शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

कॉपीमुक्त परीक्षेसाठी नागपूर शिक्षण मंडळ गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 20:02 IST

कॉपीमुक्त परीक्षा व्हाव्यात, पेपरफुटीचे प्रकार घडू नये यासाठी बोर्डाने अतिशय सावध पावले उचलली आहे. नियमात आणि परीक्षा प्रक्रियेत बदल घडवून आणत पेपर फुटीवर नियंत्रणासाठी सावध पाऊल उचलले आहे. बुधवार, २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. नागपूर बोर्डांतर्गत १७२४११ विद्यार्थी परीक्षा देणार आहे.

ठळक मुद्देविविध प्रयोगातून पेपरफुटीवर नियंत्रण : १ लाख ७२ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॉपीमुक्त परीक्षा व्हाव्यात, पेपरफुटीचे प्रकार घडू नये यासाठी बोर्डाने अतिशय सावध पावले उचलली आहे. नियमात आणि परीक्षा प्रक्रियेत बदल घडवून आणत पेपर फुटीवर नियंत्रणासाठी सावध पाऊल उचलले आहे. बुधवार, २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. नागपूर बोर्डांतर्गत १७२४११ विद्यार्थी परीक्षा देणार आहे.विभागात ४५२ केंद्रावर परीक्षा होणार आहे. यासाठी ७७ परिरक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार होऊ नये म्हणून भरारी पथकांची संख्या वाढविण्यात आली आहे. संवेदनशील केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणात परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या दूर व्हाव्यात व त्यांना ताण-तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी, यासंबंधी काही अडचणी आल्यास माहितीसाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ८२७५०३९२५२ व ९३७११६८८४० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हानिहाय परीक्षा केंद्र व विद्यार्थीजिल्हा      केंद्र        विद्यार्थीनागपूर  १४७           ६६८८२भंडारा   ६१               १९४१४चंद्रपूर  ७७             ३०४८८वर्धा    ४८                १८७८३गडचिरोली ४६       १४३५४गोंदिया  ७३          २२४९० विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीने फोडले जाणार पेपरआतापर्यंत कस्टोडियनमार्फत प्रश्नपत्रिकांचे सीलबंद गठ्ठे केंद्र संचालकांच्या ताब्यात दिले जात होते. केंद्र संचालकांच्या आदेशानुसार परीक्षा केंद्रात एका हॉलमध्ये ते गठ्ठे फोडले जायचे. त्या ठिकाणी परीक्षेच्या वर्गावर नेमलेल्या पर्यवेक्षकांना प्रश्नपत्रिकांचे वाटप केले जायचे. यंदापासून केंद्र संचालक २५ प्रश्नपत्रिकांची सीलबंद पाकिटे पर्यवेक्षकांना देतील. परीक्षेपूर्वी काही मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकीट दोन परीक्षार्थींच्या स्वाक्षरीने फोडले जाणार आहे.तीन तास बसा तरच मिळेल प्रश्नपत्रिकापूर्वी विद्यार्थ्यांना पेपर सोडविल्यानंतर उत्तरपत्रिका परीक्षकाला देऊन, प्रश्नपत्रिका घरी घेऊन जाता येत होती. मोबाईल तंत्रज्ञानामुळे पेपर फुटीसारखे प्रकरण वाढल्याचे प्रकार होत असल्याने बोर्डाने यावर्षीपासून जो विद्यार्थी पूर्णवेळ बसेल, त्यालाच प्रश्नपत्रिका घरी नेता येणार आहे. विद्यार्थ्याने पेपरच्या वेळेच्या आत पेपर सोडविला तरी, त्याला प्रश्नपत्रिका घरी घेऊन जाता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता प्रश्नपत्रिका हवी असेल, तर तीन तास परीक्षा केंद्रावर बसावेच लागले. दररोज बदलणार सहा. परिरक्षकबोर्डाने कॉपीमुक्त अभियान राबविताना परीक्षा प्रक्रियेत अनेक बदल घडवून आणले आहे. त्यातील एक बदल म्हणजे सहायक परिरक्षक नियमित बदलणार आहे. पूर्वी सहायक परिरक्षक एकदा नियुक्त केला करी परीक्षा संपेपर्यंत तिथेच रहायचा. आता त्याला दररोज वेगवेगळे केंद्र मिळणार आहे. सहा. परिरक्षक यांच्याकडे केंद्रावरून पेपर घेऊन जाणे, विद्यार्थ्यांनी पेपर सोडविल्यानंतर ते संकलित करून, केंद्रावर आणणे हे काम आहे. विद्यार्थ्यांना सूचनासकाळी १० वाजता विद्यार्थ्यांनी केंद्रावर रिपोर्टिंग करावे.१०.२० पर्यंत विद्यार्थ्यांनी खोली व बैठकीची व्यवस्था शोधावी.१०.३० पर्यंत विद्यार्थ्यांनी आपल्या व्यवस्थेवर बसावे.१०.३५ ला उत्तरपत्रिकेचे वितरण करण्यात येईल.१०.४५ ला प्रश्नपत्रिकेचे वितरण होईल.११ वाजता परीक्षा सुरू होईल.

टॅग्स :educationशैक्षणिकexamपरीक्षा