शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

अखेर नागपूर ‘कर्फ्यू’मुक्त, सहा दिवसांनी बाजारपेठा सुरू, नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा

By योगेश पांडे | Updated: March 23, 2025 18:05 IST

Nagpur News: १७ मार्चला झालेल्या हिंसाचारानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला होता. सर्व भागात शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना यश आले. तसेच सणासुदीचे दिवस लक्षात घेता व्यापाऱ्यांचेदेखील नुकसान होऊ नये अशी मागणी समोर येत होती.

- योगेश पांडे नागपूर -  १७ मार्चला झालेल्या हिंसाचारानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला होता. सर्व भागात शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना यश आले. तसेच सणासुदीचे दिवस लक्षात घेता व्यापाऱ्यांचेदेखील नुकसान होऊ नये अशी मागणी समोर येत होती. पोलिसांनी एकूण स्थितीचा आढावा घेत तहसील, कोतवाली, गणेशपेठ व यशोधरानगरमधील कर्फ्यू मागे घेतला आहे. शहर ‘कर्फ्यू’मुक्त झाले असले तरी अनेक ठिकाणी सुरक्षाव्यवस्था मात्र तैनात राहणार आहे.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने शहरातील ११ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला होता. यात सक्करदरा, तहसील, कोतवाली, गणेशपेठ, यशोधरानगर, नंदनवन, इमामवाडा, शांतीनगर, लकडगंज, पाचपावली, कपिलनगर या पोलीस ठाण्यांचा प्रामुख्याने समावेश होता. मात्र, गुरुवारी सकाळी पोलिसांनी नंदनवन व कपिलनगरमधील कर्फ्यू हटविला, तर सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दुपारी दोन ते चार या कालावधीत शिथिलता दिली होती. मात्र रात्री सक्करदरा, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, इमामवाडा, सक्करदरा व यशोधरानगर येथील शिथिलता रद्द केली. शांतता प्रस्थापित झाल्याने संवेदनशील जागा वगळता इतर ठिकाणचा कर्फ्यू उठवावा अशी मागणी समोर आली होती.

शनिवारी पोलिसांनी सक्करदरा, इमामवाडा, पाचपावली, शांतीनगर आणि लकडगंजमधील नागरिकांना दिलासा देत तेथील कर्फ्यू हटविला होता. रविवारी परत एकदा पूर्ण स्थितीचा आढावा घेण्यात आला व पोलीस आयुक्तांनी कोतवाली, तहसील, गणेशपेठ व यशोधरानगरमधील कर्फ्यूदेखील हटविण्याचे निर्देश दिले. दुपारी तीन वाजतापासून कर्फ्यू दूर झाला.

अनेक दुकाने, बाजारपेठा सुरूकर्फ्यूमुळे या परिसरांमधील बाजारपेठा बंद होत्या व त्यामुळे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कर्फ्यू दूर होताच अनेक दुकानदारांनी लगेच दुकाने उघडली. तर काही बाजारपेठादेखील लहानमोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचे दिसून आले.

सुरक्षायंत्रणांसमोर मोठे आव्हानदरम्यान, संवेदनशील भागात पोलिसांची सुरक्षा कायम राहणार आहे. इतर ठिकाणी पोलीस गस्तीवर राहणार आहेत. प्रस्थापित झालेली शांतता कायम राखून शहरात सद्भाव वाढविण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस