शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

नागपूर जिल्हा परिषदेत सुरू आहे अखर्चित निधीची गोळाबेरीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 7:34 PM

महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने जिल्हा परिषदेमार्फत खर्च होऊ न शकलेला निधी परत मागविला आहे. ३१ मेपर्यंत शासनाच्या कोषागारात जिल्हा परिषदेला निधी जमा करायचा होता. मात्र जिल्हा परिषदेत २०१२-१३ पासून शासनाकडून मिळालेला निधी खर्च होऊ शकला नाही. शासनाच्या निर्देशानुसार सध्या जिल्हा परिषदेत अखर्चित निधीची गोळाबेरीज सुरू आहे.

ठळक मुद्देसरकारच्या कोषागारात जमा करण्याच्या दिल्या सूचना : अनेक विभागात २०१२-१३ पासून निधी अखर्चित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने जिल्हा परिषदेमार्फत खर्च होऊ न शकलेला निधी परत मागविला आहे. ३१ मेपर्यंत शासनाच्या कोषागारात जिल्हा परिषदेला निधी जमा करायचा होता. मात्र जिल्हा परिषदेत २०१२-१३ पासून शासनाकडून मिळालेला निधी खर्च होऊ शकला नाही. शासनाच्या निर्देशानुसार सध्या जिल्हा परिषदेत अखर्चित निधीची गोळाबेरीज सुरू आहे.युती सरकारच्या काळात जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना डीबीटीमार्फत राबविण्याचे बंधन घातले होते. डीबीटीची प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने, लाभार्थ्याने त्याकडे पाठ दाखविली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहिला. तसे तर जिल्हा परिषदेच्या काही विभागांचा निधी २०१२-१३ पासून अखर्चित आहे. जिल्हा परिषदेच्या बँकेच्या खात्यात तो जमा आहे. दरवर्षी अखर्चित निधी शासनाला जमा करावा लागतो. मात्र विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने हा निधी पडून असतो. आता या निधीची गरज सरकारला भासत आहे. कोरोनामुळे सरकारची आर्थिक घडी डबघाईस आली आहे. कोरोनामुळे राज्यात २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. लॉकडाऊनद्वारे अनेक निर्बंध घालण्यात आल्यामुळे राज्याच्या कर व करेतर महसुलात घट होऊन राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव अजूनही वाढतच आहे. घातलेल्या निर्बंधानुसार राज्यातील आर्थिक घडी पुढील काही महिने अशीच राहणार आहे. या वित्तीय स्थितीतून बाहेर पडून राज्याच्या अर्थव्यवस्थेला उभारी आणण्याचे राज्यासमोर मोठे आव्हान आहे. त्या अनुषंगाने शासनाने विविध तरतुदी केल्या आहे. यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या योजना पुढे ढकलण्यासारख्या आहेत किंवा रद्द करण्यासारख्या आहेत, त्या रद्द करण्याच्या सूचना केल्या. विभागांना कार्यक्रमासाठी उपक्रमासाठी देण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पीय निधीला कात्री लावून केवळ ३३ टक्के निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवीन योजनांवर खर्च थांबविला. उणे प्राधिकारावर खर्च करण्यास प्रतिबंध आणले. खरेदी प्रस्तावांना मंजुरी नाकारण्यास सांगितले. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात विभागाकडे असलेला अखर्चित निधीसुद्धा सरकारच्या कोषागारात जमा करायला लावला.अखर्चित निधीची रक्कम ३१ मे पूर्वी शासनास समर्पित करावी, असे केल्याशिवाय पुढील देयके पारित केलीी जाणार नाहीत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. तसेच रक्कम शासनास समर्पित न केल्यास याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशीची कार्यवाही करण्यात येईल, असेही शासननिर्णयात सांगितले होते. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागाने आपल्या अखर्चित निधीचा आढावा घेतला. काही विभागांनी सरकारच्या कोषागारात रक्कम समर्पित केली तर काही विभागांचे काम शेवटच्या टप्प्यात सुरू आहे. अखर्चित निधीच्या माध्यमातून मोठा निधी राज्याच्या तिजोरीत जमा होणार आहे.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर