शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

Nagpur: ‘हिट ॲंड रन’ प्रकरणात २२ दिवसांनी आरोपी ताब्यात, मात्र नोटीस देऊन सुटका, पोलिसांच्या भूमिकेविरोधात संताप

By योगेश पांडे | Updated: May 30, 2024 21:50 IST

Nagpur News: मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलांना उडविण्याच्या प्रकरणात पोलिसांनी २२ दिवसांनी आरोपीला शोधून ताब्यात घेतले. मात्र त्याच्यावर दाखल कलमे लक्षात घेता केवळ नोटीस देऊन त्याची सुटका करण्यात आली आहे. त्याच्या एका चुकीमुळे महिलेला मरणयातना भोगाव्या लागत असून बसणेदेखील कठीण झाले आहे.

- योगेश पांडे नागपूर - मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलांना उडविण्याच्या प्रकरणात पोलिसांनी २२ दिवसांनी आरोपीला शोधून ताब्यात घेतले. मात्र त्याच्यावर दाखल कलमे लक्षात घेता केवळ नोटीस देऊन त्याची सुटका करण्यात आली आहे. त्याच्या एका चुकीमुळे महिलेला मरणयातना भोगाव्या लागत असून बसणेदेखील कठीण झाले आहे. मात्र कायद्याचा आधार घेत आरोपी मात्र मोकाट बाहेर पडला आहे. या प्रकरणात पोलिसांची सुरुवातीपासूनची भूमिका संशयास्पद होती व आता या प्रकारामुळे तर आणखी संताप व्यक्त करण्यात येत आहे.

७ मे २०२४ ला सकाळी ७ च्या दरम्यान गिट्टीखदानमधील ममता संजय आदमने (वय ४५) आणि वंदना अजय पाटील या दोघींना शिवाजी चौकात एका पांढऱ्या रंगाच्या कारने चिरडले होते. सीसीटीव्हीमध्ये हा अपघात कैद झाला होता. या अपघातानंतर आदमने यांची प्रकृती खालावली असून त्यांना पलंगावरून उठणेदेखील शक्य नाही. त्यांच्या कुटुंबावर यामुळे मोठा आर्थिक ताण पडला आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्यात जखमींच्या बयाणाच्या आधारावर भादंविच्या कलम २७९, ३३७ तसेच मोटर वाहन कायद्याच्या कलम १३४, १७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये आरोपीच्या कारचा नंबर स्पष्ट दिसत नसल्याचे सांगत हात झटकणे सुरू केले. अखेर सोशल माध्यमांवर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ सक्रिय झाले व आरोपी कारचालकाला शोधण्यासाठी पावले उचलण्यात आली. तपासानंतर पोलिसांनी कमलेश नावाच्या कॅबचालकाला ताब्यात घेतले. आश्चर्याची बाब म्हणजे त्याच्या चुकीमुळे एक महिला मरणयातना भोगत असताना त्याला केवळ नोटीस देऊन सोडून देण्यात आले. तर त्याची कार जप्त करण्यात आली. अपघात प्रकरणातील कलमांनुसार त्याला सोडण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र गुन्हा दाखल करतानाच कठोर कलमं का लावण्यात आली नाहीत, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

सोशल माध्यमांमुळे आली पोलिसांना जाग?या प्रकरणात पोलीस अगोदर हात झटकत होते व सीसीटीव्हीत कारचा क्रमांक दिसत नसल्याचा दावा करत होते. मात्र हे प्रकरण सोशल माध्यमांमध्ये येताच पोलिसांना जाग आली व दोन दिवसांत आरोपीचा शोध लावून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे पोलिसांची सुरुवातीची भूमिका प्रामाणिक होती की आता दबाव निर्माण झाल्यामुळे पावले उचलण्यात आली असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातnagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी