शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

नागपूरकरांची पाणी चिंता मिटली : तोतलाडोहमध्ये दोन वर्षे पुरेल इतके पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 7:53 PM

नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. तोतलाडोह सिंचन प्रकल्प २०१३ नंतर पूर्ण क्षमतेने पहिल्यांदाच १ हजार ०१७ दलघमी म्हणजेच १०० टक्के भरला आहे. या प्रकल्पातून आता पुढील दोन वर्षे पुरेल एवढा जलसाठा उपलब्ध झाला आहे.

ठळक मुद्दे२०१३ नंतर पहिल्यांदाच १०० दलघमी विसर्गएक लक्ष हेक्टर क्षेत्राला मिळणार सिंचनासाठी पाणी, विजेची निर्मितीही पूर्ण क्षमतेने होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. तोतलाडोह सिंचन प्रकल्प २०१३ नंतर पूर्ण क्षमतेने पहिल्यांदाच १ हजार ०१७ दलघमी म्हणजेच १०० टक्के भरला आहे. मृतसाठ्यातून नागपूर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या या प्रकल्पातून आता पुढील दोन वर्षे पुरेल एवढा जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यासोबतच एक लक्ष चार हजार हेक्टर क्षेत्रालाही सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. प्रकल्प पूर्ण भरल्यानंतर १४ गेटमधून सरासरी १०० दलघमी एवढे पाणी या प्रकल्पातून पेंच नदीत सोडण्यात आले आहे. 

तोतलाडोह पेंच जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्र व मध्यप्रदेश यांचा संयुक्त प्रकल्प असून मागील पाच वर्षांपासून अनियमित पावसामुळे या प्रकल्पामध्ये जलसाठ्यात कायम तूट निर्माण झाली होती. मध्यप्रदेश शासनाने मागील वर्षी पेंच डायव्हरशन हा चौराई येथे प्रकल्प बांधल्यामुळे या प्रकल्पात येणारा प्रवाह खंडित झाला. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे चौराई प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे तब्बल पाच ते सहा वर्षांनी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. सध्या तोतलाडोह प्रकल्पात १०१६.८७६ दलघमी एवढा जलसाठा निर्माण झाला आहे. त्यासोबत ३४.९०० दलघमी एवढी पाण्याची आवक सातत्याने सुरू आहे.तोतलाडोह प्रकल्पातून नागपूर शहराला १७० दलघमी पाणी आरक्षित असून पेंच प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्राची सुमारे एक लक्ष चार हजार हेक्टर क्षेत्रासाठी ७०० दलघमी तसेच कोराडी व खापरखेडा या थर्मलपॉवर स्टेशनसाठी ६० दलघमी पाणी आरक्षित असल्याची माहिती कार्यकारी अभियंता जितेंद्र तुरखेडे यांनी दिली. मागील वर्षी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस पडला होता. तसेच चौराई प्रकल्पातून पाणी न सोडल्यामुळे नागपूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रकल्पात असलेल्या १५० दलघमी मृतसाठ्यातून ९० दलघमी पाण्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात आला होता. त्यामुळे जलविद्युत निर्मितीसुद्धा थांबविण्यात आली होती. ती आता पूर्ण क्षमतेने सुरू राहील.मध्यप्रदेश तसेच महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्यामुळे चौराई तसेच तोतलाडोह प्रकल्पसुद्धा पूर्ण क्षमतेने भरला असून १६ ऑगस्टपासून सरासरी १०० दलघमी पाणी पेंच नदीत सोडण्यात आले आहे. तसेच पेंच प्रकल्पसुद्धा पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पाणलोट क्षेत्रातील शेतीला सिंचनासाठी पाणी देणे सुलभ होणार आहे.नियोजनासाठी विशेष नियंत्रण कक्षतोतलाडोह प्रकल्पाच्या जल व पूर व्यवस्थापानाच्या नियोजनासाठी विशेष नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून जल संपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश धोटे व सहाय्यक अभियंता जयंत काठवटे हे प्रकल्पाच्या जलसाठ्याचे नियंत्रण करीत आहेत.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पर्यायी व्यवस्थामध्यप्रदेश शासनाने चौराई येथे ५७७ दलघमी एवढ्या क्षमतेच्या प्रकल्पाची निर्मिती केल्यामुळे पाणलोट क्षेत्रातील सिंचनावर विपरीत परिणाम होऊ नये. तसेच शहराला पिण्याचे पाणी कायम उपलब्ध व्हावे, यासाठी ४६८ कोटी रुपये खर्चाच्या सात उपसा सिंचन योजनांना शासनाने मान्यता दिली आहे. या उपाययोजना येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्याला प्राधान्य राहणार आहे. त्यामध्ये चार योजना कन्हान नदीवर असून यामध्ये बीड चितघाट, सिव्होरा, माथणी (मौदा), बाबदेव या उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे. यामध्ये निर्माण होणारे पाणी पेंच प्रकल्पाच्या कालव्यांमध्ये सोडण्यात येणार आहे.तातडीच्या उपाययोजनेंतर्गत कन्हान नदीसोबतच सूर नदीवरील काटी खमारी, बोरगांव नाला प्रकल्पावर हिंगणा उपसा सिंचन योजना तसेच चिंचोली उपसा सिंचन योजनेचा समावेश आहे. पेंच प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवताना कन्हान नदीतील पाणी शेतकऱ्यांना खरीपसाठी वापरण्याला प्राधान्य राहणार आहे. या प्रकल्पातून सरासरी १२० दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे.६२ किमी लांबीचा टनेलआंतरराज्य पाणी वाटप लवादानुसार मध्यप्रदेश शासनासोबत १० टीएमसी पाणी राज्याला उपलब्ध होणार असून यासाठी लोहभोगरी (छिंदवाडा) येथून कन्हान नदीवर बॅरेज बांधून ६२ किलोमीटर लांबीच्या टनेलमधून तोतलाडोह प्रकल्पात गुरुत्वाकर्षणद्वारे आणण्याच्या प्रकल्पाला शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेमुळे नागपूर शहराला पिण्याचे पाणी पुरविणे सुलभ होणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प पिण्याच्या पाण्यासाठी तयार करण्यात येणार असून जमिनीखालून टनेलद्वारे पाणी आणण्याचे नियोजित असून पर्यावरणाचा कुठेही ऱ्हास होणार नसल्याची माहिती कार्यकारी अभियंता जितेंद्र तुरखेडे यांनी दिली.

टॅग्स :DamधरणWaterपाणी