शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

पुरवठ्यात कपात करून नागपूर मनपाची पाणीबचत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:15 AM

कन्हान नदी व तोतलाडोहातील पाणी पातळी खालावल्याने शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा सक्षमपणे कार्यरत ठेवण्याचे महापालिकेकडे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देदरवर्षीच्या उन्हाळ्याच्या तुलनेत कमी पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कन्हान नदी व तोतलाडोहातील पाणी पातळी खालावल्याने शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा सक्षमपणे कार्यरत ठेवण्याचे महापालिकेकडे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. नागरिकांना थेंब थेंब पाण्याची बचत करण्याचा संदेश देण्यासोबतच महापालिकेचा जलप्रदाय विभाग पाण्याची बचत करीत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात शहराला दररोज ७४० एमएलडीपर्यंत पाणीपुरवठा जातो. परंतु तूर्त ६९० एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आहे. जून अखेरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु अधिकृतपणे यासंदर्भात माहिती देण्याचे टाळले जात आहेदरम्यान, ज्या भागात २४ बाय ७ पाणीपुरवठा होत होता अशा भागातही पाणीपुरवठा कमी केल्याची माहिती आहे, तर काही भागातील पाणीपुरवठ्यात कपात करण्यासाठी दबाव वाढल्याची माहिती आहे. शहरलगतच्या भागातील पाणीपुरवठ्याची वेळ कमी करून एक तास करण्यात आली आहे. दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक ांना पुरेसे पाणी मिळत नाही. यासंदर्भात राष्ट्रवादीचे गटनेते दुनेश्वर पेठे यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले.सोमवारी १३ मे रोजी महापौर नंदा जिचकार, सत्ता पक्षनेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, माजी महापौर प्रवीण दटके व आयुक्त अभिजित बांगर, पाणीपुरवठयाची जबाबदारी असलेल्या ओसीडब्ल्यूचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.टिल्लू पंपांचा सर्रास वापरशहरातील पाणीतूट ५० टक्क्यापर्यंत आहे. यात सुधारणा झाली असती तर शहरातील पाणीटंचाईचे संकट काही प्रमाणात कमी झाले असते. मानकाच्या तुलनेत शहरात दराडोई अधिक पाणीपुरवठा होत आहे. अवैध टिल्लू पंपांचा सर्रास वापर सुरू आहे. शुक्रवारी लकडगंज, आसीनगर झोन क्षेत्रात प्रत्येकी तीन टिल्लू पंप जप्त केले, तर नेहरूनगर व सतरंजीपुरा झोन भागात चार बूस्टर पंप जप्त करण्यात आले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई