शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

धक्कादायक! स्वाईन फ्लूने घेतले ३० टक्के रुग्णांचे जीव; मेडिकलमध्ये १०८ रुग्ण, ३३ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2022 15:52 IST

मनपा रुग्णालयात उपचाराची सोय नाही.

नागपूर :स्वाईन फ्लूच्या वाढत्या मृत्यूने चिंता वाढविली आहे. एकट्या मेडिकलमध्ये आतापर्यंत १०८ रुग्णांची नोंद झाली असून, ३० टक्के म्हणजे ३३ रुग्णांचे जीव गेले आहेत. धक्कादायक म्हणजे, मेडिकल व एम्स सोडल्यास अद्यापही मेयोसह महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचाराची सोय नाही.

उपराजधानीत एकीकडे गणेश उत्सवानिमित्त आनंदाचे वातावरण असताना, दुसरीकडे मात्र डेंग्यूचे विघ्न गंभीर रूप धारण करीत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी २४ बेडचा वॉर्ड क्र. १३ राखीव ठेवला आहे. सध्या येथे १२ रुग्ण उपचाराखाली आहेत. यातील तीन रुग्ण व्हेंटिलेटरवर तर चार रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. १ जुलै ते ५ सप्टेंबर, २०२२ या दरम्यान या वॉर्डात १०८ रुग्णांनी उपचार घेतले, यातील ३३ रुग्णांचा जीव गेला आहे.

कोरोनाच्या तुलनेत स्वाईन फ्लूचे ५१ टक्के मृत्यू

नागपूर जिल्ह्यात १ जुलै ते ३१ ऑगस्ट, २०२२ या दरम्यान कोरोनाचा १८ मृत्यूची नोंद झालीे. १ जुलै ते ५ सप्टेंबर, २०२२ या काळात एकट्या मेडिकलमध्ये स्वाईन फ्लूचे ३३ मृत्यू झाले. एकूणच कोरोनाच्या तुलनेत स्वाईन फ्लूचे ५१ टक्के मृत्यू झाले. हा धोका ओळखण्याची गरज असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

स्वाईन फ्लूचे १०३ रुग्ण भरती

शहरासह ग्रामीण व इतर जिल्ह्यातील मिळून स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या ३८६ झाली आहे. यातील १०३ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयात भरती आहेत. यातील १० रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

आकडेवारी जमा करण्यापुरतीच मनपा मर्यादित

२००९ पासून स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत असताना, १३ वर्षांच्या कालावधीत महानगरपालिकेने आपल्या एकाही रुग्णालयात या रुग्णांना भरती करण्याची सोय उभी केली नाही. आता तर मेयोनेही जागा नसल्याचे सांगून हात वर केले आहेत. यामुळे रुग्णांचा भार एम्स व मेडिकलवर आला आहे. यातही एम्स शहराबाहेर असल्याने सर्वाधिक रुग्ण मेडिकलमध्ये उपचारासाठी येत आहेत.

उशिरा निदान मृत्यूचे ठरतेय कारण

डॉक्टरांनुसार, कोरोनाचा दुसऱ्या किंवा तिसऱ्या लाटेत गंभीर स्वरूपातील कोरोना झालेल्यांमध्ये स्वाईन फ्लूची गंभीर लक्षणे दिसून येत आहेत. त्यांच्या मृत्यूची संख्याही मोठी आहे. विशेष म्हणजे, स्वाईन फ्लूचे उशिरा निदान होऊन त्यांना उशिरा उपचार मिळत असल्याने आजाराची गुंतागुंत वाढून मृत्यूचा धोका वाढला आहे.

टॅग्स :Healthआरोग्यSwine Flueस्वाईन फ्लूnagpurनागपूरDeathमृत्यू