शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दीक्षाभूमीवर  नमो बुद्धाय, जयभीमचा जयघोष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 21:49 IST

नागपुरातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो आंबेडकरी अनुयायांनी दीक्षाभूमीवर येऊन अभिवादन केले. नमो बुद्धाय, जयभीमच्या जयघोषाने दीक्षाभूमी दुमदुमली होती.

ठळक मुद्देधम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि तथागतांचे धम्मचक्र गतिमान केले. या ऐतिहासिक क्रांतीला भारताच्या इतिहासात वेगळेच महत्त्व आहे. या दिनाच्या निमित्ताने सोमवारी केवळ नागपुरातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो आंबेडकरी अनुयायांनी दीक्षाभूमीवर येऊन अभिवादन केले. नमो बुद्धाय, जयभीमच्या जयघोषाने दीक्षाभूमी दुमदुमली होती.‘६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना’च्यानिमित्ताने सकाळी ७ वाजता दीक्षाभूमीवर विविध संघटनांच्या वतीने सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. शुभ्र वस्त्र परिधान केलल्या जत्थ्याजत्थ्याने येणाऱ्या अनुयायांनी दीक्षाभूमी फुलून गेली होती. दीक्षाभूमी येथील स्तुपामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी अनुयायांची रांग लागली होती. तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना देत जयघोष केला जात होता. सायंकाळी अनुयायांची गर्दी वाढली होती. अनेक जण आपल्या कुटुंबासह जेवण्याच्या डब्यासह आले होते. ‘जयभीम’ या एकाच उच्चाराने अनोळखी कुटुंबही आपला डबा ‘शेअर’ करताना दिसून येत होते. रात्री उशिरापर्यंत दीक्षाभूमीवर अनुयायांची गर्दी होती. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीच्यावतीने पिण्याचे पाणी व इतरही सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. फूटपथावर पुस्तकांचे व तथागत गौतम बुद्ध, बाबासाहेबांच्या मूर्ती, फोटोंचे स्टॉल्स लागले होते. विशेष म्हणजे, यावर्षी केवळ नागपुरातूनच नव्हे तर तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कोल्हापूर आदी ठिकाणांहूनही अनुयायी आले होते.वस्त्यावस्त्यांमधून निघाली रॅलीनागपूरच्या विविध वस्त्यांमध्ये ‘भीम रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. दुपारी निघालेली रॅली सायंकाळी दीक्षाभूमीवर पोहचताच एकच जल्लोष होत होता. पांढऱ्या वस्त्रातील अनुयायी ‘जयभीम’च्या जयघोषात एकमेकांना शुभेच्छा देत होते. जयभीमनगर, इंदोरा, टाकळी सीम, नारा, बेझनबाग, अंबाझरी, गोपालनगर, त्रिमूर्तीनगर, चंदननगर, जाटतरोडी, चंद्रमणीनगर, नवीन बाभूळखेडा, मानेवाडा, दिघोरी यासारख्या कितीतरी वस्त्यांमधून रॅली निघाल्या.संविधान चौकात आकर्षक रोषणाईसंविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. येथेही सकाळपासून अनुयायांनी गर्दी करून बाबासाहेबांना मानवंदना दिली. सायंकाळी या ठिकाणी काही संघटनांनी विविध सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीReligious programmeधार्मिक कार्यक्रम