शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीसह अनेक रेल्वे स्थानकावर चोऱ्या करणाऱ्या महिलांची टोळी नागपुरात जेरबंद, अर्ध्या तासात दोन चोऱ्या

By नरेश डोंगरे | Updated: May 5, 2025 20:10 IST

Nagpur Crime News: शेकडो लोकांच्या गर्दीत बिनबोभाट चोऱ्या करून रेल्वे पोलिसांच्या नाकात दम करणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्या महिलांच्या टोळीला रेल्वे पोलिसांनी तक्रार मिळाल्यानंतर काही वेळेतच जेरबंद केले.

- नरेश डोंगरेनागपूर - शेकडो लोकांच्या गर्दीत बिनबोभाट चोऱ्या करून रेल्वे पोलिसांच्या नाकात दम करणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्या महिलांच्या टोळीला रेल्वे पोलिसांनी तक्रार मिळाल्यानंतर काही वेळेतच जेरबंद केले. चाैघींच्या या टोळीने नागपूरसह हैद्राबाद, चेन्नई, तिरूपती, रायपूर, बिलासपूर, दिल्लीसह अनेक रेल्वे स्थानकावर धाडसी चोऱ्या केल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे.

गीता अजय सोलंकी (वय ४९), नितू विकास सोलंकी (वय २६), सोनिया अमर सोलंकी (वय २८) आणि मिनू बोरिया सोलंकी (वय ३०) अशी या चोरट्या महिलांची नावे आहेत. या सर्व महिला भावनगर, गुजरात येथील रहिवासी आहेत. त्यातील नितूला १० महिन्यांची मुलगी तर सोनियाला ९ महिन्यांचे बाळ आहे.

सावज शोधण्यासाठी त्या सतत रेल्वेने विविध प्रांतात फिरत असतात. मोठ्या रेल्वे स्थानकावर उतरायचे. सावज टिपत गर्दीत शिरायचे आणि बेमालूमपणे रोख तसेच दागिने लंपास करून दुसऱ्या प्रांतात पळून जायचे अशी त्यांची कार्यपद्धती आहे. रविवारी रात्री अशाच प्रकारे मुंबईकडे निघालेल्या अरूण पुनमचंद कोटेचा (रा. गांधीपुतळा इतवारी रोड नागपूर) यांच्या पत्नीच्या पर्समधून ४०हजारांची रोकड चोरली. त्याच्या एका तासानंतर परत त्यांनी नेहा अमन वानखेडे (रा. हुडकेश्वर) यांच्या पर्समधून सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. कोटेचा दाम्पत्य बडनेरा येथे पोहचल्यानंतर त्यांच्या लक्षात चोरीची घटना आली. त्यामुळे त्यांनी बडनेरा स्थानकावर तक्रार नोंदवली. बडनेरा पोलिसांनी नागपूर रेल्वे पोलिसांना कळविले. ईकडे नेहा वानखेडे यांनीही तक्रार दाखल केली. तासाभरात रेल्वे स्थानकावर दोन चोऱ्या झाल्याचे कळताच रेल्वे पोलीस अधीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे, ठाणेदार गाैरव गावंडे यांनी गंभीर दखल घेत सीसीटीव्हीच्या माध्यमातून चाैकशी सुरू केली.

तिसरा हात मारण्याची तयारीतासाभरात दोन हात मारल्यानंतर पहाटेच्या वेळी तिसरा हात मारून गुजरातला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या या टोळीतील महिला रेल्वे स्थानकावरच थांबल्या होत्या. फलाट क्रमांक सात वरील सीसीटीव्हीत त्या कैद झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन आज पहाटेच्या वेळी त्यांना जेरबंद केले. त्यांची चाैकशी केली असता त्यांनी दोन्ही गुन्ह्यांची कबुली देऊन चोरलेली रक्कम तसेच सोन्याचे मंगळसूत्र पोलिसांच्या हवाली केले.

चोरीनंतर लगेच हिस्सेवाटणीचोऱ्या केल्यानंतर या महिला लगेच हिस्सेवाटणी करून घेतात. ४० हजारांची रोकड हाती येताच त्यांनी ती समप्रमाणात वाटून घेतली. दरम्यान, त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या टोळीला अटक करण्याची कामगिरी रेल्वेच्या पोलीस अधीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग सोनवणे, प्रभारी अधिकारी गौरव गावंडे यांच्या नेतृत्वात संजय पटले, पुष्पराज मिश्रा, चंद्रकांत भोयर, भलावी, अजहर अली, अमित त्रिवेदी, प्रविण खवसे, विशाल मिश्रा, अमोल हिंगणे, धम्मपाल गवई आदींनी बजावली.

कारागृहात रवानगीप्राथमिक चाैकशीत या टोळीने नागपूरसह, दिल्ली, हैद्राबाद, चेन्नई, तिरूपती, रायपूर, बिलासपूर,सिकंदराबाद, विजयवाडा, अहमदाबाद, सूरतसह अनेक रेल्वे स्थानकावर धाडसी चोऱ्या केल्याचीही कबुली दिली. या टोळीमुळे अनेक ठिकाणच्या रेल्वे पोलिसांच्या नाकात दम झाल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्यांचे गांभिर्य पाहून न्यायालयाने त्यांना १७ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीIndian Railwayभारतीय रेल्वे