शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

नागपूर जिल्हा परिषदेच्या सर्कलची तिसऱ्यांदा होणार पुनर्रचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:00 AM

जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपून दोन वर्षे लोटली. यादरम्यान दोनवेळा सर्कलची पुनर्रचना व आरक्षण सोडत काढण्यात आली. मात्र आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे दोन्हीवेळा आयोगाने कार्यक्रम रद्द केला. अखेर निवडणूक आयोगाने बुधवारी नागपूरसह वाशिम, अकोला, नंदूरबार व धुळे जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणुकीची सर्कल रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार नागपूर जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत ३० मे रोजी होणार आहे.

ठळक मुद्दे३० मे रोजी होणार सर्कलनिहाय आरक्षणाची सोडतराज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपून दोन वर्षे लोटली. यादरम्यान दोनवेळा सर्कलची पुनर्रचना व आरक्षण सोडत काढण्यात आली. मात्र आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे दोन्हीवेळा आयोगाने कार्यक्रम रद्द केला. अखेर निवडणूक आयोगाने बुधवारी नागपूरसह वाशिम, अकोला, नंदूरबार व धुळे जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणुकीची सर्कल रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार नागपूर जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत ३० मे रोजी होणार आहे.या कारणास्तव रखडल्या निवडणुकाराज्य शासनाने नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी, वानाडोंगरी व बुटीबोरी या नगर परिषद व नगर पंचायती नव्याने गठित केल्या होत्या. त्यावर उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. तसेच जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत राखीव जागाचे आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त होत असल्याने जि.प.च्या माजी सदस्यांनी याचिका दाखल केली होती.निवडणूक आयोगाने का घेतला निर्णयन्यायालयाने राज्य शासनास ५० टक्के आरक्षणासंदर्भात तीन महिन्याच्या आत निर्णय घ्यावा, तोपर्र्यंत निवडणुका घेण्यात येऊ नयेत, असे निर्देश दिले होते. परंतु तीन महिन्याची मुदत संपल्यानंतरही शासनाने त्यासंदर्भात कसलाही निर्णय घेतला नाही. यासंदर्भात निवडणूक आयोगानेसुद्धा शासनाला वारंवार पत्र, सूचना व बैठका घेऊन सूचित केले, परंतु शासनाने त्याचीही दखल घेतली नाही. न्यायालयाने दिलेल्या कालावधीची मुदत संपल्यामुळे निवडणूक आयोगाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ (ई)नुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नागपूर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या १३ पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेसाठी आयोगाने आदेश दिले आहे. नवीन प्रभाग रचनेत बुटीबोरी नगर परिषद क्षेत्र वगळून जिल्ह्याच्या उर्वरित ग्रामीण क्षेत्रासाठी २०११ च्या जनगणनेच्या आधारे ५८ सदस्यसंख्येची पंचायत समिती क्षेत्रनिहाय सर्कलची विभागणी करायची आहे.असा आहे प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम

  •  प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे १८ एप्रिल रोजी सादर करायचा आहे.
  •  २५ मार्चपर्यंत विभागीय आयुक्तांनी प्रभाग रचनेस मान्यता द्यायची आहे.
  •  आरक्षण सोडतीची सूचना २७ एप्रिलला प्रसिद्ध करायची आहे.
  •  जिल्हा परिषद निवडणुकीची सोडत ३० एप्रिलला करायची आहे.
  •  पंचायत समितीची सोडत २ मे रोजी करायची आहे.
  •  हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी २ ते ६ मे आहे.
  •  हरकती व सूचनांवर सुनावणी १० मे रोजी घ्यायची आहे.
  •  अंतिम प्रभाग रचना व आरक्षण १३ मे रोजी प्रसिद्ध करायचे आहे.

सदस्य संख्या जैसे थेजिल्हा परिषदेतील पारशिवनी ही नगर पंचायत तर वानाडोंगरी व बुटीबोरी नगर परिषद गठित करण्यात आली आहे. त्यामुळे जि.प.चे ५८ पैकी किमान ३ सदस्य कमी होतील, अशी अपेक्षा होती. पण आयोगाने सर्कलची पुनर्रचना करताना ५८ सदस्य गृहित धरून सर्कल रचना करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची सदस्य संख्या जैसे थेच राहणार आहे.

 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूक