शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
7
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
8
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
9
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
10
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
11
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
12
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
13
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
14
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
15
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
16
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
17
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
18
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
19
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
20
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 

नागपूर जिल्हा परिषदेलाही निवडणुकीची प्रतीक्षा : दोन वर्षे फुकटची मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 7:57 PM

जिल्हा परिषदेच्या इतिहासात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना कदाचित पहिल्यांदाच सात वर्षाचा कार्यकाळ उपभोगायला मिळाला आहे. फुकट मिळालेल्या दोन वर्षाचा आता लोकप्रतिनिधींनाच वीट यायला लागला आहे. सदस्यांचे जि.प.कडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. विरोधकही थंडावले आहेत. काही पदाधिकारी खानापूर्ती म्हणून महिन्याभरात एक दोन दिवस दिसतात. दोन वर्षाचा अतिरिक्त कार्यकाळ मिळाला असतानाही ग्रामीण जनतेच्या काहीच ठोस पदरी पडले नाही. मुळात जनतेच्या पदरी पाडून देण्याचा उत्साहच जि.प.च्या लोकप्रतिनिधीमध्ये राहिला नाही. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची चिन्हे असताना जिल्हा परिषदेलालाही निवडणुकीची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देसदस्य, विरोधक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह राहिला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या इतिहासात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना कदाचित पहिल्यांदाच सात वर्षाचा कार्यकाळ उपभोगायला मिळाला आहे. फुकट मिळालेल्या दोन वर्षाचा आता लोकप्रतिनिधींनाच वीट यायला लागला आहे. सदस्यांचे जि.प.कडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. विरोधकही थंडावले आहेत. काही पदाधिकारी खानापूर्ती म्हणून महिन्याभरात एक दोन दिवस दिसतात. दोन वर्षाचा अतिरिक्त कार्यकाळ मिळाला असतानाही ग्रामीण जनतेच्या काहीच ठोस पदरी पडले नाही. मुळात जनतेच्या पदरी पाडून देण्याचा उत्साहच जि.प.च्या लोकप्रतिनिधीमध्ये राहिला नाही. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची चिन्हे असताना जिल्हा परिषदेलालाही निवडणुकीची प्रतीक्षा आहे.नागपूर जिल्हा परिषदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ मार्च २०१७ मध्येच संपुष्टात आला. परंतु न्यायालयीन प्रक्रियेत जि.प.ची निवडणूक अडकल्यामुळे अजूनपर्यंत सरकारला निवडणुकीचा निर्णय घेता येऊ शकला नाही. राज्य सरकारने जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत ‘जैसे थे’चे परिपत्रक जारी केले. त्यावर दोन वर्षातही शासन निर्णय घेऊ शकले नाही. परिणामी मुदतवाढ कायम आहे. विद्यमान अध्यक्ष व पदाधिकारी साडेचार वर्षांपासून पदासोबतच शासकीय सुविधांचा लाभ घेत आहेत. नियमानुसार जि.प. अध्यक्षांचा कार्यकाळ अडीच-अडीच वर्षांचा असतो. परंतु, निवडणूक न झाल्यामुळे सर्वच पदाधिकाऱ्यांना साडेचार वर्ष झाले आहेत. निवडणुकीच्या कोणत्याही हालचाली नसल्यामुळे सत्ताधाऱ्यांना कंटाळलेले विरोधकही निराश झाले आहेत. बराच काळ पदाचा उपभोग घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीला अधिकारी व कर्मचारीही कंटाळले आहेत. सत्ताधारी व विरोधकांचा भविष्यात होणाऱ्या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीवर भर असल्यामुळे जिल्ह्याच्या विकासात कुणालाही रस नसल्याचे दिसून येत आहे. विषय समिती, स्थायी समितीच्या सभेला सदस्यांची उपस्थिती नगण्य असते. विरोधक थंडावल्यामुळे सत्ताधाऱ्यांचेही चांगलेच फावते आहे.लोकसभेसोबतच घेतल्या पाहिजेत निवडणुकादोन वर्षाचा अतिरिक्त कार्यकाळ मिळाला असला तरी लोकप्रतिनिधींची मानसिकता राहिली नाही. मिनी मंत्रालयाचा दर्जा असलेल्या जिल्हा परिषदेत सदस्यांचे येणेजाणे कमी झाले आहे. काम करण्याची, लोकांचे प्रश्न सोडविण्याची मानसिकता राहिलेली नाही. त्यामुळे सरकारने निर्णय घेऊन लोकसभेसोबतच जिल्हा परिषदेच्या निवडणुका आटोपल्या पाहिजेत.शरद डोणेकर, उपाध्यक्ष, जि.प. नागपूरनिवडणुका जर वेळेत झाल्यास सत्ताधारी असो की विरोधकांमध्ये काम करण्याचा एक उत्साह असतो. फुकटचे मिळत असेल तर त्याचे महत्त्व नसते. हेच जिल्हा परिषदेच्या एकंदरीत कारभारावरून दिसून येत आहे. त्यामुळे निवडणुका झाल्याच पाहिजेत.मनोहर कुंभारे, विरोधी पक्षनेते, जि. प.

 

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरElectionनिवडणूक