शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

कोरोनापेक्षाही अधिक मृत्यू रस्ते अपघातांत - राजाभाऊ गिते  

By सुमेध वाघमार | Updated: February 13, 2024 19:21 IST

एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याने ते निश्चितच टाळता येतात.

नागपूर: एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याने ते निश्चितच टाळता येतात. हेल्मेटचा वापर न करणे, सीटबेल्ट न लावणे व अति वेगाने वाहन चालविणे या कारणांमुळे प्राणघातक अपघात होतात. कोरोनापेक्षाही जास्त मृत्यु अपघातांमुळे होत आहेत. परिणामी वाहतूक नियमांच्या जनजागृतीचे व रस्ता वापरणाºया घटकांकडून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते यांनी केले.

प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर (शहर), नागपूर (ग्रामीण) व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर (पूर्व) यांच्या संयुक्त विद्यामाने ‘रस्ता सुरक्षा अभियान- २०२४’चे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी या अभियानाचा समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भूयार, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, एसटी महामंडळाच्या आगर प्रमुख तांबे, गौतम शेंडे, डॉ. अविनाशचंद्र अग्नीहोत्री, प्रज्ञा मोदी आदी उपस्थित होत्या. संचालन किर्ती खोब्रागडे यांनी केले. प्रास्ताविक भुयार यांनी केले. रस्ता सुरक्षेला घेऊन आपण आपली मानसिकता बदलायला हवी. ‘हे चालायचचं’ ही वृत्ती सोडायला हवी. स्वत:मध्ये बदल करणे आवश्यक आहे, असे मतही त्यांनी मांडले. कार्यक्रमाला सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके, नितीन सोळंकी, विनोद इंगळे यांच्यासह आरटीओतील अनेक वरीष्ठ अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक उपस्थित होते. किशोर हम्पीहोळी यांच्या मार्गदर्शनात रस्ता अपघातावर पथनाट्य सादर करण्यात आले.

५५ वाहन चालकांना मोतीबिंदूरस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आरटीओ व माधव नेत्रालयाच्यावतीने १५ ठिकाणी  ९४०० परिवहन वाहन चालकांची मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ५५ वाहन चालकांमध्ये मोतीबिंदूचे निदान झाले. धक्कादायक म्हणजे, तपासणीपूर्वी त्यांना या आजाराची माहितीच नव्हती. गरजू चालकांना चष्म्यांचे वाटपही करण्यात आले.

टॅग्स :nagpurनागपूरAccidentअपघातcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू