शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
2
ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
3
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांच्या नोकराकडेच होते २८४ कोटी; 'मॅडम'कडील प्रॉपर्टीचा आकडा वाचून तर बघा...
4
'या' एका चुकीमुळे लीक होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हेट चॅट; तुम्हाला माहीत आहे का?
5
'ऑपरेशन सिंदूर' हा फक्त ट्रेलर होता', लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला उघड इशारा, दिल्ली स्फोटानंतर लष्कर सज्ज
6
मोबाईलवर मिनिटांत तपासा तुमचा NPS बॅलन्स; पाहा NSDL, उमंग ॲप आणि मिस्ड कॉलची सोपी पद्धत
7
फलटणमध्ये महायुतीतच 'खेळ'! शिंदेंच्या शिवसेनेकडून रामराजेंचा मुलगा, भाजपाकडून माजी खासदारांचा भाऊ मैदानात
8
कमाल! नोकरीसोबतच घरची जबाबदारी, ६ वेळा नापास; २ मुलींची आई ४० व्या वर्षी झाली IAS
9
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
10
Delhi Blast: दिल्लीत स्फोट घडवण्यासाठी किती पैसे दिले गेले होते, डॉ. शाहीनची काय होती भूमिका?
11
बँकिंग शेअर्समध्ये ऐतिहासिक तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार वाढ; 'ही' आहेत प्रमुख ४ कारणं
12
किरकोळ गुंतवणूकदारांनी 'या' १० शेअर्समध्ये टाकले ₹१८,००० कोटी! सुजलॉन त्यापैकी एक, आणखी नावं कोणती?
13
DIY Tips: ड्राय क्लीनिंगचा खर्च वाचवा! कपड्यांवरील चिवट डाग काढण्यासाठी 'हा' घरगुती फॉर्म्युला वापरा 
14
"राहुल गांधी पंतप्रधान होवोत अथवा न होवोत, आमचा हेतू...!" बिहार निवडणुकीसंदर्भात बोलताना काय म्हणाले रॉबर्ट वाड्रा? 
15
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! बिटकॉइन १५ लाख तर इथर १.३५ लाखानं कोसळला; ही आहेत कारणं
16
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
17
MLA Disqualification Case: 'आमदारांचं प्रकरण दोन आठवड्यात निकाली काढा, नाहीतर...'; सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांवर संतापले
18
Gold & Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; Gold २ हजारांपेक्षा अधिकनं झालं स्वस्त, Silver मध्ये ६५०० ची घसरण
19
दिल्ली स्फोट तपास: कोडवर्ड, 'वुल्फ आवर' आणि महिला दहशतवाद्यांचे 'ऑरोरा-लूना' पथक!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संवर्धनाची चळवळ काळाची गरज : महापौरांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 21:59 IST

सिमेंट रस्ते आणि विकास कामांमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाची दखल घेत महापालिकेने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचा ध्यास घेतला आहे. सोबतच भविष्यात शहरावर जलसंकट येऊ नये म्हणून जलसंवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी वृक्षसंवर्धन आणि जलसंवर्धनाची चळवळ उभी करणे काळाची गरज आहे. वृक्षमित्र आणि जलमित्रांच्या माध्यमातून ही चळवळ उभी राहील. नागपूर शहर संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरेल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्दे वृक्षमित्र, जलमित्र ओळखपत्रांचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिमेंट रस्ते आणि विकास कामांमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाची दखल घेत महापालिकेने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचा ध्यास घेतला आहे. सोबतच भविष्यात शहरावर जलसंकट येऊ नये म्हणून जलसंवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी वृक्षसंवर्धन आणि जलसंवर्धनाची चळवळ उभी करणे काळाची गरज आहे. वृक्षमित्र आणि जलमित्रांच्या माध्यमातून ही चळवळ उभी राहील. नागपूर शहर संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरेल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.महापालिकेच्या पुढाकाराने वृक्ष आणि जलसंवर्धनाच्या क्षेत्रात व्यापक कार्य व्हावे यासाठी वृक्षमित्र आणि जलमित्र बनण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याला प्रतिसाद देत शहरातील पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी वृक्षमित्र आणि जलमित्र बनण्यासाठी महापौर कार्यालयात नोंदणी केली. नोंदणी केलेल्यांना सोमवारी महापौरांच्या हस्ते ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.यावेळी शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेविका रूपा राय, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे कन्व्हेनर डॉ. प्रशांत कडू उपस्थित होते.नंदा जिचकार म्हणाल्या, वृक्ष आणि जलसंवर्धनाला शेकडो नागरिकांनी प्रतिसाद दिला. वृक्षलागवडीसोबतच वृक्ष जगविण्याचा संकल्प महत्त्वाचा आहे. शहरातील पाणीसाठा वाढविण्यात जलमित्रांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, यासाठी महापालिका आवश्यक ती मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.यावेळी उपस्थित वृक्षमित्र आणि जलमित्रांना महापौरांनी ओळखपत्रांचे वाटप केले. महापालिकेच्या माध्यमातून होणाºया विधायक कार्याला शुभेच्छा दिल्या. दिलेल्या संधीचे सोने करू. वृक्षसंवर्धन आणि जलसंवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करू, अशी ग्वाही वृक्षमित्र आणि जलमित्रांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाenvironmentवातावरण