शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

बिझनेसमन नवरा नको गं बाई! नागपुरच्या रितेशला १०, २० नाही तर तब्बल ५०० मुलींचा लग्नासाठी नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 13:39 IST

सगळं काही असून लग्न न जमणं आताच्या घडीची सगळ्यात मोठी समस्या बनली आहे. अशात एका लग्न ठरत नसलेल्या नागपूरच्या तरूणाची गोष्ट समोर आली आहे. 

सध्याच्या घडीला लग्नासाठी मुलगी मिळणं फारच कठीण झालंय. कारण शेतकरी नवरा नको, अमुक ठिकाणी राहणारा हवा, पगाराचा आकडा इतकाचं हवा, अशा वेगवेगळ्या अटी मुली आजकाल मुलांसमोर ठेवतात. यापैकी काही गोष्टी मुलाकडे नसतील किंवा वेगळ्या क्षेत्रात काम करणारा असेल तर लगेचच मुलींच्या कुटुंबाकडून नकार कळवला जातो. सगळं काही असून लग्न न जमणं आताच्या घडीची सगळ्यात मोठी समस्या बनली आहे. अशात एका लग्न ठरत नसलेल्या नागपूरच्या तरूणाची गोष्ट समोर आली आहे.

नागपुरात  एक आत्मनिर्भर तरुण शिक्षण, पैसै, गाडी, घरं सगळं काही असूनही समस्येत आहे. अर्थात याला कारणही तसंच आहे.  रितेश झुनके नावाच्या पठ्ठयाला आजवर दहा, वीस नाही तर तब्बल पाचशेपेक्षा जास्त तरुणींनी लग्नासाठी नकार दिला आहे, वाचून तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. माध्यमांशी बोलताना रितेशनं आपली व्यथा मांडलीआहे. 

२९ वर्षांत बनला ३५ मुलांचा बाप; स्पर्म डोनरनं सांगितला आपला अनुभव

नोकरीऐवजी ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात आपल्या पायावर उभं राहून यश मिळवलेल्या  ४० हजार रुपये महिना कमावणाऱ्या आत्मनिर्भर रितेशने स्वतःच्या लग्नासाठी आजवर अनेक स्थळं पाहिली आणि मुलीच्या कुटुंबियांशी संवादही साधला. इतकंच नाही तर  विवाह मेळाव्यात सहभाग नोंदवले, मेट्रीमॉनियल साईट्सवर नोंदणी केली. मात्र अजूनही लग्नाला एकही मुलगी तयार झालेली नाही. नोकरीवालाच नवरा हवा असं अनेक मुलीचं म्हणणं होतं. कारण ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात असलेल्या मुलींना चांगल्या सवयी नसतात असा  काहीसा त्यांचा समज आहे. या सगळ्यामुळे या तरूणाला नैराश्याचा सामना करावा लागतोय.

अति तिथे माती! बॉडी बिल्डरने इंजेक्शन घेऊन बनवले २४ इंचाचे बाय सेप्स, आता होतोय त्याला पश्चाताप...

रितेशनं एका मालवाहतूक व्यवसायाची सुरूवात केली. नोकरी सोडून स्वतःची वाहनं घेतली आणि या  व्यवसायाला कमी कालावधीतच चांगला प्रतिसाद मिळाला. आता (वेल सेट्ल्ड) रितेशच्या कुटुंबातील  सगळ्यांनीच त्याच्यासाठी स्थळ शोधण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. नोकरीवालाच नवरा हवा  या मुलींच्या दृष्टीकोनाबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यानिमित्तानं तरूणींच्या मुलांकडून असलेल्या अपेक्षांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. कारण मुलींच्या या आग्रहापायी अनेक तरुणांवर अविवाहित राहण्याची वेळ आली आहे असं चित्र पाहायला मिळतंय.

टॅग्स :businessव्यवसायnagpurनागपूरmarriageलग्नSocial Viralसोशल व्हायरल