शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

पर्यावरण संवर्धनाची चळवळ काळाची गरज : महापौरांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 21:59 IST

सिमेंट रस्ते आणि विकास कामांमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाची दखल घेत महापालिकेने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचा ध्यास घेतला आहे. सोबतच भविष्यात शहरावर जलसंकट येऊ नये म्हणून जलसंवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी वृक्षसंवर्धन आणि जलसंवर्धनाची चळवळ उभी करणे काळाची गरज आहे. वृक्षमित्र आणि जलमित्रांच्या माध्यमातून ही चळवळ उभी राहील. नागपूर शहर संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरेल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्दे वृक्षमित्र, जलमित्र ओळखपत्रांचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिमेंट रस्ते आणि विकास कामांमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाची दखल घेत महापालिकेने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचा ध्यास घेतला आहे. सोबतच भविष्यात शहरावर जलसंकट येऊ नये म्हणून जलसंवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी वृक्षसंवर्धन आणि जलसंवर्धनाची चळवळ उभी करणे काळाची गरज आहे. वृक्षमित्र आणि जलमित्रांच्या माध्यमातून ही चळवळ उभी राहील. नागपूर शहर संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरेल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.महापालिकेच्या पुढाकाराने वृक्ष आणि जलसंवर्धनाच्या क्षेत्रात व्यापक कार्य व्हावे यासाठी वृक्षमित्र आणि जलमित्र बनण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याला प्रतिसाद देत शहरातील पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी वृक्षमित्र आणि जलमित्र बनण्यासाठी महापौर कार्यालयात नोंदणी केली. नोंदणी केलेल्यांना सोमवारी महापौरांच्या हस्ते ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.यावेळी शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेविका रूपा राय, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे कन्व्हेनर डॉ. प्रशांत कडू उपस्थित होते.नंदा जिचकार म्हणाल्या, वृक्ष आणि जलसंवर्धनाला शेकडो नागरिकांनी प्रतिसाद दिला. वृक्षलागवडीसोबतच वृक्ष जगविण्याचा संकल्प महत्त्वाचा आहे. शहरातील पाणीसाठा वाढविण्यात जलमित्रांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, यासाठी महापालिका आवश्यक ती मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.यावेळी उपस्थित वृक्षमित्र आणि जलमित्रांना महापौरांनी ओळखपत्रांचे वाटप केले. महापालिकेच्या माध्यमातून होणाºया विधायक कार्याला शुभेच्छा दिल्या. दिलेल्या संधीचे सोने करू. वृक्षसंवर्धन आणि जलसंवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करू, अशी ग्वाही वृक्षमित्र आणि जलमित्रांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाenvironmentवातावरण