शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नागपूर जि. प. निवडणूक : महाविकास आघाडीचा प्रयोग फसला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 20:29 IST

राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर जिल्ह्यातही महाविकास आघाडीच्या फार्मुल्यावर निवडणुका पार पडतील, अशी अपेक्षा होती. पण जिल्ह्यात महाविकास आघाडीचा प्रयोग काही जुळून आला नाही.

ठळक मुद्देशिवसेनेचे एकला चलो : काँग्रेस-राष्ट्रवादीने जमविला जुगाड, पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर जिल्ह्यातही महाविकास आघाडीच्या फार्मुल्यावर निवडणुका पार पडतील, अशी अपेक्षा होती. पण जिल्ह्यात महाविकास आघाडीचा प्रयोग काही जुळून आला नाही. काँग्रेस राष्ट्रवादीने आघाडीचा जुगाड जमविला, पण शिवसेनेला सोबत घेतले नाही. त्यामुळे शिवसेनेने एकला चलोचा नारा देत ५५ जागेवर उमेदवार उभे केले. पण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीतही राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होत असताना गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ज्या जागा राखल्या होत्या. त्या जागेवर तेच पक्ष उमेदवार उभे करतील. मात्र इतर जागेवर समसमान वाटप करण्यात येईल. पण उमेदवारी देताना काँग्रेसने अपेक्षेपेक्षा जास्त उमेदवार पदरात पाडले. काँग्रेसने राष्ट्रवादीला ५८ पैकी १६ जागा दिल्या. पण त्यातही काँग्रेसने राष्ट्रवादीच्या काही जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला, ६ तालुक्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व काँग्रेसने नाकारल्याची ओरड राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. या नाराजीमुळे पदाधिकाऱ्यांकडून राजीनामेही पक्षाकडे पाठविण्यात आले. पण या प्रकारामुळे पक्षांमध्ये एक चुकीचा संदेश जात असल्याने नेत्यांनी नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढून राजीनामे स्वीकारले नाहीत.शिवसेनेने सुरुवातीला काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ देण्याचा निर्णय घेतला होता. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाच फार्मुला जुळत नसल्याने सेनेने स्वतंत्र पाऊल उचलले आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सेनेने बहुतांश जागेवर उमेदवार उभे केले. राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला. पण स्थानिक स्वराज्य संस्थेने त्याला यश आले नाही. त्यामुळे जिल्ह्यात कुठे तिरंगी तर कुठे चौरंगी लढत रंगणार असल्याचे चित्र आहे. भाजपाने सर्वच सर्कलमध्ये आपले उमेदवार उभे केले असून, त्यांच्यातही काही प्रमाणात फाटाफूट झाली आहे. त्याचा फटका भाजपालाही बसणार असल्याचे चिन्हे आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूकcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना