शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

वर्ल्ड कपच्या मैदानातून नागपूर आऊट! क्रिकेटप्रेमींचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 14:06 IST

विश्वचषक आयोजनात व्हीसीएकडे दुर्लक्ष

राम ठाकूर

नागपूर : कारण कुठलेही असो मात्र, सत्य हेच की. भारताच्या यजमानपदाखाली होणाऱ्या आयसीसी वन डे विश्वचषक स्पर्धेतील एकही सामना नागपूरला देण्यात आलेला नाही. यामुळे केवळ नागपूरकर नव्हे, तर विदर्भातील क्रिकेट चाहत्यांमध्ये संतापाची लाट आहे.

मंगळवारी सकाळी विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर होताच, व्हीसीएला एकाही सामन्याचे यजमानपद देण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले. विदर्भातील क्रिकेट चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. क्रीडा रसिकांची घोर निराशा झाली.

१९८७ साली भारताने पहिल्या विश्वचषकाचे यजमानपद भूषविले. त्यावेळी व्हीसीएच्या सिव्हिल लाइन्स स्टेडियमवर भारत-न्यूझीलंड सामना झाला होता. त्या सामन्यात चेतन शर्माने गोलंदाजीत हॅट् ट्रिक घेतली, तर महान सुनील गावसकर यांनी वन डेत एकमेव शतक झळकावून हा सामना अविस्मरणीय ठरविला होता. यानंतर, १९९६ आणि २०११ला भारताच्या यजमानपदाखाली विश्वचषकाचे आयोजन झाले, तेव्हाही नागपूरला सामन्यांचे आयोजन झाले होते.

२०१६ च्या टी-२० विश्वचषकात तर जामठा मैदानावर महिला आणि पुरुष संघांचे सराव सामने आयोजित करण्यात आलेच, शिवाय मुख्य सामन्यांसह जवळपास १२ लढती येथे खेळविण्यात आल्या होत्या. त्यात भारत- न्यूझीलंड या पुरुषांच्या सामन्यांचाही समावेश होता.

मुंबई, पुण्याच्या पलीकडे बघा, विदर्भाकडे दुर्लक्ष करणे थांबवा; अनिल देशमुखांची BCCIला विनंती

२०२३ च्या वन डे विश्वचषकातील एकही सामना नागपूरला न दिल्याबद्दल व्हीसीए पदाधिकारी आश्चर्यचकित झाले आहेत. व्हीसीएचे अध्यक्ष न्या. विनय देशपांडे लोकमतशी बोलताना म्हणाले, 'नागपूरला यजमानपदापासून वंचित ठेवणे विदर्भातील क्रिकेट चाहत्यांसाठी दुःखाची बाब ठरावी.' मुलासोबत कॅनडात असलेले देशपांडे यांनी जामठा स्टेडियम अत्याधुनिक सुविधायुक्त असल्यानंतरही सामने आयोजनापासून दूर ठेवल्याबद्दल खेद व्यक्त केला. ते म्हणाले, 'विश्वचषकासारख्या आयोजन स्थळांबाबत अंतिम निर्णय आयसीसी घेते. त्यामुळे खरे कारण काय असावे, हे सांगता येणार नाही, पण एक खरे की, व्हीसीएचे पदाधिकारी, सदस्य आणि क्रिकेट चाहत्यांवर हा मोठा आघात आहे. 

अहमदाबाद क्रिकेटची नवी राजधानी!

  • विश्वचषक सामना आयोजनातून डावलण्यात आल्यानंतर व्हीसीएसोबतच अनेक राज्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बीसीसीआयच्या सध्याच्या कार्यकारिणीला धारेवर धरले. त्रिवेंद्रमला वगळण्यात आल्याने खा. शशी थरूर यांनी अहमदाबाद क्रिकेटची नवी राजधानी झाल्याचा आरोप करीत सचिव जय शाह यांच्यावर नेम साधला.
  • मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अभिलाष खांडेकर यांनी इंदूरला वगळल्याबद्दल तर पंजाबचे क्रीडा मंत्री गुरमीतसिंग मीत यांनी मोहालीकडे डोळेझाक केल्याबद्दल संताप व्यक्त केला. राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप करीत त्यांनी बीसीसीआयचे नेतृत्व कोणाकडे आहे, हे सर्वांना ठाऊक असल्याचे म्हटले आहे.

 

व्हीसीए पदाधिकाऱ्यांची नाराजी

व्हीसीएचे सचिव संजय बडकस यांच्यामते, केवळ नागपूर नव्हे, तर मोहाली, इंदूर, राजकोट, रांची यांसारख्या शहरांना विश्वचषक आयोजनापासून दूर ठेवण्यात आले आहे. बीसीसीआयला आता जाब विचारण्यात अर्थ नाही, कारण वेळापत्रकावर अंतिम निर्णय झाला आहे. नागपूरला आयोजनापासून वंचित ठेवणे हा या क्षेत्रातील क्रिकेट चाहत्यांवर अन्याय आहे. टीव्हीवर सामने पाहू शकतो. मात्र, मैदानात उपस्थित राहून सामना पाहण्याची वेगळी मजा असते. युवा क्रिकेट चाहते निराश आहेत. व्हीसीएचे माजी अध्यक्ष अद्वैत मनोहर यांनीही अध्यक्ष आणि सचिवाच्या मतांशी सहमती दर्शवित नागपूरला यजमानपदापासून दूर ठेवणे निराशादायी असल्याचे सांगितले. आयोजन स्थळांचा निर्णय बीसीसीआय आणि आयसीसीने घेतला, त्यामुळे आता काहीही होऊ शकणार नाही.

टॅग्स :ICC One Day World Cupवन डे वर्ल्ड कपBCCIबीसीसीआयnagpurनागपूर