शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

प्रकल्प काठोकाठ असूनही नागपूर शहराला पाणी कमी मिळणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:46 IST

तोतलाडोह व नवेगाव खैरी प्रकल्प काठोकाठ भरले आहे. त्यानंतरही नागपूर शहराला १० दलघमी पाणी कमी मिळणार आहे. पाण्याचे महत्त्व कळावे व पाण्याची नासाडी कमी व्हावी, या हेतूने महाराष्ट्र जल संसाधन नियोजन प्राधिकरणाने नागपूर शहरासाठी १७२ दलघमी पाणी आरक्षित केले आहे.

ठळक मुद्देमनपाची मागणी १८२ दलघमीची मिळाले १७२ दलघमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तोतलाडोह व नवेगाव खैरी प्रकल्प काठोकाठ भरले आहे. त्यानंतरही नागपूर शहराला १० दलघमी पाणी कमी मिळणार आहे. पाण्याचे महत्त्व कळावे व पाण्याची नासाडी कमी व्हावी, या हेतूने महाराष्ट्र जल संसाधन नियोजन प्राधिकरणाने नागपूर शहरासाठी १७२ दलघमी पाणी आरक्षित केले आहे. वास्तविक महापालिकेने १८२ दलघमी पाण्याची मागणी केली होती. जलसंपदा विभागाने पाणी आरक्षणाला मंजुरी दिली आहे. पाणी आरक्षणाची व्यवस्था तात्काळ लागू करण्यात आली आहे. आरक्षण ३१ ऑक्टोबर २०२० पर्र्यत लागू राहणार आहे.महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने दिलेल्या माहितीनुसार तोतलाडोह प्रकल्पातून नागपूर शहराला १५२ दलघमी तर कन्हान नदीतून २० दलघमी पाणी मिळणार आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत जल संसाधन नियोजन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी वाटपाचा आराखडा निश्चित केला. पाण्याची बचत करावयाची आहे. फक्त १२ महिन्यांचा विचार करून चालणार नाही. भविष्याचा विचार करता पाणी बचत करणे गरजेचे आहे. त्यामुळे गरज लक्षात घेऊन आरक्षण निश्चित केल्याचे रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.गेल्या वर्षी महापालिकेने १९३ दलघमी पाण्याची मागणी केली होती. यातील १५५ दलघमी पाणी आरक्षित ठेवण्यात आले होते. परंतु उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची मागणी वाढली होती. तोतलाडोतील मृत साठ्यातील पाणी उचलण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी दिली होती. त्यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला होता. महापालिकेने १७०दलघमी पाणी उचलले होते. नागपूर शहराला दररोज ६४० ते ६६० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो.तोतलाडोहात ९९.२२ टक्के साठाशहरासाठी मर्यादित पाणी आरक्षण ठेवले आहे. परंतु तोतलाडोह प्रकल्पात सध्या ९९.२२ टक्के जलसाठा आहे. नवेगाव खैरी प्रकल्पात ७६.२४ टक्के जलसाठा आहे. तोतलाडोह प्रकल्पाची एकूण क्षमता ११६६.९३ दलघमी आहे. सध्या प्रकल्पात ११५८ दलघमी पाणी आहे. नवेगाव खैरी प्रकल्पाची साठवण क्षमता १८०.९८ दलघमी असून सध्या या प्रकल्पात १४७.२५ दलघमी जलसाठा आहे. गेल्या वर्षी या कालावधीत तोतलाडोह प्रकल्पात १३.१ टक्के तर नवेगाव खेरी प्रकल्पात ३९.५८ टक्के साठा होता.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाwater shortageपाणीकपात