शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
6
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
7
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
8
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
9
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
10
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
11
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
12
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
13
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
14
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
15
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
16
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
17
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
18
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
19
'हवा' टाईट...! विमानातून स्कायडायव्हरची उडी अन् पॅराशूट पंखात अडकलं, पुढे काय झालं? (VIDEO)
20
बांग्लादेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' तारखेला मतदान, मात्र शेख हसीनांच्या पक्षावर बंदी
Daily Top 2Weekly Top 5

'...तोपर्यंत आम्ही माघारी फिरणार नाही'; नागपूर पोलिसांनी रोखल्यानंतर काँग्रेसची सत्यशोधन समिती आक्रमक

By कमलेश वानखेडे | Updated: March 22, 2025 16:55 IST

नागपूर पोलिसांनी दंगलग्रस्त भागात जाण्यास समितीला परवानगी नाकारली. त्यानंतर राज्यातील शांतता संपविणारे सरकार बरखास्त करा, अशी मागणी समितीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली. 

-कमलेश वानखेडे, नागपूर नागपूरच्या दंगलग्रस्त भागात जाऊन जाऊन घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी काँग्रेस पक्षाने स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीला शनिवारी (२२ मार्च) नागपूर पोलिसांनी रोखले. या समितीला दंगलग्रस्त भागात जाण्यास परवानगी नाकारण्यात आली. या घटनेत फक्त मुस्लिमांवरच देशद्रोहाचे गुन्हे का दाखल करण्यात आले? ज्यांनी लोकांच्या भावना भडकावल्या त्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना का सोडून देण्यात आले? असे सवाल काँग्रेसच्या सत्य शोधन समितीचे अध्यक्ष तसेच गोव्याचे माजी प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केले. राज्यातील शांतता संपविणारे सरकार बरखास्त करावे, अशी मागणी राज्यपालांकडे करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पोलिसांनी दंगलग्रस्त भागात जाण्यास परवानगी नाकारल्यानंतर काँग्रेसच्या सत्यशोधन समितीने रविभवनात बैठक घेतली. या वेळी समितीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह समितीचे सदस्य साजिद पठाण, शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल गुडधे आदी उपस्थित होते. 

तोपर्यंत आम्ही माघारी फिरणार नाही -ठाकरे

यावेळी माणिकराव ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, 'या घटनेमागील सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही नागपुरात आलो आहोत. मात्र, पोलिसांनी संचारबंदीचे निमित्त समोर करीत आम्हाला रोखले. मात्र, सत्य जाणून घेतल्याशिवाय आम्ही माघारी फिरणार नाही. त्यासाठी चार दिवस नागपुरात थांबावे लागले तरीत चालेल. या दंगतील प्रशासन आणि पोलिसांची भूमिका काय राहिली याचीही माहिती घेऊ, काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांशीही चर्चा करू. यानंतर समिती आपला अहवाल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सादर करेल.' 

यावेळी अतुल लोंढे, गिरीश पांडव, प्रशांत धवड, संजय महाकाळकर, अतुल कोटेचा आदी उपस्थित होते.

दंगलीस विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल जबाबदर

समितीने त्या भागात वास्तव्यास असलेल्यांसह विविध लोकांशी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून दंगलीस विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते जबाबदर असल्याचे स्पष्ट होते. आंदोलनात कुराणाचे आयात असलेली चादर जाळण्यात आली. त्यामुळे मुस्लिमांचा भावना दुखावल्या. पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर कार्यवाही केली नाही. जुजबी कलमा लावून त्यांना सोडून देण्यात आले. मात्र दुसरीकडे मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांवर थेट देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले, असा आरोप करीत हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवरही राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माणिकराव ठाकरे यांनी केली.

मंत्रीच दंगलीस चिथावणी देत आहेत

राज्यात शांतता व सुव्यवस्था राखणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र सराकामधील मंत्रीच दंगलीस चिथावणी देऊन लोकांना भडकविण्याचे काम करीत आहेत. जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करून राज्यातील शांतता संपविण्याचे काम सुरू आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला.

टॅग्स :Aurangzeb Tombऔरंगजेबाची कबरcongressकाँग्रेसCrime Newsगुन्हेगारीNagpur Policeनागपूर पोलीस