शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

नागपुरात सहा महिन्यातच भाजपची १,४३,९४९ मते घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 00:27 IST

नितीन गडकरी यांना ज्या विधानसभा मतदार संघात बढत मिळाली होती, ती मते सुद्धा भाजपला कायम राखता आली नाही. पक्षाला काही महिन्यातच १ लाख ४३ हजार ९४९ मतांचे नुकसान सहन करावे लागले.

ठळक मुद्देकाँग्रेस दोन जागांवर विजयी, परंतु मतांमध्ये केवळ १७,७३८ ने वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१४ च्या निवडणुकांप्रमाणे शहरातील सहाही जागा जिंकण्याच्या विश्वासाने उतरलेल्या सत्ताधारी भाजपला जोरदार धक्का बसला आहे. भाजपच्या दोन जागा हातून गेल्या. मजबूत संघटन असल्याचा दावा करणाऱ्या भाजपला सहा महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेले मतदानही वाचवता आले नाही. गडकरी यांना ज्या विधानसभा मतदार संघात बढत मिळाली होती, ती मते सुद्धा भाजपला कायम राखता आली नाही. पक्षाला काही महिन्यातच १ लाख ४३ हजार ९४९ मतांचे नुकसान सहन करावे लागले.यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चरणात नागपूर लोकसभा मतदार संघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान पार झाले. पक्षाचे नेते व उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तब्बल ६ लाख ६० हजार २२१ मते घेत विजय प्राप्त केला. काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांना ४ लाख ४४ हजार २१२ मते मिळाली. भाजप केवळ उत्तर नागपुरात माघारला. ते सुद्धा केवळ ८,९१० मतांनी. उर्वरित पाचही विधानसभा मतदार संघात गडकरी यांना प्रचंड लीड होती. सध्या २१ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदार क्षेत्रांतर्गत येणाऱ्या शहरातील सहाही विधानसभा मिळून भाजपला केवळ ५ लाख १६ हजार २७२ मते मिळाली. त्यामुळे सरळसरळ सहा महिन्यातच पक्षाचे १ लाख ४३ हजार ९४९ मते कमी झाली. भाजपला उत्तर नागपूरसह पश्चिम नागपुरातही पराभव पत्करावा लागला.दुसरीकडे विधानसभेत शहरातील सर्व जागा गमावलेल्या काँग्रेसला उत्तर नागपुरात आघाडी मिळाली होती. यात आणखी सुधारणा करीत विधानसभेत उतरलेल्या काँग्रेसने उत्तरसह पश्चिम नागपुरातही विजय खेचून आणला. दक्षिण आणि मध्य नागपुरातही काँग्रेसने कडवी झुंज दिली. या दोन जागा जिंकण्यासाठी भाजपला घाम गाळावा लागला. फार थोड्या मतांच्या फरकाने या दोन जागा भाजपने जिंकल्या. इतकी चांगली कामगिरी केल्यानंतरही काँग्रेसच्या मतांमध्ये मात्र केवळ १७७३८ मतांचीच भर पडली.भाजपच्या निराशाजनक कामगिरीमागे स्थानिक नेत्यांचा अतिआत्मविश्वास हे सुद्धा एक कारण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरच बहुतांश कार्यकर्ते अवलंबून राहिल्याचेही कारण सांगितले जाते. दक्षिण नागपूरमध्ये पक्षाला माजी उपमहापौर सतीश होले आणि किशोर कुमेरिया यांची बंडखोरी रोखता आली नाही. त्याचप्रकारे तिकीट नाकारण्यात आलेल्या एका पदाधिकाऱ्यांची पत्नी काँग्रेस उमेदवाराच्या पत्नीबरोबर प्रचारात फिरत होती.त्यामुळे भाजपचे उमेदवार मोहन मते यांच्या पत्नी सविता यांनाही सक्रिय व्हावे लागले. या सर्व गोष्टी अगोदरच नियंत्रित करता आल्या असत्या तर निवडणुकीत कडवा संघर्ष करावा लागला नसता. उत्तर नागपुरात अनेक बौद्धबहुल भागात मतदानाच्या दिवशी बुथ सुद्धा लावण्यात आले नाही. त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते दुखावले गेले. पक्षाचे उमेदवार डॉ. मिलिंद माने यांना मागील पाच वर्षात स्वत:च्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करता आली नाही. मतदार संघ बांधता आला नाही. पक्षाने सुद्धा त्यांना तसे करू दिले नाही. त्यांच्या प्रामाणिक व स्वच्छ प्रतिमेचा उपयोग पक्षालाही करून घेता आला नाही. काही पदाधिकाऱ्यांचा दावा आहे की, डॉ. माने यांना सुद्धा परिस्थितीचे आकलन झाले होते. त्यामुळेच त्यांनी कदाचित आपल्या रुग्णालयाकडे अधिक लक्ष देणे सुरु केले होते. पश्चिममध्ये सुद्धा माजी आमदार सुधाकर देशमुख यांना त्यांच्या विरोधातील लाट दिसून आली नाही. पूर्व नागपूरला आपला गड बनवलेल्या भाजपला स्मार्ट सिटी व पारडी उड्डाण पूल सारखे मुद्दे व्यवस्थित हाताळता आले नाही. परिणामी काँग्रेसचे उमेदवार पुरुषोत्तम हजारे यांनी ७९,९७५ मते घेऊन भाजपचे विजयी उमेदवार कृष्णा खोपडे यांना केवळ २४ हजाराच्या लीडवर रोखून धरले. लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी पूर्व नागपुरातून ७५,३८० मतांची आघाडी घेतली होती. त्याचप्रकारे मध्य नागपूरमध्ये सुद्धा भाजपचे उमेदवार विकास कुंभरे यांना संघर्ष करावा लागला. एमआयएमचा उमेदवार नसता तर ही जगाही भाजपच्या हातून गेली असती.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाVotingमतदान