शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Nagpur: मिस्टिंगमध्ये समस्या, फवाऱ्याऐवजी टिप-टिप थेंब

By नरेश डोंगरे | Updated: May 24, 2024 23:22 IST

Nagpur Railway News: उन्हाळ्यात गर्मीपासून प्रवाशांना दिलासा मिळावा म्हणून महिनाभरापूर्वी रेल्वेस्थानकावर सुरू करण्यात आलेल्या मिस्टिंग सिस्टीममध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे थंडगार हवेची झुळूक आणि पाण्याचा फवारा फेकण्याऐवजी काही ठिकाणी त्यातून टिप टिप पाण्याचे थेंब पडत आहेत.

- नरेश डोंगरे  नागपूर - उन्हाळ्यात गर्मीपासून प्रवाशांना दिलासा मिळावा म्हणून महिनाभरापूर्वी रेल्वेस्थानकावर सुरू करण्यात आलेल्या मिस्टिंग सिस्टीममध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे थंडगार हवेची झुळूक आणि पाण्याचा फवारा फेकण्याऐवजी काही ठिकाणी त्यातून टिप टिप पाण्याचे थेंब पडत आहेत.

प्रवाशांना जास्तीत जास्त चांगल्या सेवासुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशासन वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. गर्दीत उभे राहण्याऐवजी प्रवाशांना एटीएममधून ज्याप्रमाणे झटपट पैसे काढता येतात, तशाच प्रकारची मशीन (एटीव्हीएम) लावण्यात आली आहे. जेवणाची थाळी रेल्वेगाडीच्या खिडकीजवळ जाऊन विकली जात आहे. पिण्याचे थंड आणि शुद्ध पाणी रेल्वे प्रवाशांना मोफत पोहोचविले जात आहे. अशातच भयंकर उकाड्यापासून उन्हाळ्यात प्रवाशांना आल्हाददायक गारवा अर्थात थंड पाण्याचा फवारा मिळावा म्हणून रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक १, २ आणि ३ वर 'मिस्टिंग सिस्टीम' सुरू केली होती. गाडी फलाटावर येताच ही सिस्टम आपोआप सुरू होते. त्यामुळे तीव्र उन्हामुळे हैराण होणाऱ्या प्रवाशांना या थंडगार पाण्याच्या फवाऱ्याने कमालीचा दिलासा मिळतो.

विशेष म्हणजे, या फवाऱ्याने प्रवासी ओले होत नाही. अशा या सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काही ठिकाणांहून फवारा येण्याऐवजी पाण्याचे थेंब गळत आहेत. आज रात्री ही बाब रेल्वे अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली असता त्यांनी तातडीने दुरुस्ती करून पुढच्या काही तासांत ही सिस्टीम पूर्ववत केली जाणार असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वे