शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

Nagpur: रेल्वेत चोऱ्या करणाऱ्या तिघांना आरपीएफने ठोकल्या बेड्या

By नरेश डोंगरे | Updated: March 19, 2024 22:47 IST

Nagpur News: रेल्वे गाड्या तसेच रेल्वे स्थानक परिसरात चोऱ्या करणाऱ्या तीन भामट्यांना रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने बेड्या ठोकल्या. सध्या अटकेत असलेले हे तिघेही चोरटे गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

- नरेश डोंगरे नागपूर - रेल्वे गाड्या तसेच रेल्वे स्थानक परिसरात चोऱ्या करणाऱ्या तीन भामट्यांना रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने बेड्या ठोकल्या. सध्या अटकेत असलेले हे तिघेही चोरटे गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

आदर्श मिलींद अंबादे (वय २१, रा. नंगपुरा, जि. गोंदिया) हा सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हावडा एक्सप्रेसच्या प्रवेशद्वारावर संशयास्पद अवस्थेत उभा होता. फलाट क्रमांक ६ वर तैनात असलेले आरपीएफचे पीएसआय एच. एल. मिना तसेच कर्मचारी कपिल झरबडे, नीरज कुमार, चंदन निर्मल, धिरज दलाल आणि दीपा कैथवास तसेच जीआरपीचे प्रवीण खवसे आणि अमोल हिंगणे आणि सतीश बुरडे यांना त्याचा संशय आला. त्यामुळे गाडी फलाटावर थांबताच आरपीएफच्या जवानांनी त्याला खाली उतरवून विचारपूस सुरू केली. पोलिसांच्या ताब्यात येताच आरोपीची भंबेरी उडाली. त्याने पोलिसांच्या प्रश्नांवर उत्तर देताना काही वेळेपूर्वी एका प्रवाशाचा मोबाईल चोरल्याची कबुली दिली. तो पोलिसांच्या हवाली केला. त्याचे दोन साथीदार आणखी रेल्वे स्थानक परिसरात सावज शोधत असल्याची माहितीही मिळाली. त्यावरून आरपीएफच्या पथकाने प्रणय कालूदास ठवरे (वय २१) आणि मयूर उमेश उपाध्याय (वय २२, दोघेही रा. नंगपुरा, गोंदिया) यांनाही पकडले. हे दोघे प्रवाशांच्या सामानाची चोरी करण्याच्या तयारीत होते. या तिघांनाही प्राथमिक चाैकशीनंतर आरपीएफने सोमवारी रात्री रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) हवाली केले. गावातून निघायचे अन् दुसरीकडे हात मारायचाउपरोक्त चोरटे टापटीप होऊन घरून (गोंदियातून) निघतात. धावत्या रेल्वेत किंवा नागपूर स्थानकावर येऊन ते हात मारायचे अन् साळसुदपणे आपल्या गावाकडे परत जायचे. अशा प्रकारे त्यांनी आणखी कोणते गुन्हे केले, त्याचा जीआरपी तपास करत आहे.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी