शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प काठोकाठ असूनही नागपूर शहराला पाणी कमी मिळणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:46 IST

तोतलाडोह व नवेगाव खैरी प्रकल्प काठोकाठ भरले आहे. त्यानंतरही नागपूर शहराला १० दलघमी पाणी कमी मिळणार आहे. पाण्याचे महत्त्व कळावे व पाण्याची नासाडी कमी व्हावी, या हेतूने महाराष्ट्र जल संसाधन नियोजन प्राधिकरणाने नागपूर शहरासाठी १७२ दलघमी पाणी आरक्षित केले आहे.

ठळक मुद्देमनपाची मागणी १८२ दलघमीची मिळाले १७२ दलघमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तोतलाडोह व नवेगाव खैरी प्रकल्प काठोकाठ भरले आहे. त्यानंतरही नागपूर शहराला १० दलघमी पाणी कमी मिळणार आहे. पाण्याचे महत्त्व कळावे व पाण्याची नासाडी कमी व्हावी, या हेतूने महाराष्ट्र जल संसाधन नियोजन प्राधिकरणाने नागपूर शहरासाठी १७२ दलघमी पाणी आरक्षित केले आहे. वास्तविक महापालिकेने १८२ दलघमी पाण्याची मागणी केली होती. जलसंपदा विभागाने पाणी आरक्षणाला मंजुरी दिली आहे. पाणी आरक्षणाची व्यवस्था तात्काळ लागू करण्यात आली आहे. आरक्षण ३१ ऑक्टोबर २०२० पर्र्यत लागू राहणार आहे.महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने दिलेल्या माहितीनुसार तोतलाडोह प्रकल्पातून नागपूर शहराला १५२ दलघमी तर कन्हान नदीतून २० दलघमी पाणी मिळणार आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत जल संसाधन नियोजन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी वाटपाचा आराखडा निश्चित केला. पाण्याची बचत करावयाची आहे. फक्त १२ महिन्यांचा विचार करून चालणार नाही. भविष्याचा विचार करता पाणी बचत करणे गरजेचे आहे. त्यामुळे गरज लक्षात घेऊन आरक्षण निश्चित केल्याचे रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.गेल्या वर्षी महापालिकेने १९३ दलघमी पाण्याची मागणी केली होती. यातील १५५ दलघमी पाणी आरक्षित ठेवण्यात आले होते. परंतु उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची मागणी वाढली होती. तोतलाडोतील मृत साठ्यातील पाणी उचलण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी दिली होती. त्यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला होता. महापालिकेने १७०दलघमी पाणी उचलले होते. नागपूर शहराला दररोज ६४० ते ६६० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो.तोतलाडोहात ९९.२२ टक्के साठाशहरासाठी मर्यादित पाणी आरक्षण ठेवले आहे. परंतु तोतलाडोह प्रकल्पात सध्या ९९.२२ टक्के जलसाठा आहे. नवेगाव खैरी प्रकल्पात ७६.२४ टक्के जलसाठा आहे. तोतलाडोह प्रकल्पाची एकूण क्षमता ११६६.९३ दलघमी आहे. सध्या प्रकल्पात ११५८ दलघमी पाणी आहे. नवेगाव खैरी प्रकल्पाची साठवण क्षमता १८०.९८ दलघमी असून सध्या या प्रकल्पात १४७.२५ दलघमी जलसाठा आहे. गेल्या वर्षी या कालावधीत तोतलाडोह प्रकल्पात १३.१ टक्के तर नवेगाव खेरी प्रकल्पात ३९.५८ टक्के साठा होता.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाwater shortageपाणीकपात