शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

जलतरणात आमूलाग्र सुधारणा करण्याची अधिक गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 9:53 PM

भारतीय जलतरणपटूंकडून आंतरराष्ट्रीय  पातळीवर चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगायची झाल्यास भारतीय जलतरण क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत आॅलिम्पिकपटू संदीप सेजवाल याने सोमवारी व्यक्त केले.

ठळक मुद्देआॅलिम्पिकपटू संदीप सेजवालचे मत

आॅनलाईन लोकमतनागपूर: भारतीय जलतरणपटूंकडून आंतरराष्ट्रीय  पातळीवर चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगायची झाल्यास भारतीय जलतरण क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत आॅलिम्पिकपटू संदीप सेजवाल याने सोमवारी व्यक्त केले.एका समारंभासाठी पहिल्यांदा नागपुरात आलेला २०१४ च्या आशियाडचा कांस्य विजेता सेजवालने एसजेएएनतर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात जलतरणातील समस्या आणि उपाययोजना यावर मत नोंदविले.जलतरणातील सद्यस्थितीवर बोलताना तो म्हणाला,‘आधीच्या तुलनेत भारतीय जलतरणपटू सध्या चांगली कामगिरी करीत आहेत. मागील दोन आशियाडमध्ये आम्हाला पदके मिळाली, पण सुधारणा घडून येण्यास आणखी वेळ लागेल. मूळचा दिल्लीचा असलेला संदीप सेजवाल सध्या बेंगळुरू येथे पुढीलवर्षी जकार्ता येथे आयोजित आशियाडची तयारी करीत आहे.सुधारणा घडून येण्यासाठी देशात स्पर्धांची संख्या वाढविण्याची गरज आहे. युरोपियन देशांच्या तुलनेत आपल्याकडे स्पर्धांची संख्या नगण्य आहे. केवळ राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन पुरेसे नाही, असे ५०, १०० आणि २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकचा राष्ट्रीय विक्रमवीर आणि सिनियर राष्ट्रीय विजेता असलेल्या सेजवालने सांगितले. जलतरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याशिवाय भारतात या खेळाचा दर्जा उंचावणार नाही. खेळाडूंना नोकऱ्यांची संधी आणि आर्थिक मदतीचा अभाव ही देखील खेळाच्या माघारीची प्रमुख कारणे आहेत.१८ वर्षांखालील गटाच्या स्पर्धांना ग्लेनमार्कने शिष्यवृत्तीच्या रूपाने आर्थिक पाठबळ दिल्यामुळे ज्युनियर स्तरावर आशेचा किरण जगताना दिसत आहे. यातून देशाला आॅलिम्पिक दर्जाचे जलतरणपटू गवसतील, असा विश्वास पश्चिम रेल्वेचा कर्मचारी असलेला सेजवाल याने व्यक्त केला.पॅराजलतरणात विश्व स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती कांचनमाला पांडे हिच्या कामगिरीचे त्याने कौतुक केले. तत्पूर्वी रातुम नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा विभाग संचालिका डॉ. कल्पना जाधव आणि शहरातील जलतरण संघटकांनी सेजवालचे स्वागत केले.

टॅग्स :Sportsक्रीडाnagpurनागपूर