शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अखेर नागपूर ‘कर्फ्यू’मुक्त, सहा दिवसांनी बाजारपेठा सुरू, नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा

By योगेश पांडे | Updated: March 23, 2025 18:05 IST

Nagpur News: १७ मार्चला झालेल्या हिंसाचारानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला होता. सर्व भागात शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना यश आले. तसेच सणासुदीचे दिवस लक्षात घेता व्यापाऱ्यांचेदेखील नुकसान होऊ नये अशी मागणी समोर येत होती.

- योगेश पांडे नागपूर -  १७ मार्चला झालेल्या हिंसाचारानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला होता. सर्व भागात शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना यश आले. तसेच सणासुदीचे दिवस लक्षात घेता व्यापाऱ्यांचेदेखील नुकसान होऊ नये अशी मागणी समोर येत होती. पोलिसांनी एकूण स्थितीचा आढावा घेत तहसील, कोतवाली, गणेशपेठ व यशोधरानगरमधील कर्फ्यू मागे घेतला आहे. शहर ‘कर्फ्यू’मुक्त झाले असले तरी अनेक ठिकाणी सुरक्षाव्यवस्था मात्र तैनात राहणार आहे.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने शहरातील ११ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला होता. यात सक्करदरा, तहसील, कोतवाली, गणेशपेठ, यशोधरानगर, नंदनवन, इमामवाडा, शांतीनगर, लकडगंज, पाचपावली, कपिलनगर या पोलीस ठाण्यांचा प्रामुख्याने समावेश होता. मात्र, गुरुवारी सकाळी पोलिसांनी नंदनवन व कपिलनगरमधील कर्फ्यू हटविला, तर सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दुपारी दोन ते चार या कालावधीत शिथिलता दिली होती. मात्र रात्री सक्करदरा, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, इमामवाडा, सक्करदरा व यशोधरानगर येथील शिथिलता रद्द केली. शांतता प्रस्थापित झाल्याने संवेदनशील जागा वगळता इतर ठिकाणचा कर्फ्यू उठवावा अशी मागणी समोर आली होती.

शनिवारी पोलिसांनी सक्करदरा, इमामवाडा, पाचपावली, शांतीनगर आणि लकडगंजमधील नागरिकांना दिलासा देत तेथील कर्फ्यू हटविला होता. रविवारी परत एकदा पूर्ण स्थितीचा आढावा घेण्यात आला व पोलीस आयुक्तांनी कोतवाली, तहसील, गणेशपेठ व यशोधरानगरमधील कर्फ्यूदेखील हटविण्याचे निर्देश दिले. दुपारी तीन वाजतापासून कर्फ्यू दूर झाला.

अनेक दुकाने, बाजारपेठा सुरूकर्फ्यूमुळे या परिसरांमधील बाजारपेठा बंद होत्या व त्यामुळे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कर्फ्यू दूर होताच अनेक दुकानदारांनी लगेच दुकाने उघडली. तर काही बाजारपेठादेखील लहानमोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचे दिसून आले.

सुरक्षायंत्रणांसमोर मोठे आव्हानदरम्यान, संवेदनशील भागात पोलिसांची सुरक्षा कायम राहणार आहे. इतर ठिकाणी पोलीस गस्तीवर राहणार आहेत. प्रस्थापित झालेली शांतता कायम राखून शहरात सद्भाव वाढविण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस