शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

रामटेकमध्ये महाकवी कालिदासांच्या नशिबी विरह, वेदनाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 10:22 IST

स्मारक ठरतेय अडगळ; ‘आषाढस्य प्रथम दिवसे’चा पडला विसर

ठळक मुद्देस्मारक ठरतेय अडगळ; ‘आषाढस्य प्रथम दिवसे’चा पडला विसर

राहुल पेठकर 

रामटेक (नागपूर) : महाकवी कालिदासांचे महाकाव्य उत्कृष्ट काव्याचा नमुना म्हटले जाते आणि जगभरात त्यांच्या काव्यावर संशोधन सुरू आहे. कालिदासांनी आयुष्यभर अनुभवलेला प्रेमविरह अनेकांच्या जास्त ओळखीचा आहे आणि त्याची तीव्रता अजरामर अशा मेघदूतमधील ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या ओळीने आणखीनच प्रखर होते. कालिदासांच्या आयुष्याचा तो विरह कधी संपणार, हा प्रश्न आहे. रामटेकमध्ये असलेल्या कालिदास स्मारकाची दुरवस्था बघून, हा प्रश्न अधिकच प्रबळ होतो.!

‘आषाढस्य प्रथम दिवसे’ म्हटले की आपल्याला आठवण येते महाकवी कालिदासांची....त्यामुळे आषाढाचा पहिला दिवस महाकवी कालिदास दिवस म्हणूनही साजरा केला जातो. कालिदासांच्या’या आठवणी जपल्या जाव्यात यासाठी येथे कालिदास स्मारक तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. १० डिसेंबर १९६८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या उपस्थितीत या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते. ३ लाख ४९ हजार रुपये खर्च करून हे स्मारक उभारले. त्याचे उद्घाटन १२ डिसेंबर १९७३ ला झाले.

या स्मारकात कालिदासांची तीन महाकाव्ये मेघदुतम्, कुमारसंभवम् आणि रघुवंशम्, तसेच तीन नाटके मालविकाग्निमित्रम्, विक्रमोर्वशीयम् आणि शाकुंतलम् यातील विविध प्रसंगांवर भारतातील विख्यात चित्रकार मधू पोवळे, मुरली लाहोटी, वासुदेव स्मार्त, शांताराम कामत, दिनेश शाह आणि वामन करंजेकर यांनी काढलेली तैलचित्रे लावली आहेत. या स्मारकाच्या दिमतीला तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक व माजी मंत्री स्व. मधुकरराव किंमतकर यांच्या कल्पनेतून एक भव्य ‘ओम’ची निर्मिती करण्यात आली आहे. जयपुरी दगडात बांधलेली ही वास्तू अद्वितीय आहे. तिथे टाइल्सच्या तुकड्यांपासून कालिदासांच्या नाटकातील प्रसंग रेखाटले आहेत. यासाठी स्व. श्रीकांत जिचकार यांनी पुढाकार घेतला होता. ‘ओम’च्या आत पर्यटकांना आकर्षित करणारे संगीत कारंजे लावले आहेत. बगिचा बनविला. अतिशय सुंदर असे हे ठिकाण बनविले गेले. त्यानंतर हे नगर परिषदेकडे सुपूर्द करण्यात आले.

नगर परिषदेने ठरविले असते आणि शासनाने मदत केली असती, तर हे जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ झाले असते; पण तसे झाले नाही. आज बगिचा उजाड झाला आहे. संगीत कारंजे बंद पडले आहेत. भित्तीचित्र नीरस झाले आहे. काही दिवसांपूर्वी तर येथे वीज पुरवठाही नव्हता. वृक्षराजी नसल्याने हा भाग ओसाड झाला आहे.

कालिदास यांच्या स्मारकाबाबत नगर परिषदेने एक ठराव घेतला आहे. देखभालीसाठी लवकरच स्मारक संस्कृत विद्यापीठाकडे हस्तांतरित केले जाईल.हर्षल गायकवाड, मुख्याधिकारी, रामटेक, नगर परिषद

टॅग्स :nagpurनागपूरelectricityवीजMaharashtraमहाराष्ट्र