शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

महावितरण आक्रमक : १०,८०० थकबाकीदारांची वीज कापली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 22:17 IST

MSEDCL aggressive वीज बिलाची थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध महावितरणने कारवाई आणखी तीव्र केली आहे. याअंतर्गत नागपूर झोन व वर्धा जिल्ह्यातील १०,८०० ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्यात आले.

ठळक मुद्देनागरिकांच्या तक्रारीही वाढल्या

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वीजबिलाची थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध महावितरणने कारवाई आणखी तीव्र केली आहे. याअंतर्गत नागपूर झोन व वर्धा जिल्ह्यातील १०,८०० ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्यात आले. या ग्राहकांवर एकूण ३३१ कोटी रुपयाची थकबाकी आहे. दुसरीकडे महावितरण संदर्भात नागरिकांच्या तक्रारीही वाढल्या आहेत.

जून महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही जिल्ह्यात थकीत वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. अनेक ग्राहकांनी महावितरणच्या आवाहनानुसार थकबाकी भरली. परंतु ज्या ग्राहकांनी पैसे भरले नाहीत. त्यांचे वीज कनेेक्शन कापले जात आहे. या मोहीम अंतर्गत बुधवारी महाल डिव्हीजनमधील ३० थकबाकीदार ग्राहकांची वीज कापण्यात आली. त्यांच्यावर एकूण ३४.६२ लाख रुपयांची थकबाकी होती. दोन थकबाकीदारांनी लगेच १.१७ लाखाचा भरणा केल्याने ते कारवाईपासून वाचले. दुसरीकडे ठक्करग्राम, नाईक तलाव, बंगाली पंजा परिसरात पोलीस बंदोबस्तात ८ ग्राहकांचे कनेक्शन कापण्यात आले. ३ ग्राहकांनी तत्काळ पैसे भरले. मोहिमे दरम्यान २४ ठिकाणी वीज चोरीही पकडण्यात आली. या ग्राहकांवर कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई कार्यकारी अभियंता समीर टेकाडे, उपकार्यकारी अभियंता मुकेश चौधरी, प्रशांत भाजीपाले, सहायक अभियंता प्रशांत इंगळे, अल्पेश चव्हाण, तुषार मेंढे यांनी केली.

पुन्हा हल्ला-शिवीगाळ

वसुली मोहीम दरम्यान महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर सातत्याने हल्ले होताहेत. शिवीगाळ केली जात आहे. ताजे प्रकरण बेसा वितरण केंद्राअंतर्गत घडले. सहायक अभियंता विनोद नासरे आपल्या सहकाऱ्यांसह अथर्व हेरिटेज येथे थकबाकी वसुलीसाठी गेले. तिथे त्यांनी आतिश पटेल यांच्याकडे गेल्या तीन महिन्याची थकबाकी असलेले साडेसहा हजार रुपयाच्या बिलाची मागणी केली. थकबाकी न भरल्याने कनेक्शन कापले. असा आरोप आहे की, पथकात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत त्यांना मारण्याची धमकी देण्यात आली. दोन कर्मचाऱ्यांचा मोबाईल हिसकावला. महावितरणच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

महावितरण कार्यालयात गर्दी, कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन

वसुली माेहीम सुरु होताच महावितरण कार्यालयात गर्दी वाढली आहे. कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन होत आहे. अभियंत्यांच्या केबिनमध्ये व बाहेरही लोक गर्दी करीत आहेत. सुरक्षित अंतराच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. बहुतांश नागरिक बिलासंदर्भात आक्षेप घेत आहेत. अभियंत्यांना बिल व्यवस्थित करून देण्याची विनंती केली जात आहे. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, अनेक महिन्यांपासून दुकान बंद होते. तरीही बिल आले आहे. तर सर्वसामान्य नागरिक बिल भरण्यासाठी सवलत देण्याची मागणी करीत आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजbillबिल