शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

नागपूर जि.प. सभापतींसाठी इच्छुकांची रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 21:28 IST

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर आता काँग्रेसपुढे सभापतींचे आव्हान उभे ठाकले आहे. काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यातच राष्ट्रवादीनेही दोन विषय समितीचे सभापती मागितले आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेसपुढे आव्हान : राष्ट्रवादी दोन सभापतींच्या प्रतीक्षेत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर आता काँग्रेसपुढे सभापतींचे आव्हान उभे ठाकले आहे. काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यातच राष्ट्रवादीनेही दोन विषय समितीचे सभापती मागितले आहेत. त्यामुळे काँग्रेस कुणाची नाराजी स्वीकारते हे बघणे महत्त्वाचे आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड ही मंत्री सुनील केदार यांच्या गटातील सदस्यांची झाली आहे. पण जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, ज्येष्ठ नेते नाना गावंडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव सुरेश भोयर यांच्या गटाचे सदस्य अजूनही प्रतीक्षेत आहेत. तिकडे ज्येष्ठ सदस्यसुद्धा अपेक्षा ठेवून आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्यांमध्ये शांता कुमरे, नाना कंभाले, शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले तापेश्वर वैद्य, कैलास राऊत यांचा समावेश आहे. त्याचबरोबर काँग्रेसमध्ये निवडून आलेले काही विशेष सदस्यसुद्धा आहेत. यात मोठ्या मतांनी निवडून आलेल्या अवंतिका लेकुरवाळे, सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या मुक्ता कोकड्डे यांचाही समावेश आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड करताना सुनील केदार यांनी आडमुठेपणाची भूमिका घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादीनेही उपाध्यक्षासाठी अर्ज भरले होते. पण दोन सभापतींच्या प्रस्तावावर काँग्रेसने सकारात्मक भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीने अर्ज मागे घेतले. जि.प.च्या दोन्ही मुख्य पदांवर निवड झालेले सदस्य हे सुनील केदार यांच्या गटाचे आहेत. त्यामुळे इतर नेत्यांच्या गटातील सदस्यांना सभापतिपद मिळतील, अशी अपेक्षा आहे. पण राष्ट्रवादीला दोन सभापतिपद दिल्यास काँग्रेसमध्येच नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस राष्ट्रवादीला एक सभापतिपद देण्याच्या मानसिकतेत आहे.दुसरीकडे राष्ट्रवादीने दोन सभापतीची मागणी केली आहे. राष्ट्रवादीमध्येही सभापती पदासाठी चंद्रशेखर कोल्हे, दिनेश बंग, उज्ज्वला बोढारे यांचे नाव चर्चेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीला दोन पदे न मिळाल्यास राष्ट्रवादी वेगळा विचार करण्याच्या मानसिकतेत आहे.अपेक्षा अनेकांच्या नेत्यांची मर्जीतसे शंकर डडमल, दुधाराम सव्वालाखे, मेघा मानकर, योगेश देशमुख, शालिनी देशमुख यांनी भाजप-सेनेच्या गडाला खिंडार पाडून काँग्रेसचे अस्तित्व निर्माण केले आहे. त्यामुळे या सदस्यांनाही सन्मानाची अपेक्षा आहे. पण नेत्यांच्या मर्जीवर सर्वकाही अवलंबून आहे.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरElectionनिवडणूकcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस