शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीपूर्वी नागपूर मनपाला ३१५ कोटींचा निधी; त्यातील २१५ कोटी आमदारांच्या प्रस्तावांसाठी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 16:35 IST

जिल्हाधिकारी करणार कामाचे प्रस्ताव मंजूर : कंत्राटदारांचे सरकारवर कोट्यवधी थकीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरात सरकारी कामे करणाऱ्या कंत्राटदारांचे सरकारवर कोट्यवधी रुपये थकबाकी आहेत. नागपूर महापालिकेच्या बाबतीत पाहिले, तर मनपाच्या कंत्राटदारांची अंदाजे ४०० कोटी रुपयांची थकबाकी उरलेली आहे. निधीच्या कमतरतेनंतरही शासनाने ठोक निधी या शीर्षकाखाली महापालिकेस ३१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

या निधीचा उपयोग करून कामे करावयास मनपाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत. प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी एकूण जबाबदार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीला लक्षात घेत राज्य सरकारने नागपूर महापालिकेस महत्त्वाच्या पायाभूत सुविधा निर्मिती आणि विकासकामांसाठी ३१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. वित्त विभागाने दोन अध्यादेशांच्या माध्यमातून अनुक्रमे १७५ कोटी आणि १४० कोटींचा निधी मंजूर केल्याचे पत्र जारी केले आहे. या निधीला ठोक निधी असेच पत्रात उल्लेख आहे. विशेष म्हणजे या निधीच्या प्रस्तावांना मंजुरीचा अधिकार महानगरपालिका आयुक्तांना न देता जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे. त्यामुळे महानगरपालिकेने पायाभूत सुविधा संबंधित प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवावे लागणार आहेत.

या निधीअंतर्गत नदी आणि नाल्यांच्या संरक्षक भिंती बांधणे, पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी वाहिन्यांचे जाळे उभारणे, सांडपाणी वाहिन्यांचा नेटवर्क तयार करणे, लहान पूल बांधणे, अपूर्ण राहिलेल्या रस्त्यांच्या कामांसह इतर आवश्यक कामांचा समावेश आहे.

पायाभूत सुविधांची ४८२ कोटींची शिल्लक, पुरासाठी ७० कोटी रुपये प्रलंबित पायाभूत सुविधांसाठी शासनाकडे एकूण ७०८ कोटी रुपये होते. यातून २१६ कोटी रुपये मिळाले असून, अजून ४८२ कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत. यावर्षी एप्रिल मध्ये २७ कोटी रुपये प्राप्त झाले. तसेच सप्टेंबर २०२३ मध्ये नागनदीवर आलेल्या पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतर उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेने शासनाकडे २०५ कोटींचा प्रस्ताव सादर केला होता. त्यापैकी शासनाने १५५ कोटी रुपये मंजूर केले, जेवढ्या पैकी ८५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. मागील ७० कोटी रुपये अजून शासनाकडे थकलेले आहेत. शासनाकडून निधी वेळेत न मिळाल्यामुळे कंत्राटदारांची अंदाजे ४०० कोटी रुपयांची देणी बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. 

२१५ कोटी आमदारांच्या प्रस्तावांसाठीराज्य सरकारकडून मिळालेल्या एकूण निधीपैकी २१५ कोटी रुपयांचा निधी विधानसभानिहाय आमदारांनी सादर केलेल्या कामांच्या प्रस्तावांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर