शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

भय्युजी महाराजांना आवडायचे नागपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:52 IST

आध्यात्मिक गुरू भय्युजी महाराजांना नागपूर फार आवडत होते. ते विविध राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी नागपुरात आले होते. महाराजांच्या निधनामुळे नागपुरातील अनुयायांमध्ये शोककळा पसरली आहे.

ठळक मुद्देविविध कार्यक्रमांसाठी नागपुरात आले : निधनामुळे अनुयायांमध्ये शोककळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आध्यात्मिक गुरू भय्युजी महाराजांना नागपूर फार आवडत होते. ते विविध राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी नागपुरात आले होते. महाराजांच्या निधनामुळे नागपुरातील अनुयायांमध्ये शोककळा पसरली आहे.महाराज विशेषकरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात येत होते. ते २७ सप्टेंबर २००९ रोजी संघाच्या विजयादशमी सोहळ्यात सहभागी झाले होते. दरम्यान, त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत शस्त्रपूजा केली होती तसेच प्रेरणादायी मार्गदर्शन केले होते. युवाचा उलटा उल्लेख वायू होतो. वायू शुद्ध व पवित्र राहिल्यास राष्ट्र व समाज सुदृढ होईल, असे त्यांनी सांगितले होते. त्यापूर्वी १५ फेब्रुवारी २००८ रोजी महाल येथील चिटणीस पार्कमध्ये त्यांचे प्रवचन झाले होते. त्यावेळी त्यांनी स्वत:च्या दिनचर्येची माहिती देताना ते केवळ तीन तास निद्रा घेत असल्याचे सांगितले होते. रोज पहाटे ३ वाजतापर्यंत अनुयायांची भेट घेतो व सकाळी ६ वाजता उठून पूजापाठ करतो, अशी माहिती त्यांनी दिली होती. देवावर विश्वास ठेवून कार्य करणाराच यशस्वी होतो. मला एवढी शक्ती कुठून मिळते माहीत नाही. कर्मामुळे विकासाचे मार्ग मोकळे राहतात, असेही ते म्हणाले होते. त्यानंतर १० मे २०१२ रोजी ते काही वेळाकरिता नागपुरात आले होते. ८ आॅगस्ट २०१३ रोजी विदर्भ सेवा समितीच्या सन्मान सोहळ्यासाठी तर, २०१५ मध्ये अन्य निमित्ताने ते नागपुरात आले होते.

टॅग्स :Bhayyuji Maharajभय्यूजी महाराजnagpurनागपूर