शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'आम्ही छातीवर वार करु, तुमच्यासारखा पाठीवर नाही'; नागपुरातून उद्धव ठाकरे कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 20:47 IST

आज भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये मविआची वज्रमूठ सभा पार पडली.

नागपूर: आज राज्याची उपराजधानी आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरात महाविकास आघाडाची वज्रमूठ सभा पार पडली. यावेळी तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. शिवसेना(उबाठा) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी पुन्हा एकदा सरकार पाडण्यावरुन शिंदेगड आणि भाजपवर जोरदार टीका केली. 

यावेली बोलताना उद्ध ठाकरे म्हणाले, 'आपल्या देशात लोकशाही आहे असं आपण मानतो पण, देशातील लोकशाहीचा उपयोग सत्ताधाऱ्यांच्या मित्रांसाठीच होत आहे. त्यांचे मित्र जगात श्रीमंतांच्या यादीत अव्वल आहेत आणि आपल्या देशाचा क्रमांक खाली-खाली येत आहे. भारत मातेच्या पायामध्ये पुन्हा बेड्या घालण्याचे काम सुरू आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेचे रक्षण करण्याची वेळ आली आहे.' 

'आमच्या सरकारने काहीच कामे केली नाही, असे ते बोलतात. पण, आमच्या काळात जागतिक संकट आले होते. आज चार चार दिवसांनी गारपीट होते, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. तरीदेखील शेतकऱ्यांना काही मिळतं नाही. हे उलट्या पायाचे सरकार आहे. आमचं सरकार नालायक असतं, तर एवढी लोकं आलीच नसती. आमच्या काळात आम्ही कमीत कमी वेळेत मदत पोहोचवली होती. आजचे सरकार भूलथापा मारणारे सरकार आहे,' अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.

ते पुढे म्हणतात, 'आमचं सरकार यांनी गद्दारी करुन पाडलं. यांनी आमच्या पाठीत वार केला. महाराष्ट्र शूरांचा आहे, पाठीमागून वार करणारा महाराष्ट्र नाही. आम्ही वार झेलू तर छातीवर आणि वार करू तर छातीवरच करू. ही शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे. आजचे मुख्यमंत्री अयोध्येला जातात. पण, हे खरंच रामभक्त असते तर आधी सूरत-गुवाहाटीला न जाता अदोध्येले गेले असते.' 

'आधीचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यापूर्वी कधीच अयोध्येला गेले नाही. आता मुख्यमंत्र्यांच्या मागे मागे गेले. तुझा शर्ट माझ्यापेक्षा भगवा कसा, यासाठीच यांचा दौरा होता. आज शेतकऱ्यांना रात्रभर झोप येत नाही आणि सत्ताधारी देवदर्शनाला जातात. रामराज्य कधी येणार माझ्या महाराष्ट्रात, देशात? तुमच्या पदाचा काय उपयोग ? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेnagpurनागपूरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे