शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

मागील तीन वर्षांत नागपूरने दोन केंद्रीय संस्थाही गमावल्या; एनआयएमएच अहमदाबादला, तर सीबीडब्ल्यूई दिल्लीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 06:24 IST

एनआयएमएच अहमदाबादला, तर सीबीडब्ल्यूई दिल्लीला गेले

- आशिष रॉय नागपूर :  २२ हजार कोटी रुपयांचा टाटा एअरबस प्रकल्प वडोदराला गेल्यानंतर नागपूरकर प्रचंड संतापले आहेत. परंतु केवळ उद्योगच नव्हे तर नागपूर शहराने मागील तीन वर्षात केंद्राच्या दोन महत्त्वाच्या संस्थासुद्धा गमावल्या आहेत, हे विशेष! राष्ट्रीय खनिक आरोग्य संस्थान (एनआयएमएच) ला गुजरातच्या अहमदाबादला हलवण्यात आले. तर केंद्रीय कामगार शिक्षण मंडळ (श्रमिक शिक्षा बोर्ड)ला नागपूरवरून दिल्लीत स्थापित करण्यात आले. कुठल्याही पक्षाने या संस्था बाहेर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला नाही.

एनआयएमएचला बंद होण्यापासून वाचवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या अंजली साळवे - विटणकर यांनी सांगितले की, जुलै २०१९मध्ये एनआयएमएचला बंद करून ते राष्ट्रीय व्यावसायिक आरोग्य संस्थेत (एनआयओएच) अहमदाबाद येथे विलीन करण्यात आले. त्यावेळी स्थानिक नेत्यांची भेट घेतली. परंतु कुणीही मदत केली नाही. येथे केंद्र सरकारच्या मोठ्या प्रमाणावर खाणी आहेत. त्यामुळे एनआयएमएचला नागपुरातच ठेवायला हवे होते. केंद्रीय कामगार शिक्षण मंडळ जेव्हा दिल्लीला शिफ्ट केले जात होते तेव्हाही स्थानिक नेते उदासीन होते.    

 एनआयपीईआर कुठे आहे? 

तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राष्ट्रीय औषधीय शिक्षण व अनुसंधान संस्था (एनआयपीईआर) ची शाखा नागपुरात उघडण्याची घोषणा फेब्रुवारी २०१५मध्ये केली होती. राज्य सरकारने कालडोंगरी येथे ४० एकर जागाही निश्चित केली होती. परंतु सात वर्षे लोटूनही केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या एक्सपेंडिचेर फायनान्स कमिटीने याला हिरवी झेंडी दाखवलेली नाही.   

एमआरओ गेला हैदराबादला 

फ्रान्सची कंपनी सेफरनने मिहानमध्ये मेंटेनन्स, रिपेअर आणि ओवर हॉल डिपो डेपो (एमआरओ) लावण्याची इच्छा दर्शविली होती. परंतु महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने वेळेत जमीन उपलब्ध करून दिली नाही. या प्रकल्पात १,१८५ कोटी  रुपयांची गुंतवणूक होणार होती. महाविकास आघाडीचे सरकार असताना सेफरनने २०२२मध्ये एमआरओ हैदराबादला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे