शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

कॉपीमुक्त परीक्षेसाठी नागपूर शिक्षण मंडळ गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 20:02 IST

कॉपीमुक्त परीक्षा व्हाव्यात, पेपरफुटीचे प्रकार घडू नये यासाठी बोर्डाने अतिशय सावध पावले उचलली आहे. नियमात आणि परीक्षा प्रक्रियेत बदल घडवून आणत पेपर फुटीवर नियंत्रणासाठी सावध पाऊल उचलले आहे. बुधवार, २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. नागपूर बोर्डांतर्गत १७२४११ विद्यार्थी परीक्षा देणार आहे.

ठळक मुद्देविविध प्रयोगातून पेपरफुटीवर नियंत्रण : १ लाख ७२ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॉपीमुक्त परीक्षा व्हाव्यात, पेपरफुटीचे प्रकार घडू नये यासाठी बोर्डाने अतिशय सावध पावले उचलली आहे. नियमात आणि परीक्षा प्रक्रियेत बदल घडवून आणत पेपर फुटीवर नियंत्रणासाठी सावध पाऊल उचलले आहे. बुधवार, २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. नागपूर बोर्डांतर्गत १७२४११ विद्यार्थी परीक्षा देणार आहे.विभागात ४५२ केंद्रावर परीक्षा होणार आहे. यासाठी ७७ परिरक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार होऊ नये म्हणून भरारी पथकांची संख्या वाढविण्यात आली आहे. संवेदनशील केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणात परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या दूर व्हाव्यात व त्यांना ताण-तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी, यासंबंधी काही अडचणी आल्यास माहितीसाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ८२७५०३९२५२ व ९३७११६८८४० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हानिहाय परीक्षा केंद्र व विद्यार्थीजिल्हा      केंद्र        विद्यार्थीनागपूर  १४७           ६६८८२भंडारा   ६१               १९४१४चंद्रपूर  ७७             ३०४८८वर्धा    ४८                १८७८३गडचिरोली ४६       १४३५४गोंदिया  ७३          २२४९० विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीने फोडले जाणार पेपरआतापर्यंत कस्टोडियनमार्फत प्रश्नपत्रिकांचे सीलबंद गठ्ठे केंद्र संचालकांच्या ताब्यात दिले जात होते. केंद्र संचालकांच्या आदेशानुसार परीक्षा केंद्रात एका हॉलमध्ये ते गठ्ठे फोडले जायचे. त्या ठिकाणी परीक्षेच्या वर्गावर नेमलेल्या पर्यवेक्षकांना प्रश्नपत्रिकांचे वाटप केले जायचे. यंदापासून केंद्र संचालक २५ प्रश्नपत्रिकांची सीलबंद पाकिटे पर्यवेक्षकांना देतील. परीक्षेपूर्वी काही मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकीट दोन परीक्षार्थींच्या स्वाक्षरीने फोडले जाणार आहे.तीन तास बसा तरच मिळेल प्रश्नपत्रिकापूर्वी विद्यार्थ्यांना पेपर सोडविल्यानंतर उत्तरपत्रिका परीक्षकाला देऊन, प्रश्नपत्रिका घरी घेऊन जाता येत होती. मोबाईल तंत्रज्ञानामुळे पेपर फुटीसारखे प्रकरण वाढल्याचे प्रकार होत असल्याने बोर्डाने यावर्षीपासून जो विद्यार्थी पूर्णवेळ बसेल, त्यालाच प्रश्नपत्रिका घरी नेता येणार आहे. विद्यार्थ्याने पेपरच्या वेळेच्या आत पेपर सोडविला तरी, त्याला प्रश्नपत्रिका घरी घेऊन जाता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता प्रश्नपत्रिका हवी असेल, तर तीन तास परीक्षा केंद्रावर बसावेच लागले. दररोज बदलणार सहा. परिरक्षकबोर्डाने कॉपीमुक्त अभियान राबविताना परीक्षा प्रक्रियेत अनेक बदल घडवून आणले आहे. त्यातील एक बदल म्हणजे सहायक परिरक्षक नियमित बदलणार आहे. पूर्वी सहायक परिरक्षक एकदा नियुक्त केला करी परीक्षा संपेपर्यंत तिथेच रहायचा. आता त्याला दररोज वेगवेगळे केंद्र मिळणार आहे. सहा. परिरक्षक यांच्याकडे केंद्रावरून पेपर घेऊन जाणे, विद्यार्थ्यांनी पेपर सोडविल्यानंतर ते संकलित करून, केंद्रावर आणणे हे काम आहे. विद्यार्थ्यांना सूचनासकाळी १० वाजता विद्यार्थ्यांनी केंद्रावर रिपोर्टिंग करावे.१०.२० पर्यंत विद्यार्थ्यांनी खोली व बैठकीची व्यवस्था शोधावी.१०.३० पर्यंत विद्यार्थ्यांनी आपल्या व्यवस्थेवर बसावे.१०.३५ ला उत्तरपत्रिकेचे वितरण करण्यात येईल.१०.४५ ला प्रश्नपत्रिकेचे वितरण होईल.११ वाजता परीक्षा सुरू होईल.

टॅग्स :educationशैक्षणिकexamपरीक्षा