षात एक वनस्पती तीन हजारांहून अधिक बियांची निर्मिती करू शकते. त्या बियांचे आयुष्य वीस वर्षांपर्यंत असते. ती पाण्यावर तरंगणारी असल्याने तिचा प्रसार झपाट्याने होतो आणि नियंत्रण करणे कठीण जाते. पसरट पानांमुळे ही वनस्पती वातावरणातील ऑक्सिजन तलावाच्या तळापर्यंत पाेहचू देत नाही. जलपर्णीच्या अनियंत्रित वाढीमुळे माशांना पुरेसे ऑक्सिजन मिळणे थांबते आणि मासे मरायला लागतात. त्यांचे उत्पादन घटते. तलावातील इतर सजीव, वनस्पती व जैवविविधता नष्ट हाेते. ऑक्सिजन घटल्याने पाण्याचा गढूळपणा वाढताे व दर्जा खराब हाेताे. हळूहळू तलावच नामशेष व्हायला लागतो.

जलपर्णी म्हणजे ‘बंगालचा आतंक’

जलपर्णी ही भारतीय वनस्पती नसून दक्षिण अमेरिकेतील आहे. भारतावर इंग्रजांचे राज्य असताना तिच्या आकर्षक फुलांना भाळून जाॅर्ज माॅर्गन नामक ब्रिटिश अधिकाऱ्याने एका काचेच्या भांड्यात ती काेलकात्याला आणली हाेती. तेव्हा काेलकाता ही देशाची राजधानी हाेते. इकॉर्नियाच्या आकर्षक रूपावर भाळून गेल्या शंभर वर्षांत ८० देशांतील पर्यटक, वनस्पती अभ्यासक आदींनी ती आपापल्या देशात नेली. मात्र तिची झपाट्याने वाढ हाेत असल्याने तेव्हा मुख्य व्यवसाय असलेल्या मासेमारीवर संकट आले हाेते. त्यामुळे जलपर्णीला बंगालचे आतंक असेही म्हणतात.

जलपर्णी म्हणजे धाेकादायक राक्षस

- झपाट्याने वाढणाऱ्या या वनस्पतीमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होते.

- पाण्यावर सूर्यप्रकाश पडण्यात अडथळा ठरत असल्याने इतर जीवांसाठी धोकादायक ठरते.

- घरातून निघणारे सिवेज व सांडपाण्यात या वनस्पतीची वाढ झपाट्याने हाेते.

- पाण्यातून डासांची उत्पत्ती होऊन मलेरिया रोग पसरतो, हेसुद्धा संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

- वैनगंगा नदी इकॉर्निया वनस्पतीमुळे प्रदूषित झाली होती. मासोळ्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन त्याचा मोठा फटका मत्स्य व्यवसायाला बसला होता.

- नागपुरातील नाईक तलाव नामशेष हाेत असून सक्करदरा तलाव पूर्णपणे प्रदूषित हाेण्याच्या मार्गावर आहे.

- इकॉर्निया असलेल्या नदीचे पाणी प्रदूषित हाेत असून मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.

- मासे व इतर जलचर प्राण्यांसाठी घातक ठरत आहे.

कशी नष्ट करावी?

रासायनिक तणनाशकाच्या साह्याने जलपर्णीचे नियंत्रण करण्याचेही प्रयोग झाले आहेत पण त्याला मर्यादा आहेत. जलपर्णीचे नैसर्गिक शत्रू असलेल्या किड्यांच्या (वॉटर हायसिंथ बीटल) साह्याने जलपर्णीचे नियंत्रण करण्याचे प्रयोग झिम्बाब्वे, केनिया, अमेरिका आदी देशांत यशस्वी झाले आहेत. जलपर्णीवर वाढणाऱ्या बुरशीच्या साह्यानेही तिचे नियंत्रण शक्य आहे; पण अद्याप व्यावसायिक पातळीवर ते उपलब्ध नाही.

टॅग्स :environmentपर्यावरणAmbazari Lakeअंबाझरी तलावnagpurनागपूर