निशांत वानखेडेनागपूर : २८ मे राेजी गडचिराेलीपर्यंत पाेहचलेला मान्सून आठ दिवसांपासून जागीच खाेळंबला आहे. त्यासाठी आणखी १० दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. यापुढे १३, १४ जूनपर्यंत मान्सून पश्चिम विदर्भाकडे सक्रिय हाेण्याचा अंदाज आहे. त्यानंतर ताे १७ तारखेपासून पूर्व विदर्भात सक्रिय हाेईल. त्याच्या या हालचालीत नागपूरकरांची मात्र निराशा हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यंदा मान्सून चांगला हाेईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला हाेता. या अंदाजापेक्षा वेगवान गतीने नैऋत्य मान्सून देशात आणि तेवढ्याच वेगाने २५ मे राेजी महाराष्ट्रातही पाेहचला. त्यानंतरही त्याची सक्रियता वेगवान हाेती. अगदी २८ मे राेजी ताे विदर्भाच्या सीमेवर गडचिराेलीपर्यंत पाेहचला. त्यानंतर मात्र मान्सूनची चाल थांबली, जे आजतागायत कायम आहे. आठ दिवसात मान्सून पाेहचला, त्याच जागी खाेळंबला आहे. संपूर्ण विदर्भात ताे विस्तारलाच नाही.
आता वेधशाळेच्या निरीक्षणानुसार येत्या १३, १४ जून राेजी पश्चिम विदर्भाच्या अकाेला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यात सक्रिय हाेण्याचा अंदाज आहे. त्यापुढे १७ ते २० तारखेपर्यंत ताे पूर्व विदर्भात गडचिराेली, चंद्रपूर, गाेंदिया, भंडारा या जिल्ह्यात सक्रिय हाेईल, अशी शक्यता आहे. मान्सूनच्या हालचाली आसपास सुरू असतील पण नागपूर जिल्ह्यात त्याची सक्रियता अतिशय कमजाेर असेल, असेही हवामान तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
दरम्यान विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात तापमानाची चढउतार सुरू आहे. नागपूरला कमाल तापमानात अंशत: वाढ हाेत ते ३९ अंशावर पाेहचले आहे. पुढच्या पाच दिवसात पारा ३९ ते ४० अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या हाेत असलेला उकाड्याचा त्रास पुढेही सहन करावा लागेल, असा अंदाज आहे. या काळात वादळवारा, विजांच्या कडकडाटासह किरकाेळ पाऊस हाेण्याचीही शक्यता आहे.