शहरं
Join us  
Trending Stories
1
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
2
घरगुती मीटरवर इलेक्ट्रीक कार चार्ज केली; केला २५००० चा दंड, कार मालक रडकुंडीला आला...
3
वैजापूरमध्ये पहाटे थरार! चोरीच्या प्रयत्नात बँक जळून खाक...खातेदारांच्या पैशांचे काय होणार?
4
भीषण अपघात! लग्नावरून परतणाऱ्या तरुणांची कार गॅस टँकरला धडकली, २ जणांचा मृत्यू ,एक जखमी
5
७ वर्षाचे नाते, मग लग्न, सरकारी नोकरी लागताच पत्नीचे मन बदलले; कंटाळून इंजिनिअरने उचलले टोकाचे पाऊल
6
पंचग्रही योगात नववर्षाचे पहिले पंचक: ५ दिवस प्रतिकूल, अशुभ; ५ कामे टाळा, नेमके काय करू नये?
7
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नावाचे स्टँड काढून टाकण्याचे आदेश
8
अमेरिका, जर्मनी, चीन... सगळेच मागे, जगात सर्वाधिक सोने कोणाकडे? आकडा वाचून धक्का बसेल
9
पालकांनो, मुलांना सांगताय... पण तुम्ही स्वतः काय करता आहात? कुटुंबासाठी मोबाईल असा ठरतोय घातक
10
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
11
एक रुपयाच्या दुर्मीळ नोटीच्या व्यवहारात १० लाखांचा गंडा, मुंबईतील कॅशियरला ठकवले
12
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
13
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
14
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
15
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
16
अपघातात मृत्यू झालेल्या महिलेसोबत वॉर्ड बॉयचं संतापजनक कृत्य, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
17
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
18
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
19
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
20
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'

'...तोपर्यंत आम्ही माघारी फिरणार नाही'; नागपूर पोलिसांनी रोखल्यानंतर काँग्रेसची सत्यशोधन समिती आक्रमक

By कमलेश वानखेडे | Updated: March 22, 2025 16:55 IST

नागपूर पोलिसांनी दंगलग्रस्त भागात जाण्यास समितीला परवानगी नाकारली. त्यानंतर राज्यातील शांतता संपविणारे सरकार बरखास्त करा, अशी मागणी समितीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली. 

-कमलेश वानखेडे, नागपूर नागपूरच्या दंगलग्रस्त भागात जाऊन जाऊन घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी काँग्रेस पक्षाने स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीला शनिवारी (२२ मार्च) नागपूर पोलिसांनी रोखले. या समितीला दंगलग्रस्त भागात जाण्यास परवानगी नाकारण्यात आली. या घटनेत फक्त मुस्लिमांवरच देशद्रोहाचे गुन्हे का दाखल करण्यात आले? ज्यांनी लोकांच्या भावना भडकावल्या त्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना का सोडून देण्यात आले? असे सवाल काँग्रेसच्या सत्य शोधन समितीचे अध्यक्ष तसेच गोव्याचे माजी प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केले. राज्यातील शांतता संपविणारे सरकार बरखास्त करावे, अशी मागणी राज्यपालांकडे करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पोलिसांनी दंगलग्रस्त भागात जाण्यास परवानगी नाकारल्यानंतर काँग्रेसच्या सत्यशोधन समितीने रविभवनात बैठक घेतली. या वेळी समितीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह समितीचे सदस्य साजिद पठाण, शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल गुडधे आदी उपस्थित होते. 

तोपर्यंत आम्ही माघारी फिरणार नाही -ठाकरे

यावेळी माणिकराव ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, 'या घटनेमागील सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही नागपुरात आलो आहोत. मात्र, पोलिसांनी संचारबंदीचे निमित्त समोर करीत आम्हाला रोखले. मात्र, सत्य जाणून घेतल्याशिवाय आम्ही माघारी फिरणार नाही. त्यासाठी चार दिवस नागपुरात थांबावे लागले तरीत चालेल. या दंगतील प्रशासन आणि पोलिसांची भूमिका काय राहिली याचीही माहिती घेऊ, काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांशीही चर्चा करू. यानंतर समिती आपला अहवाल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सादर करेल.' 

यावेळी अतुल लोंढे, गिरीश पांडव, प्रशांत धवड, संजय महाकाळकर, अतुल कोटेचा आदी उपस्थित होते.

दंगलीस विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल जबाबदर

समितीने त्या भागात वास्तव्यास असलेल्यांसह विविध लोकांशी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून दंगलीस विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते जबाबदर असल्याचे स्पष्ट होते. आंदोलनात कुराणाचे आयात असलेली चादर जाळण्यात आली. त्यामुळे मुस्लिमांचा भावना दुखावल्या. पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर कार्यवाही केली नाही. जुजबी कलमा लावून त्यांना सोडून देण्यात आले. मात्र दुसरीकडे मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांवर थेट देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले, असा आरोप करीत हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवरही राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माणिकराव ठाकरे यांनी केली.

मंत्रीच दंगलीस चिथावणी देत आहेत

राज्यात शांतता व सुव्यवस्था राखणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र सराकामधील मंत्रीच दंगलीस चिथावणी देऊन लोकांना भडकविण्याचे काम करीत आहेत. जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करून राज्यातील शांतता संपविण्याचे काम सुरू आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला.

टॅग्स :Aurangzeb Tombऔरंगजेबाची कबरcongressकाँग्रेसCrime Newsगुन्हेगारीNagpur Policeनागपूर पोलीस