शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, १ तासांत सर्व GR काढा, मग अंतिम निर्णय सांगतो: मनोज जरांगे पाटील
2
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
3
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
4
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
5
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
6
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
7
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
8
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
9
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
10
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
11
नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर
12
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
13
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
14
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
15
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
16
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
17
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
18
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
19
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
20
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक

रामटेकमध्ये महाकवी कालिदासांच्या नशिबी विरह, वेदनाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 10:22 IST

स्मारक ठरतेय अडगळ; ‘आषाढस्य प्रथम दिवसे’चा पडला विसर

ठळक मुद्देस्मारक ठरतेय अडगळ; ‘आषाढस्य प्रथम दिवसे’चा पडला विसर

राहुल पेठकर 

रामटेक (नागपूर) : महाकवी कालिदासांचे महाकाव्य उत्कृष्ट काव्याचा नमुना म्हटले जाते आणि जगभरात त्यांच्या काव्यावर संशोधन सुरू आहे. कालिदासांनी आयुष्यभर अनुभवलेला प्रेमविरह अनेकांच्या जास्त ओळखीचा आहे आणि त्याची तीव्रता अजरामर अशा मेघदूतमधील ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या ओळीने आणखीनच प्रखर होते. कालिदासांच्या आयुष्याचा तो विरह कधी संपणार, हा प्रश्न आहे. रामटेकमध्ये असलेल्या कालिदास स्मारकाची दुरवस्था बघून, हा प्रश्न अधिकच प्रबळ होतो.!

‘आषाढस्य प्रथम दिवसे’ म्हटले की आपल्याला आठवण येते महाकवी कालिदासांची....त्यामुळे आषाढाचा पहिला दिवस महाकवी कालिदास दिवस म्हणूनही साजरा केला जातो. कालिदासांच्या’या आठवणी जपल्या जाव्यात यासाठी येथे कालिदास स्मारक तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. १० डिसेंबर १९६८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या उपस्थितीत या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते. ३ लाख ४९ हजार रुपये खर्च करून हे स्मारक उभारले. त्याचे उद्घाटन १२ डिसेंबर १९७३ ला झाले.

या स्मारकात कालिदासांची तीन महाकाव्ये मेघदुतम्, कुमारसंभवम् आणि रघुवंशम्, तसेच तीन नाटके मालविकाग्निमित्रम्, विक्रमोर्वशीयम् आणि शाकुंतलम् यातील विविध प्रसंगांवर भारतातील विख्यात चित्रकार मधू पोवळे, मुरली लाहोटी, वासुदेव स्मार्त, शांताराम कामत, दिनेश शाह आणि वामन करंजेकर यांनी काढलेली तैलचित्रे लावली आहेत. या स्मारकाच्या दिमतीला तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक व माजी मंत्री स्व. मधुकरराव किंमतकर यांच्या कल्पनेतून एक भव्य ‘ओम’ची निर्मिती करण्यात आली आहे. जयपुरी दगडात बांधलेली ही वास्तू अद्वितीय आहे. तिथे टाइल्सच्या तुकड्यांपासून कालिदासांच्या नाटकातील प्रसंग रेखाटले आहेत. यासाठी स्व. श्रीकांत जिचकार यांनी पुढाकार घेतला होता. ‘ओम’च्या आत पर्यटकांना आकर्षित करणारे संगीत कारंजे लावले आहेत. बगिचा बनविला. अतिशय सुंदर असे हे ठिकाण बनविले गेले. त्यानंतर हे नगर परिषदेकडे सुपूर्द करण्यात आले.

नगर परिषदेने ठरविले असते आणि शासनाने मदत केली असती, तर हे जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ झाले असते; पण तसे झाले नाही. आज बगिचा उजाड झाला आहे. संगीत कारंजे बंद पडले आहेत. भित्तीचित्र नीरस झाले आहे. काही दिवसांपूर्वी तर येथे वीज पुरवठाही नव्हता. वृक्षराजी नसल्याने हा भाग ओसाड झाला आहे.

कालिदास यांच्या स्मारकाबाबत नगर परिषदेने एक ठराव घेतला आहे. देखभालीसाठी लवकरच स्मारक संस्कृत विद्यापीठाकडे हस्तांतरित केले जाईल.हर्षल गायकवाड, मुख्याधिकारी, रामटेक, नगर परिषद

टॅग्स :nagpurनागपूरelectricityवीजMaharashtraमहाराष्ट्र