शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

नागपूर जि.प.कर्मचारी दोन महिन्यापासून पगाराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 12:19 AM

नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्यालय व १३ पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांचे गेल्या मार्च व एप्रिल या दोन महिन्याचे पगार न झाल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत. आता मे महिनाही सुरू झाला असून अद्यापही अनेक विभागातील कर्मचाऱ्यांचे पगारच झालेले नाहीत.

ठळक मुद्देकर्मचारी त्रस्त : प्रशासनही उदासीन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्यालय व १३ पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांचे गेल्या मार्च व एप्रिल या दोन महिन्याचे पगार न झाल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत. आता मे महिनाही सुरू झाला असून अद्यापही अनेक विभागातील कर्मचाऱ्यांचे पगारच झालेले नाहीत.कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी कास्ट्राईबसह विविध संघटनांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रिया तेलकुंटे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यांनी काही तांत्रिक अडचणीमुळे देयके कोषागार कार्यालयात पाठविता आली नाही, मात्र दोन दिवसात तांत्रिक अडचण दूर करुन पगाराचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आज या गोष्टीला १५ दिवस लोटले आहे. मात्र, यानंतरही तोडगा निघाला नाही. संघटनांनी याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर यांच्याशी देखील चर्चा करुन कर्मचाऱ्यांच्या भावना अवगत करुन मार्ग काढण्याची विनंती केली होती. मात्र, तेथूनही कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. एप्रिल महिन्यात सण, उत्सव व महापुरुषांच्या जयंत्या होत्या. मात्र वेळेवर पगार न झाल्यामुळे ते साजरे करण्याच्या उत्साहावर विरजण पडले. आता दोन महिन्यांपासून पगार न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. जेवढा पगारास विलंब होईल तेवढा घेतलेल्या कर्जावर भुर्दंड बसेल, काढलेल्या आवर्ती ठेवी, विमा, भविष्य निर्वाह निधीच्या व्याजावर फरक पडेल. शिवाय पगार देयके पुन्हा जनरेट करुन पुन्हा बीडीएस काढावे लागेल आदी बाबी संघटनेने वेळोवेळी वरिष्ठ अधिकाठयांच्या निदर्शनास आणून देऊन कोषागार कार्यालयात देयके सादर झाल्यानंतर संघटना सहकार्य करण्यास तयार असल्याचेही सांगण्यात आले होते. परंतु अद्यापही प्रश्न कायम आहे. जि.प.तील काही विभागांना गत मार्च महिन्याचाच पगार मिळाला आहे. तर अनेक विभागातील कर्मचाऱ्यांना मार्च व एप्रिल दोन्ही महिन्याचा पगार प्राप्त झाला नसल्याने कर्मचारी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.१ तारखेच्या पगाराचे काय झाले?जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी कर्मचाऱ्यांचे पगार हे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजेच १ तारखेला होईल. अशी ग्वाही आपला पदभार स्वीकारल्यानंतर दिली होती. मात्र, आज दोन - दोन महिने पगार मिळत नाही. त्यातल्या त्यात कर्मचाऱ्यांच्या विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश असो अथवा ट्युशन फी हे देखील काम आता कर्मचाऱ्यांना पैसे उधारीवर घेऊन मार्गी लावावे लागत असल्याचे, कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरEmployeeकर्मचारी